शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुभाष संसारेंच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश

By शोभना कांबळे | Updated: April 24, 2023 19:13 IST

रत्नागिरी : शहरातील हॉटेल मिनारचे मालक सुभाष ऊर्फ नाना संसारे यांचे रविवारी ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ...

रत्नागिरी : शहरातील हॉटेल मिनारचे मालक सुभाष ऊर्फ नाना संसारे यांचे रविवारी ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नेत्रदानासाठी सहमती दर्शविल्याने नाना यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होणार आहे. मारुती आळीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून नानांची ओळख होती. मयुरा आइस्क्रीम नावाने त्यांनी आइस्क्रीम फॅक्टरीही सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेल मिनारची स्थापना केली. ते अत्यंत मनमिळाऊ आणि मिश्कील स्वभावाचे असल्याने आपल्या या व्यवसायात त्यांनी अनेक माणसे जोडली होती.वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर रत्नागिरीतील हेल्पिंग हॅंडसचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, रत्नागिरीचे कार्यकर्ते श्रीवल्लभ (भैय्या) वणजू यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना नेत्रदानाबाबत विचारले. त्याही परिस्थितीत नानांचे चिरंजीव सुमित आणि कन्या या दोन्ही भावंडानी यासाठी होकार दर्शविला. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही याबाबत सांगितले. त्यामुळे नानांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.भैय्या वणंजू यांच्या प्रयत्नामुळे आणि संसारे कुटुंबियांच्या सहकार्यामुळे सुभाष तथा नाना संसारे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच उपस्थित असलेल्या व्यक्तींनीही डाॅक्टरांच्या परवानगीने नेत्रदान कसे होते, हे पाहिले. त्यामुळे अनेकांच्या मनातील गैरसमज दूर झाले.आपल्या वडिलांच्या नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे, हे फार मोठे कार्य असल्याची प्रतिक्रिया नानांचे सुपूत्र सुमित यांनी यावेळी दिली.

नेत्रदानाबाबत अजुनही असंख्य गैरसमज आहेत. मरणोत्तर नेत्रदानासाठी समाजातून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. समाजात असंख्य अंध व्यक्ती आहेत. त्यांना नेत्रांची गरज आहे. त्यामुळे समाजात नेत्रज्ञानाबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे. - श्रीवल्लभ तथा भैय्या वणजू, सामाजिक कार्यकर्ता, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी