शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

लॉकडाऊनमध्ये आंबा वाहतुकीसाठी एस.टी.ची ‘किसान रथ सेवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐन आंबा हंगामात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आंबा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गतवर्षीप्रमाणे यावर्षीही ऐन आंबा हंगामात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आंबा बागायतदारांना आंबा मुंबई, पुण्याच्या बाजारपेठेत पाठविणे अवघड बनले आहे. त्यासाठी एस.टी.ने आंबा वाहतुकीसाठी तयारी दर्शविली असून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अनेक बागायतदार मार्केटऐवजी खासगी विक्रीवर विशेष भर देत आहेत. त्यासाठी ‘शेतकरी ते ग्राहक’ संकल्पना यशस्वी करण्यासाठी एस.टी. महामंडळ सिंधुदुर्ग, रत्नागिरी एसटी आगार येथून दररोज किसान रथ वाहतूक सेवा सुरू करणार आहे. वेंगुर्ला, मालवण, देवगड, विजयदुर्ग, कुडाळ आगारातून आंब्याच्या पेट्या जमा करून पनवेल, वाशी, ठाणे, कुर्ला, परेल, मुंबई सेंट्रल, बोरिवली आगारात आंबा पेट्या पोचविण्यात येणार आहेत.

कोकणातील एस.टी. आगारापासून मुंबई पुण्यातील एसटी आगारापर्यंत मालवाहतुकीची उत्तम सेवा करण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी बारा तासात आंबे मुंबईला रवाना होत असल्याने आंबा खराब होण्याची शक्यता नाही. वाहतुकीमध्ये काही नैसर्गिक आपत्ती किंवा अपघातामुळे आंबा खराब झाल्यास विमा संरक्षणाची हमी महामंडळाने दिली आहे. मुंबईतील ग्राहकांनी आपल्या आंब्याच्या पेट्या आगारातून जमा करण्याची सुविधा केली आहे. तरी सर्व आंबा बागायतदारांनी अथवा ग्राहकांनी जवळच्या आगार व्यवस्थापकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.