शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
2
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
3
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
4
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
5
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
6
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
7
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
8
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
9
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
10
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
11
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
12
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
13
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
14
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
15
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
16
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
17
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
18
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
19
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
20
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील

अंधश्रद्धा पसरवणाऱ्या प्रकल्प विरोधकांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:08 IST

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाच्या वाढत्या समर्थनामुळे प्रकल्प विरोधकांच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गाव पातळीवर ...

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाच्या वाढत्या समर्थनामुळे प्रकल्प विरोधकांच्या पायाखालची जमीन आता सरकू लागली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गाव पातळीवर गावकऱ्यांना हाताशी धरून प्रकल्पविरोधी पुढाऱ्यांनी सर्वसामान्य लोकांना नारळावर हात ठेवून प्रकल्पविरोधात शपथा घेण्यास भाग पाडले जात आहे. अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरविणारी गावकर मंडळी आणि पुढाऱ्यांचा शोध घेऊन पोलीस आणि प्रशासनाने त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी राजापूर तालुका व्यापारी संघाचे सचिव व माजी नगरसेवक विलास पेडणेकर यांनी केली आहे.

राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला लोकांचा पाठिंबा वाढू लागला आहे. नव्याने प्रस्तावित असलेल्या सोलगाव, देवाचेगोठणे, बारसू, गोवळ, शिवणे खुर्द परिसरातील लोकांनी या प्रकल्पाचे समर्थन केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रकल्पविरोधी पुढारी सक्रिय झाले आहेत. काही प्रकल्पविरोधी मंडळी स्थानिक पातळीवर गावकऱ्यांना हाताशी धरून देवळात नारळ ठेवून प्रकल्पाच्या विरोधासाठी गावातील जनतेवर दबाव आणत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. पेडणेकर यांनी हे प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचे नमूद केले आहे.

आमचीही देवावर श्रद्धा आहे, आम्ही देव मानणारी माणसे आहोत. मात्र, या श्रद्धेचा गैरफायदा कुणी घेत असेल तर ते मुळीच खपवून घेतले जाणार नाही. आपल्या देशात आणि राज्यात अंधश्रद्धेला थारा नाही, त्यासाठी कठोर कायदेही आहेत. मात्र, असे असतानाही गावपातळीवर ही मंडळी अशा प्रकारे सर्वसामान्य जनतेच्या मनात अंधश्रद्धा पसरविण्याचे काम करत आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी पेडणेकर यांनी केली आहे.

काही राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधीही मंदिरांमध्ये प्रकल्प विरोधी बैठका घेतात आणि देवाच्या नावावर जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचे प्रयत्न करतात, हेही यापूर्वी पुढे आले आहे. हा एक प्रकारचा गुन्हाच आहे. तुम्हाला विकास करता येत नसेल तर किमान अशा प्रकारे जनतेमध्ये गैरसमज तरी पसरवू नका, असेही पेडणेकर यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.