शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

४० वर्षाच्या वैद्यकीय सेवेनंतर कोकणच्या लाल मातीत केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 16:48 IST

यशकथा : आंब्याला पर्याय म्हणून त्यांनी लाल मातीत ड्रॅगन फ्रूटची बाग फुलविली असून, चांगले अर्थार्जन ते मिळवित आहेत.

- मेहरून नाकाडे ( रत्नागिरी) 

कोकणच्या लाल मातीत कोणत्याही प्रकारची पिके घेतली जाऊ शकतात, हे जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पूर्णगड गावचे डॉ. श्रीराम फडके यांनी ४० वर्षांच्या वैद्यकीय सेवेनंतर यशस्वी शेती करणे सुरू केले आहे. आंब्याला पर्याय म्हणून त्यांनी लाल मातीत ड्रॅगन फ्रूटची बाग फुलविली असून, चांगले अर्थार्जन ते मिळवित आहेत.

आंबा पीक हवामानावर अवलंबून असून, ते दिवसेंदिवस खर्चिक बनले आहे. त्याला पर्याय म्हणून त्यांनी दोन एकर क्षेत्रावर तांबड्या जातीच्या ड्रॅगनफ्रूटची लागवड केली आहे. वैद्यकीयदृष्ट्या ड्रगनफ्रूट महत्त्वपूर्ण असून, त्याला बाजारात मागणीही चांगली असते. कोकणच्या लाल मातीत चांगल्या दर्जाचे ड्रॅगनफ्रूट पिकविता येते, हे सिद्धदेखील केले आहे.

वैद्यकीय सेवा करीत असतानाच त्यांनी शेतीकडे लक्ष देणे सुरू केले. सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे त्यांचा विशेष कल आहे. गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्काचा वापर ते करीत आहेत. डॉ. श्रीराम फडके यांच्यातील शेतीची आवड त्यांचे चिरंजीव डॉ. अनिरुद्ध फडके यांच्यामध्येही निर्माण झाली आहे. 

तांबडा ड्रॅगनफ्रूट कोकणच्या मातीत होऊ शकतो, याची माहिती घेतल्यानंतर त्यांनी रायगड येथून रोपे आणली. पूर्णगड येथील त्यांच्या कातळ जमिनीवर खड्डे खोदून दीडशे सिमेंट पोल टाकले आहेत. कातळ जमीन असल्यामुळे ३० ट्रॅक्टर माती टाकून एका सिमेंटभोवती चार रोपे याप्रमाणे लागवड केली आहे. सुरुवातीला अर्धा एकरवर लागवड केली होती. मात्र, आता त्यांनी अजून दीड एकर क्षेत्र वाढविले आहे. साधारणत: रोप लावल्यानंतर वर्षभर त्याची वाढ सुरू असते. दुसऱ्या वर्षी साधारणत: एका पोलाभोवती असणाऱ्या चार रोपांना किलोभर ड्रॅगनफ्रूट लागते. तिसऱ्या वर्षापासून मात्र ८ ते १० किलो एका पोलमागे उत्पन्न अपेक्षित असून, भविष्यात उत्पन्न वाढते. झाडाचे आयुर्मान २० ते २५ वर्षे असल्याने लागवडीनंतर फारसा त्रास शेतकऱ्यांना होत नाही.

ड्रॅगन हे निवडुंग प्रकारातील झाड असून, कणखर आहे. त्याला विशेष रोगराई नाही, शिवाय वानरांचा अजिबात त्रास नाही. कमी पाण्यावर होणाऱ्या या फळाचे लागवडीपासून तिसऱ्या वर्षापासून उत्पादन सुरू होते. त्यामुळे सिमेंट पोल व त्याभोवती लावाव्या लागणाऱ्या रिंगा याचाच खर्च वाढतो; परंतु सरासरी शंभर रुपये किलो दराने विक्री होत असल्यामुळे या फळांमुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारची आर्थिकप्राप्ती तिसऱ्या वर्षापासून होऊ शकते. यलो, व्हाईट, रेड असे तीन प्रकार असून, रेड प्रकाराला दर चांगला लाभतो. साधारणत: एका झाडाला पाचवेळा कळ्या येतात. मात्र, त्यावेळी जास्त पाऊस व ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान चालत नाही. कोकणात तेवढे तापमान नाही. त्यामुळे हे पीक सहज कुठेही होऊ शकते. कळ्या आल्यानंतर महिना ते सव्वा महिन्यात फळ तयार होते. यावर्षी डॉ. फडके यांनी रत्नागिरी व पुणे बाजारपेठेत ड्रॅगन फ्रूटची विक्री केली. 

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी