शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

उमेदवारीसाठी रणकंदन?

By admin | Updated: August 15, 2016 00:28 IST

नगराध्यक्ष निवडणूक : सेना, भाजप, राष्ट्रवादीतील दावेदारांना पक्षातूनच आव्हान?

रत्नागिरी : येत्या डिसेंबरमध्ये होत असलेल्या रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांकडून सुरू करण्यात आली आहे. मात्र, नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून सध्या सेना व भाजपमध्ये वादळ घोंगावू लागले आहे. उमेदवारीसाठी दावा करणाऱ्यांना त्यांच्याच पक्षातून जोरदार आव्हान दिले जात असल्याने उमेदवारी देण्यावरून रत्नागिरीत रणकंदन माजणार असल्याची चिन्हे आहेत. रत्नागिरीच्या थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सेनेत तसेच भाजपमध्येही अनेक दावेदार आहेत. भाजपतर्फे विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, सेनेतर्फे बंड्या साळवी, तर राष्ट्रवादीतर्फे उमेश शेट्ये यांची नावे सध्या आघाडीवर आहेत. असे असले तरी तीनही पक्षांमध्ये यावरून जोरदार धुसफूस सुरू असल्याने आयत्यावेळी तिसऱ्याच कोणाची नावे पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. यावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, दावेदार असलेल्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक डिसेंबर २०१६मध्ये होत आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. परंतु थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आरक्षण सोडत होणार काय, याबाबत संभ्रम कायम आहे. सोडत झाल्यास व महिला आरक्षण पडल्यास मात्र अनेकांची आणखीनच गोची होईल, अशी चर्चाही रंगली आहे. रत्नागिरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेतर्फे बंड्या साळवी, भय्या मलुष्टे, राहुल पंडित, राजेश सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. परंतु बंड्या साळवी हे सर्वाधिक आघाडीवरचे नाव आहे. त्यांना विधानसभा निवडणुकीच्या वेळी नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचा शब्दही वरिष्ठांनी दिल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांच्या विरोधातही दुसरे इच्छुक मोर्चेबांधणी करीत आहेत. सेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार ठरवताना जुन्या - नव्यांमध्ये गटबाजी उफाळून येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भलत्याचाच लाभ होऊ शकतो, अशी चर्चा आहे. युतीत नसलेल्या भाजपमध्येही नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीवरून वादळ निर्माण झाले आहे. विद्यमान नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे पुन्हा या पदाच्या उमेदवारीसाठी आक्रमकपणे भूमिका मांडत आहेत. परंतु अडीच वर्षांपूर्वी नगराध्यक्षपदासाठी अशोक मयेकर यांचे नाव निश्चित झालेले असतानाही महेंद्र मयेकर यांनी वेगळा गट करून बंडखोरी केली. त्यावेळी झाकली मूठ सव्वा लाखाची राखण्यासाठी भाजप नेत्यांनी त्यांना सांभाळून घेतले. परंतु पक्षाच्या आदेशाला हरताळ फासल्याचा राग पक्षात महेंद्र मयेकर यांच्यावर आहे. त्यामुळे नगराध्यक्षपदाची उमेदवारी महेंद्र मयेकर यांना देण्यास पक्षातून विरोध असल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार काय, असाही प्रश्न आहे. राष्ट्रवादीतून उमेश शेट्येंचे नाव आघाडीवर आहे. मात्र, त्यांच्या पक्षातही त्यांच्याबाबत नाराजी असल्याने तो चर्चेचा विषय बनला आहे. (प्रतिनिधी)