शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांच्या संरक्षणाची जबाबदारी टास्क फोर्सकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना हक्क मिळवून देऊन त्यांचे संरक्षण व संगोपन व्हावे, या ...

रत्नागिरी : कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना हक्क मिळवून देऊन त्यांचे संरक्षण व संगोपन व्हावे, या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कृती दल स्थापन करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत कोरोनाच्या वाढलेल्या संसर्गामुळे बाधित व्यक्तींचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावर गंभीर परिणाम होत आहे. काही ठिकाणी दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या बालकांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची तसेच बालकामगार, बालभिक्षेकरी किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेदेखील टास्क फोर्स गठीत करण्याचे निर्देश दिले आहेत.

त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या टास्क फोर्सचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सदस्य सचिव, तर जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. या टास्क फोर्समध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य आहेत. जिल्ह्यात मृत्यू पावलेल्या पालकांच्या बालकांसाठी काळजी व संरक्षणाची सेवा तत्परतेने देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय (दूरध्वनी क्रमांक ०२३५२ - २२०४६१) अंतर्गत रत्नागिरीतील जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या समृद्धी वीर यांच्याकडे तत्काळ संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर यांनी केले आहे.

शिशुगृह, बालगृह निश्चित

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना तत्काळ आधार आणि सुरक्षितता मिळण्यासाठी ० ते ६ वयोगटातील बालकांसाठी चिपळूण येथील भारतीय सेवा समाज केंद्राचे शिशुगृह निश्चित करण्यात आले आहे. तसेच ६ ते १८ वयोगटातील मुलींसाठी लांजा येथील बालगृह, तर या वयोगटातील मुलांसाठी रत्नागिरीतील शासकीय बालगृहाची निश्चिती करण्यात आली आहे.

चुकीचे संदेश पाठविणाऱ्यांवर गुन्हा

समाज माध्यमांद्वारे दत्तक दिले जाईल किंवा घेतले जाईल, असे चुकीचे संदेश पाठवणे व त्यास प्रतिसाद देणे, हा कायद्याने गुन्हा आहे. कोविड कालावधीत दोन्ही पालकांचा मृत्यू झालेल्या बालकाची अथवा कोरोना बाधित पालकांच्या बालकांना तात्पुरत्या स्वरूपात गरज लागत असल्याची माहिती कोणालाही मिळाल्यास चाईल्ड लाईनच्या १०९८ या हेल्पलाईनवर तत्काळ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा टास्क फोर्सने केले आहे.