शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

राजकीय समर्थनांमुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 17:44 IST

nanar refinery project Ratnagiri- विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.

ठळक मुद्देविविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी रिफायनरी प्रकल्प हवा अशी दोन वर्षांपासूनची सकारात्मक मागणी

मनोज मुळ्येरत्नागिरी : विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेत रिफायनरी समर्थकांनी प्रकल्पाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा जोर लावला आहे. आजवर केवळ विरोधच होणाऱ्या कोकणात प्रकल्प होण्यासाठी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या, हे चित्र प्रथमच दिसत आहे. गेल्या दोन वर्षांत स्थानिक पातळीवर प्रकल्पाचे समर्थक वाढत असताना, आता राजकीय पातळीवरूनही समर्थन वाढू लागल्याने, प्रकल्पाबाबतचे सकारात्मक वातावरण वाढू लागले आहे.रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी गेल्या दोन वर्षांत सातत्याने केली जात आहे. ज्या गावांना प्रकल्प नको आहे, ती गावे वगळून उर्वरित गावांचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यात समाविष्ट गावांमधील ८० टक्के लोकांची संमतीपत्रे तयार आहेत. त्या लोकांची प्रकल्पासाठी जागा देण्याची तयारी आहे.

स्थानिकांची मागणी हवी, हा मुद्दा मांडतानाच जिल्ह्यातील लोकांचा प्रकल्पाला पाठिंबा हवा, असा मुद्दाही शिवसेनेकडून मांडण्यात आला होता. त्यासाठी जिल्ह्यातील विविध संघटनांनी एकत्र येत आम्हाला प्रकल्प हवा आहे, अशा घोषणा देत रत्नागिरीत मोर्चाही काढला. मात्र, तरीही प्रकल्पाबाबत कोणतीच प्रगती झाली नाही.लोकांना हवा आहे, एवढ्या एका कारणासाठी प्रकल्प होणार नाही. त्यासाठी ते राजकीय लोकांच्या मनात यायला हवे, राजकीय इच्छाशक्ती दांडगी असायला हवी, हे लक्षात घेऊन गेल्या वर्षापासून रिफायनरी समर्थकांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेण्यास सुरुवात केली आहे. जोवर राजाश्रय नाही, तोपर्यंत प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची पावले पडणार नाहीत.

ही बाब लक्षात घेऊन राजकीय गाठीभेटी वाढल्या आहेत. या सर्व भेटींमध्ये राज ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे अत्यंत स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत प्रकल्पाबाबत समर्थनाची भूमिका मांडली आहे. बाकी नेत्यांनी आपली भूमिका गोल गोल शब्दात मांडली असली, तरी त्यांनी सकारात्मकता ठेवली आहे. त्यांनी याबाबत पुढील गरजेच्या गोष्टी सुरू केल्या आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीतूनही खूप काही साध्य होत आहे, ही बाब प्रकल्प होण्यासाठी सकारात्मक आहे. त्यामुळे प्रकल्प समर्थकांना पाठबळ मिळाले आहे.गतवर्षापासून झालेल्या राजकीय नेत्यांच्या भेटीगतवर्षी जुलै महिन्यात आमदार राजन साळवी, हुस्नबानू खलिफे, ऑगस्ट महिन्यात गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, सप्टेंबर महिन्यात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नोव्हेंबरमध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे, जानेवारीमध्ये खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, फेब्रुवारी महिन्यात खासदार सुप्रिया सुळे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, माजी खासदार हुसेन दलवाई आणि मार्च महिन्यात मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि आमदार नितेश राणे यांची भेट घेऊन रिफायनरी प्रकल्प व्हावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरी