शहरं
Join us  
Trending Stories
1
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
2
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
3
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
4
१७ वर्षीय आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; पण फिफ्टी आड आला माफाका
5
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
6
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
7
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
8
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
9
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
10
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
11
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!
12
"पती नेत्यांना पुरवतो २० वर्षांच्या मुली, मला…’’, महिलेच्या आरोपांनी या राज्यातील राजकारण तापले   
13
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
14
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
15
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
16
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
18
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
19
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
20
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...

डॉक्टर्सना ‘स्पेशल’ सुविधा सुरेश शेट्टी

By admin | Updated: May 25, 2014 01:13 IST

रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी घेणार वेगळा निर्णय

रत्नागिरी : रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा बजावण्यास डॉक्टर्स तयार होत नाहीत. त्यामागे अनेक कारणे आहेत. या जिल्ह्यांच्या काही भागात शिक्षणाच्या चांगल्या सोयी पुरेशा प्रमाणात पोहोचलेल्या नाहीत. त्यांच्या निवास व्यवस्थेचाही प्रश्न आहे. त्यामुळे यापुढे या दोन्ही जिल्ह्यात येणार्‍या डॉक्टर्ससाठी वेगळ्या सुविधा, प्रोत्साहन दिले जाईल. स्पेशल इन्सेन्टिव्हही दिले जाणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. रत्नागिरी जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील अन्य जिल्ह्यातही शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्त पदाची समस्या आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या काळात ही समस्या सोडविण्यासाठी आपण खास प्रयत्न करीत आहोत. शासकीय सेवेत येणारे डॉक्टर्स कमी आहेत. त्यातही राज्यात नव्हे तर देशातही डॉक्टर्सची कमतरता आहे. शासकीय सेवेत डॉक्टर्स यावेत यासाठी तीनवेळा भरती करण्यात आली. भरतीत पारदर्शकता होती. शासकीय सेवेत वेतन खासगी सेवेच्या तुलनेत कमी आहे. यासाठी या सेवेत येणार्‍या पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर्सना ६ इन्क्रीमेंटस तर डिप्लोमा होल्डरना ३ इन्क्रिमेंटस दिल्या. कोकणात शासकीय रुग्णालयात येण्यास डॉक्टर्स तयार नाहीत, असे सांगितले जाते. त्याला काही वेगळे कारण आहे काय? असे विचारता शेट्टी म्हणाले, वेगळे कारण नाही परंतु कारणे अनेक आहेत. मुख्यत: जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहेत परंतु तेवढ्या अनेक तालुक्यांच्या ठिकाणी नाहीत. त्यामुळे डॉक्टर्स यायला नकार देतात. तसेच ग्रामिण भागात डॉक्टर्सच्या निवासाची सोयही त्यांच्या पध्दतीने सोयीची होत नाही. डॉक्टर येथे न येण्याचे हेसुध्दा कारण आहे. तीन वर्षांपूर्वी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सकांच्या केबिनमध्ये राजकीय कार्यकर्त्यानी हल्लाबोल केला होता या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारला होता मात्र मंत्री शेट्टी यांनी अन्य कारणे देत मूळ मुद्यास बगल दिली. राज्यात यावेळी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आघाडीला सपाटून मार बसला. यामागची कारणे काय आहेत, यावर बोलताना शेट्टी म्हणाले, कारणे काहीही असोत आम्ही जनतेचा कौल मान्य केला आहे. आम्ही कुठे चुकलो याचे आत्मपरिक्षण सुरू आहे. आम्ही आमच्या चुका दुरूस्त करू, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)