शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वाइन फ्लू’ने दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता, ...

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता, तर राणी संभाजी माळी यांचा रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. दोन्हीही रुग्णांवर कºहाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चिखली येथील राणी माळी यांना सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्यावर मसूरला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्रास कमी न झाल्याने त्यांना ८ आॅगस्ट रोजी कºहाडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.‘मसूर परिसरातील लोकांनी स्वाइन फ्लूने न घाबरता कापूर व वेलचीचे छोटे दाणे प्रत्येकी पाच ग्रॅम घेऊन ते एकत्रित बारीक कुटून मिश्रणाची पूड स्वच्छ व सुती कापडात जवळ ठेवावी.दर दीड तासाने तिचा वास घेतल्यास स्वाइन फ्लूचा जिवाणू मरतो,’ अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रमेश लोखंडे यांनी दिली.१ रिसवड येथील महादेव इंगवले यांना १९ जुलै रोजी मसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २० जुलैला कºहाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती ठीक न झाल्याने २१ जुलै रोजी सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही रुग्ण स्वाइन फ्लूचे बळी ठरल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.२ आरोग्य खात्यातर्फे चिखली, रिसवड व विभागातील गावांत स्वाइन फ्लूसंदर्भात सर्व्हे सुरू केला असून, जनजागृती सुरू केली आहे. गावोगावच्या ग्रामपंचायतींनी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही आरोग्य खात्याने केले आहे.३ मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. लोखंडे यांच्यासह आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका यांची जनजागृतीची मोहीम सुरू आहे. ग्रामस्थांनी ताप, सर्दी, खोकला व घसा दुखणे अशी फ्लूसदृश लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल व्हावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी केले आहे.