शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये आंबा वाहतुकीसाठी एस.टी.ची ‘किसान रथ सेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐन आंबा हंगामात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आंबा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐन आंबा हंगामात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पाठविणे अवघड बनले आहे. त्यासाठी एस.टी.ने आंबा वाहतुकीसाठी तयारी दर्शविली असून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक बागायतदार मार्केटऐवजी खासगी विक्रीवर विशेष भर देत आहेत. त्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पना यशस्वी करण्यासाठी एस.टी. महामंडळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी एसटी आगार येथून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करणार आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ आगारातून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेल, वाशी, ठाणे, कुर्ला, परेल, मुंबई सेंट्रल, बोरिवली आगारात आंबा पेट्या पोचविण्यात येणार आहेत.

कोकणातील एस.टी. आगारापासून मुंबई पुण्यातील एसटी आगारापर्यंत मालवाहतुकीची उत्तम सेवा करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बारा तासात आंबे मुंबईला रवाना होत असल्याने आंबा खराब होण्याची शक्यता नाही. वाहतुकीमध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे आंबा खराब झाल्यास विमा संरक्षणाची हमी महामंडळाने दिली आहे. मुंबईतील ग्राहकांनी आपल्या आंब्याच्या पेट्या आगारातून जमा करण्याची सुविधा केली आहे. तरी सर्व आंबा बागायतदारांनी अथवा ग्राहकांनी जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.