शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

रत्नागिरी जिल्ह्यात १६ गावांवर दरडीची टांंगती तलवार

By admin | Updated: June 6, 2014 00:14 IST

प्रशासन विशेष लक्ष ठेवणार

रत्नागिरी : गेल्या काही वर्षात अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याच्या तसेच दरडी कोसळणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. त्यात मोठ्या प्रमाणात वित्त हानी होत असल्याने यावर्षी अशा गावांवर प्रशासन विशेष लक्ष ठेवणार आहे. जिल्ह्यात अशी १६ गावे असून, त्यात सर्वाधिक गावे दापोली तालुक्यात आहेत.पावसाळा जवळ आला असल्याने जिल्ह्यात उद्भवणार्‍या संभाव्य आपत्तींचा विचार करून जिल्हा प्रशासनाकडून सर्व ती तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या महिन्यामध्ये सर्व विभागप्रमुखांची बैठका घेऊन त्यांना सूचना देण्यात आली आहे. यावेळी आपत्कालीन सर्व प्रकारच्या आपत्तींचा कसा सामना करावा, याची सविस्तर माहिती सर्व अधिकारी, कर्मचारी यांना देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ३५00 ते ४000 मिलिमीटर (१४0 ते १६0 इंच) इतका पाऊस पडतो. राजापूर, संगमेश्वर, चिपळूण, खेड या तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी पूर येण्याचे प्रकार सातत्याने घडतात. अतिवृष्टीमुळेच दरडी कोसळण्याच्या घटना घडतात.दरडग्रस्त म्हणून नोंंदल्या गेलेल्या १६ गावांवर यंदा विशेष लक्ष ठेवण्यात येणार असून, तशी आपत्ती उद्भवल्यास त्यासाठीही उपयायोजना करण्यात आली आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास तेथील लोकांच्या स्थलांतराच्या दृष्टीनेही नियोजन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी त्यांनी यावेळी सांगितले. (प्रतिनिधी)