शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी
6
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
7
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
8
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
9
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
10
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
11
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
12
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
13
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
14
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
16
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
17
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
18
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
19
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
20
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 

प्राध्यापकावर कठोर कारवाई करा

By admin | Updated: July 22, 2015 23:57 IST

गुहागर तालुका : अभाविपने केला निषेध

रत्नागिरी : गुहागर तालुक्यात घडलेल्या ‘त्या’ प्रकाराचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध करण्यात येत आहे. आरोपी प्राध्यापकावर संस्था आणि शासनाकडून कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशमंत्री अ‍ॅड. विवेकानंद उजळंबकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.विद्यार्थी परिषदेतर्फे २०१५-२०१६ शैक्षणिक वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी महाराष्ट्रात विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका, विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणूका होत असून, विद्यार्थी परिषद यावर्षी देशभरातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात सक्रीय करून सदस्यत्व देण्यात येणार आहे. १५ जुलैपासून सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले असून, ३० आॅगस्टपर्यंत चालणार आहे. ५ आॅगस्ट रोजी अधिकाधिक नोंदणी, तर २९ आॅगस्ट रोजी फक्त विद्यार्थिनींची नोंदणी करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. उजळंबकर यांनी सांगितले.महाविद्यालयातील निवडणुका १९९३पासून बंद आहेत. त्या सुरू होण्यासाठी अभाविपने निवेदन दिले आहे. यामुळे घराणेशाहीला आळा बसेल. मात्र, निवडणुका राजकारणविरहीत होणे गरजेचे असल्याचे सांगितले.मुंबई उपकेंद्र निष्क्रीय असल्याचा आरोप करीत क्षुल्लक कारणासाठी विद्यार्थ्यांना मुंबईपर्यंत पळवत आहे. शिवाय उशिरा निकाल ही समस्या आहे. त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिष्टमंडळ कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असून त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे, असे ते म्हणाले.दापोलीतील घटनेबाबत अभाविप दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करेल, असेही अ‍ॅड. उजळंबकर यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, शहरमंत्री आशिष बर्वे उपस्थित होते. (प्रतिनिधी)मुंबई विद्यापीठ निष्क्रीय.क्षुल्लक कारणासाठी मुंबईपर्यंत करावी लागतेय वारी, उशिरा निकालाचीही समस्या.कोकणसाठी स्वतंत्र मागणी करणार : उजळंबकररत्नागिरी-सिंधुदूर्गातील शिष्टमंडळ कुलगुरुंशी चर्चा करणार.दापोलीतील घटनेबाबत लवकरच भूमिका मांडणार.