शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राजकीय समर्थनांमुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:44 IST

nanar refinery project Ratnagiri- विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.

ठळक मुद्देविविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी रिफायनरी प्रकल्प हवा अशी दोन वर्षांपासूनची सकारात्मक मागणी

मनोज मुळ्येरत्नागिरी : विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षांत सातत्याने केली जात आहे. ज्या गावांना प्रकल्प नको आहे, ती गावे वगळून उर्वरित गावांचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात समाविष्ट गावांमधील ८० टक्के लोकांची संमतीपत्रे तयार आहेत. त्या लोकांची प्रकल्पासाठी जागा देण्याची तयारी आहे.

स्थानिकांची मागणी हवी, हा मुद्दा मांडतानाच जिल्ह्यातील लोकांचा प्रकल्पाला पाठिंबा हवा, असा मुद्दाही शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशा घोषणा देत रत्नागिरीत मोर्चाही काढला. मात्र, तरीही प्रकल्पाबाबत कोणतीच प्रगती झाली नाही.लोकांना हवा आहे, एवढ्या एका कारणासाठी प्रकल्प होणार नाही. त्यासाठी ते राजकीय लोकांच्या मनात यायला हवे, राजकीय इच्छाशक्ती दांडगी असायला हवी, हे लक्षात घेऊन गेल्या वर्षापासून रिफायनरी समर्थकांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. जोवर राजाश्रय नाही, तोपर्यंत प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची पावले पडणार नाहीत.

ही बाब लक्षात घेऊन राजकीय गाठीभेटी वाढल्या आहेत. या सर्व भेटींमध्ये राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत प्रकल्पाबाबत समर्थनाची भूमिका मांडली आहे. बाकी नेत्यांनी आपली भूमिका गोल गोल शब्दात मांडली असली, तरी त्यांनी सकारात्मकता ठेवली आहे. त्यांनी याबाबत पुढील गरजेच्या गोष्टी सुरू केल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीतूनही खूप काही साध्य होत आहे, ही बाब प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ मिळाले आहे.गतवर्षापासून झालेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगतवर्षी जुलै महिन्यात आमदार राजन साळवी, हुस्नबानू खलिफे, ऑगस्ट महिन्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सप्टेंबर महिन्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नोव्हेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, जानेवारीमध्ये खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, फेब्रुवारी महिन्यात खासदार सुप्रिया सुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, माजी खासदार हुसेन दलवाई आणि मार्च महिन्यात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी