शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने करजुवेत टँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2019 14:51 IST

संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.

ठळक मुद्देग्रामस्थांची गैरसोय दूर -- स्रोत आटल्याने तीव्र पाणीटंचाई- अकरा वाड्यांमध्ये ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल

देवरूख : संंगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केलेले असल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तातडीने दोन टँकर करजुवे गावात पोहोचल्याने येथील अकरा वाड्यांमधील ग्रामस्थांची गैरसोय दूर झाली. त्यामुळे त्यांनी जिल्हा प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.मे महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश गावांना पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावामध्येही सध्या पाण्याचे स्रोत आटल्याने पाणी समस्या भेडसावू लागली आहे. उन्हामुळे पाण्याची पातळी अतिशय खाली गेली आहे. त्यामुळे गावातील लोकांना पाणीटंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता.  या गावातील चाफेवाडी, मोरेवाडी, वाकसालवाडी, चांदिवडेवाडी, मावळातली बाचीमवाडी, भोईवाडी, तिसंगवाडी, डावलवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, विचारेकोंड या ११ वाड्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा प्रस्ताव ग्रामपंचायतीने संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम यांच्याकडे सादर केला होता.काही दिवसांपूर्वीच या गावाच्या दौºयावर आलेले रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या गावात दोन टँकर पोहोचले. या टँकरने चाफेवाडी, मोरेवाडी, चांदिवडेवाडी, बाचिमवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा करण्यात आला.  यावेळी संगमेश्वरचे पंचायत समिती सदस्य सुभाष नलावडे, माजी उपसभापती संतोष डावल, करजुवेचे सरपंच शामसुंदर माने, उपसरपंच श्रीकांत नलावडे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. गावासाठी दोन टँकर मिळाल्याने जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, देवरूख तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. 

टॅग्स :water transportजलवाहतूकRatnagiriरत्नागिरी