शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

‘स्वाइन फ्लू’ने दोघांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता, ...

लोकमत न्यूज नेटवर्कमसूर : चिखली व रिसवड येथे दोन रुग्णांचा स्वाइन फ्लूने बळी घेतला. चिखली येथील राणी संभाजी माळी (वय ४१), तर रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले (६५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रिसवड येथील महादेव गोविंद इंगवले यांचा शनिवारी सायंकाळी पाच वाजता, तर राणी संभाजी माळी यांचा रविवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला. दोन्हीही रुग्णांवर कºहाड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. चिखली येथील राणी माळी यांना सर्दी, ताप, डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांच्यावर मसूरला खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, त्रास कमी न झाल्याने त्यांना ८ आॅगस्ट रोजी कºहाडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.‘मसूर परिसरातील लोकांनी स्वाइन फ्लूने न घाबरता कापूर व वेलचीचे छोटे दाणे प्रत्येकी पाच ग्रॅम घेऊन ते एकत्रित बारीक कुटून मिश्रणाची पूड स्वच्छ व सुती कापडात जवळ ठेवावी.दर दीड तासाने तिचा वास घेतल्यास स्वाइन फ्लूचा जिवाणू मरतो,’ अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. रमेश लोखंडे यांनी दिली.१ रिसवड येथील महादेव इंगवले यांना १९ जुलै रोजी मसूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २० जुलैला कºहाड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती ठीक न झाल्याने २१ जुलै रोजी सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. शनिवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही रुग्ण स्वाइन फ्लूचे बळी ठरल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.२ आरोग्य खात्यातर्फे चिखली, रिसवड व विभागातील गावांत स्वाइन फ्लूसंदर्भात सर्व्हे सुरू केला असून, जनजागृती सुरू केली आहे. गावोगावच्या ग्रामपंचायतींनी स्वाइन फ्लूबाबत जनजागृती करावी, असे आवाहनही आरोग्य खात्याने केले आहे.३ मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एम. लोखंडे यांच्यासह आरोग्य सहायक, आरोग्यसेविका, आशा स्वयंसेविका यांची जनजागृतीची मोहीम सुरू आहे. ग्रामस्थांनी ताप, सर्दी, खोकला व घसा दुखणे अशी फ्लूसदृश लक्षणे आढळल्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारार्थ दाखल व्हावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. रमेश लोखंडे यांनी केले आहे.