शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

लॉकडाऊनमध्ये आंबा वाहतुकीसाठी एस.टी.ची ‘किसान रथ सेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐन आंबा हंगामात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आंबा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐन आंबा हंगामात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पाठविणे अवघड बनले आहे. त्यासाठी एस.टी.ने आंबा वाहतुकीसाठी तयारी दर्शविली असून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक बागायतदार मार्केटऐवजी खासगी विक्रीवर विशेष भर देत आहेत. त्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पना यशस्वी करण्यासाठी एस.टी. महामंडळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी एसटी आगार येथून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करणार आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ आगारातून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेल, वाशी, ठाणे, कुर्ला, परेल, मुंबई सेंट्रल, बोरिवली आगारात आंबा पेट्या पोचविण्यात येणार आहेत.

कोकणातील एस.टी. आगारापासून मुंबई पुण्यातील एसटी आगारापर्यंत मालवाहतुकीची उत्तम सेवा करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बारा तासात आंबे मुंबईला रवाना होत असल्याने आंबा खराब होण्याची शक्यता नाही. वाहतुकीमध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे आंबा खराब झाल्यास विमा संरक्षणाची हमी महामंडळाने दिली आहे. मुंबईतील ग्राहकांनी आपल्या आंब्याच्या पेट्या आगारातून जमा करण्याची सुविधा केली आहे. तरी सर्व आंबा बागायतदारांनी अथवा ग्राहकांनी जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.