शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम स्थानिकांना विश्वासात घेऊन करा : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 14:40 IST

जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम हे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देरेल्वेलाईनच्या बांधकामाबाबत घेतली माहिती, समस्यांबाबतही केली फुणगूस ग्रामस्थांशी चर्चाभूसंपादनाबाबत स्थानिक आमदारांशी चर्चा करू

रत्नागिरी : जयगड-डिंगणी रेल्वे प्रकल्पाचे काम हे प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावातील ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच करा, अशा सूचना राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिल्या आहेत. जेडीआरएलच्या मालवाहतूक रेल्वे लाईनच्या कामामुळे उद्भवणाऱ्या  समस्यांबाबत आयोजित बैठकीमध्ये देसाईवाडी - फुणगूस येथे ते बोलत होते.

यावेळी जेडीआरएलचे प्रकल्प समन्वयक राजीव लिमये, अमित चौधरी, वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. एस. के. थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सावर्डेकर, संगमेश्वरचे तहसीलदार संदीप कदम, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता बी. डी. साळवी, उपअभियंता पाणीपुरवठा बी. आर. शिंदे, प्रकल्प अभियंता पाटणकर, जिल्हा परिषद शाखा अभियंता पी. एस. पोवार, फुणगूसच्या संरपच प्राची भोसले उपस्थित होत्या.

यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, या रेल्वे प्रकल्पाला गावाचा विरोध नाही. प्रकल्प झाल्याने येथील गावांचा विकास होणार आहे. परंतु, प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना येत असलेल्या समस्या व अडचणीही दूर करणे गरजेचे आहे. मी राज्याच्या उद्योगमंत्र्याबरोबरच फुणगूसचा ग्रामस्थही आहे, त्यामुळे या प्रकल्पामुळे येथील गावांना निर्माण होणाºया समस्या दूर करण्यासाठी कटीबध्द आहे.

पाणीपुरवठ्याविषयी बोलताना देसाई म्हणाले की, या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या गावांना विहीर व सोबत पाणीयोजना देण्यात येणार आहे. त्यामुळे अशी पाणीपुरवठा योजना तयार करा की, ज्यामुळे बाधीत गावातील पाण्याच्या प्रश्न कायमाचा सुटेल. भूसंपादनबाबत बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की, भूसंपादीत करण्यात येणाऱ्या जमिनीच्या दराबाबत आपण स्थानिक आमदारांसोबत सविस्तर चर्चा करु, असे ते म्हणाले.ग्रामस्थ, अधिकाऱ्यांशी केली चर्चा..यावेळी उद्योगमंत्र्यांनी गावातील सहाण तसेच प्रकल्पाच्या कामात अवजड वाहनांमुळे खराब झालेले रस्ते, पाणीपुरवठा, भूसंपादन याविषयी निर्माण होणाऱ्या अडचणी, समस्यांबाबत गावकरी व अधिकारी यांच्याबरोबर सविस्तर चर्चा केली.रस्ते दुरुस्त करा...प्रकल्पाचे काम करताना सहाणेच्या जमिनीला अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. प्रकल्पाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी अवजड वाहनांच्या रहदारीमुळे रस्ते खराब झाले आहेत, ते दुरुस्त करण्याची जबाबदारी संबधित यंत्रणेची आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईRatnagiriरत्नागिरी