शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सुभाष संसारेंच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश

By शोभना कांबळे | Updated: April 24, 2023 19:13 IST

रत्नागिरी : शहरातील हॉटेल मिनारचे मालक सुभाष ऊर्फ नाना संसारे यांचे रविवारी ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ...

रत्नागिरी : शहरातील हॉटेल मिनारचे मालक सुभाष ऊर्फ नाना संसारे यांचे रविवारी ७२ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या नेत्रदानासाठी सहमती दर्शविल्याने नाना यांच्या मरणोत्तर नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होणार आहे. मारुती आळीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व म्हणून नानांची ओळख होती. मयुरा आइस्क्रीम नावाने त्यांनी आइस्क्रीम फॅक्टरीही सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी हॉटेल मिनारची स्थापना केली. ते अत्यंत मनमिळाऊ आणि मिश्कील स्वभावाचे असल्याने आपल्या या व्यवसायात त्यांनी अनेक माणसे जोडली होती.वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर रत्नागिरीतील हेल्पिंग हॅंडसचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, रत्नागिरीचे कार्यकर्ते श्रीवल्लभ (भैय्या) वणजू यांनी त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करून त्यांना नेत्रदानाबाबत विचारले. त्याही परिस्थितीत नानांचे चिरंजीव सुमित आणि कन्या या दोन्ही भावंडानी यासाठी होकार दर्शविला. एवढेच नव्हे तर आपल्या कुटुंबातील सदस्यांनाही याबाबत सांगितले. त्यामुळे नानांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले.भैय्या वणंजू यांच्या प्रयत्नामुळे आणि संसारे कुटुंबियांच्या सहकार्यामुळे सुभाष तथा नाना संसारे यांचे मरणोत्तर नेत्रदान करण्यात आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी तसेच उपस्थित असलेल्या व्यक्तींनीही डाॅक्टरांच्या परवानगीने नेत्रदान कसे होते, हे पाहिले. त्यामुळे अनेकांच्या मनातील गैरसमज दूर झाले.आपल्या वडिलांच्या नेत्रदानामुळे आणखी दोन व्यक्तींना दृष्टी मिळणार आहे, हे फार मोठे कार्य असल्याची प्रतिक्रिया नानांचे सुपूत्र सुमित यांनी यावेळी दिली.

नेत्रदानाबाबत अजुनही असंख्य गैरसमज आहेत. मरणोत्तर नेत्रदानासाठी समाजातून म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. समाजात असंख्य अंध व्यक्ती आहेत. त्यांना नेत्रांची गरज आहे. त्यामुळे समाजात नेत्रज्ञानाबाबत प्रबोधन होण्याची गरज आहे. - श्रीवल्लभ तथा भैय्या वणजू, सामाजिक कार्यकर्ता, रत्नागिरी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी