शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

प्रवेश अर्जांसाठी उडाली झुंबड

By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST

अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच धावाधाव अधिक...

रत्नागिरी : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून आजपासून अकरावी प्रवेश अर्जांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आयटीआय प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे वेबसाईट खुली न झाल्यामुळे सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसून येत होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत २६ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीसाठी जिल्ह्यात २१ हजार ७४० इतकी प्रवेश क्षमता आहे. शिक्षण विभागाने २७ ते २९ जूनपर्यंत प्रवेश अर्ज वितरणाचे नियोजन केले आहे. चालू शैक्षणिक वर्षात स्वयंअर्थसहायित नवीन १७ महाविद्यालये सुरू होणार आहेत. शिवाय १० ते १२ तुकडीवाढीचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज वितरण सुरू असल्याने अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. शिवाय आयटीआय व पॉलिटेक्निकलचे प्रवेश आॅनलाईन पध्दतीने सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी झालेली दिसून येत होती. आयटीआयची वेबसाईट बंद असल्यामुळे पालक - शिक्षक ताटकळत उभे होते. २७ ते २९ जून या कालावधीत प्रवेश अर्जांचे वितरण केले जाणार आहे. ३० जून ते २ जुलैअखेर प्रवेश अर्जांची छाननी, गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. ४ ते ८ जुलै रप्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ९ व १० रोजी प्रवेश शिल्लक असल्यास प्रवेश दिले जाणार आहेत. ११ व १२ रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १४ व १५ रोजी रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. १६ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. त्यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत होते. ही प्रक्रिया पुढील काही दिवस सुरु राहणार आहे. (प्रतिनिधी)