शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

शिक्षक भरती होणार किचकट

By admin | Updated: June 29, 2014 01:07 IST

माध्यमिक शिक्षण : परवानगी देणार मुख्य कार्यकारी अधिकारी

सागर पाटील : टेंभ्येमाध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीवर यापुढे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. शिक्षक भरती संदर्भातील वैयक्तिक मान्यता वगळता सर्व अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला देण्यात आले आहेत. त्यांच्या परवानगीनंतरच शिक्षण संस्थेला भरती प्रक्रिया करता येणार आहे. यामुळे यापुढे माध्यमिक शाळेमधील शिक्षक भरती प्रक्रिया अधिक जटिल बनणार आहे. आधी ही परवानगी देणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केवळ संबंधित पदाला मान्यता देण्याचे अधिकार ठेवण्यात आले आहेत.खासगी माध्यमिक शाळेमधील शिक्षक भरती करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समिती निर्माण करण्यात आली आहे. या समितीमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व प्राथमिक शाळांसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी तर माध्यमिक शाळांसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.या समितीकडे शिक्षक भरती संदर्भातील महत्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. शाळांमधील रिक्त पदांची निश्चिती संच मान्यतेनुसार केली आहे का ते तपासणे, प्रस्तावित रिक्त पदावर समायोजनासाठी शिक्षक अथवा शिक्षकेतर कर्मचारी उपलब्ध आहे का? याची खात्री करणे, अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध असल्यास प्रथम त्याचे समायोजन करणे, अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध नसल्यास संबंधित संस्थेची बिंदू नामावली सक्षम अधिकाऱ्यांकडून तपासून घेतल्याची खात्री करणे, या सर्व बाबी तपासल्यानंतर पद रिक्त दिसत असेल तर संबंधित संस्थेला जाहिरात काढण्याची परवानगी देण्याचे काम संबंधित समिती करणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच खासगी अनुदानित व विनाअनुदानित संस्थांना पदभरती प्रक्रिया सुरु करता येईल. शासन निर्णयातील सर्व प्रक्रिया व्यवस्थित पूर्ण केल्याची खात्री करुन संबंधित पदाला मान्यता देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे.राज्यामधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न विनाअडथळा सोडविता यावा यासाठी शासनाने भरतीपूर्व प्रक्रियेचे सर्व अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची प्रतिक्रिया शिक्षण क्षेत्रातून व्यक्त केली जात आहे. काही शिक्षण संस्थांमध्ये अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत विरोधात्मक भूमिका घेतली जाते. कार्यवाही करण्याचे अधिकार यापूर्वी शिक्षणाधिकाऱ्यांना होते. शासन निर्णयानुसार सध्या हे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.