शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
5
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
6
Ganesh Chaturthi 2025:वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
7
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
8
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
9
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
10
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
11
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
12
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
13
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
14
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
15
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
16
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
17
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
18
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
19
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
20
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान

प्रवेश अर्जांसाठी उडाली झुंबड

By admin | Updated: June 28, 2014 00:31 IST

अकरावी प्रवेश : विद्यार्थ्यांपेक्षा पालकांचीच धावाधाव अधिक...

रत्नागिरी : दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वितरण करण्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातून आजपासून अकरावी प्रवेश अर्जांचे वितरण सुरू करण्यात आले आहे. आयटीआय प्रवेश प्रक्रिया आॅनलाईन पध्दतीने सुरू करण्यात आली आहे. मात्र, दरवर्षीप्रमाणे वेबसाईट खुली न झाल्यामुळे सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी, पालकांची गर्दी दिसून येत होती.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत २६ हजार ५२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अकरावीसाठी जिल्ह्यात २१ हजार ७४० इतकी प्रवेश क्षमता आहे. शिक्षण विभागाने २७ ते २९ जूनपर्यंत प्रवेश अर्ज वितरणाचे नियोजन केले आहे. चालू शैक्षणिक वर्षात स्वयंअर्थसहायित नवीन १७ महाविद्यालये सुरू होणार आहेत. शिवाय १० ते १२ तुकडीवाढीचे प्रस्ताव प्रस्तावित आहेत. कनिष्ठ महाविद्यालयातून अर्ज वितरण सुरू असल्याने अर्ज मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती. शिवाय आयटीआय व पॉलिटेक्निकलचे प्रवेश आॅनलाईन पध्दतीने सुरू झाले आहेत. त्यामुळे प्रवेश अर्ज भरण्यासाठी सायबर कॅफेमध्ये विद्यार्थी व पालकांची गर्दी झालेली दिसून येत होती. आयटीआयची वेबसाईट बंद असल्यामुळे पालक - शिक्षक ताटकळत उभे होते. २७ ते २९ जून या कालावधीत प्रवेश अर्जांचे वितरण केले जाणार आहे. ३० जून ते २ जुलैअखेर प्रवेश अर्जांची छाननी, गुणवत्तेनुसार प्रतीक्षा यादी तयार केली जाणार आहे. ३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रतीक्षा यादी प्रसिध्द केली जाणार आहे. दि. ४ ते ८ जुलै रप्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ९ व १० रोजी प्रवेश शिल्लक असल्यास प्रवेश दिले जाणार आहेत. ११ व १२ रोजी दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. १४ व १५ रोजी रिक्त राहिलेल्या जागांवर एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार आहेत. १६ जुलैपासून अकरावीचे वर्ग सुरू करण्याची सूचना शिक्षण विभागाने दिली आहे. त्यानुसार शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतून प्रक्रिया सुरू झाल्याचे दिसून येत होते. ही प्रक्रिया पुढील काही दिवस सुरु राहणार आहे. (प्रतिनिधी)