शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पाचे ठाम समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

- सुहास पाटील, माजी सरपंच, सोलगाव ---------------------------------- प्रकल्पांतर्गत बाधित गावातील सर्व ग्रामस्थांना तालुक्यापर्यंतचा पक्का रस्ता, मोफत परिवहन व्यवस्था, अव्याहत ...

- सुहास पाटील, माजी सरपंच, सोलगाव

----------------------------------

प्रकल्पांतर्गत बाधित गावातील सर्व ग्रामस्थांना तालुक्यापर्यंतचा पक्का रस्ता, मोफत परिवहन व्यवस्था, अव्याहत वीजपुरवठा, सर्व घरांना नळपाणी योजना, गावच्या शैक्षणिक संस्थांचे पुनर्नवीकरण व सर्वात महत्त्वाचे म्हणजे परिपूर्ण वैद्यकीय सुविधा ज्यात एमबीबीएस डॉक्टर्ससह सर्व पीएचसींचे नूतनीकरण व आवश्यक साधनसामुग्रीचा पुरवठा, शिवाय बचत गटांना सहाय्य आणि रोजगार इत्यादी अपेक्षित आहे. प्रकल्प न आल्यास यातील कोणतीही सुविधा ग्रामस्थांना मिळणार नाही. ती एनजीओ अथवा प्रकल्पाचे बेगडी विरोधक पुरवणार आहेत का?

- विनायक कदम, बारसू ग्रामस्थ

-------------------------

पर्यावरणवाद्यांनी नाणार पंचक्रोशीत महिलांना घरगुती उद्योग निर्मिती करून देऊ, याकरिता मेळावे घेतले होते व पतपुरवठा करण्याची वचने दिली होती. त्यापैकी गेल्या चार वर्षांत किती महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला व किती पतपुरवठा केला, याचा तपशील जाहीर करा. पर्यावरण रक्षणाचे ढोल वाजविणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत कोकणात किती झाडे लावली व कोठे याबद्दल माहिती द्यावी.

- सुरज पेडणेकर, भाजप पदाधिकारी, धाेपेश्वर

------------------------------

कोविडच्या या कठीण काळात रिफायनरीने भारतभर कोविड केअर सेंटरची निर्मिती केली. रूग्णांना थेट ऑक्सिजनचा पुरवठा केला. राजापूर तालुक्यात चोवीस तास मोफत रूग्णवाहिका सेवा उपलब्ध करून दिली. यापैकी एनजीओंनी कोणते कार्य कधी, कोठे व कसे केले, याची माहिती राजापूर तालुक्याला द्यावी. केवळ आपल्या स्वार्थासाठी प्रकल्प होऊ घातलेल्या भागात पोहोचणाऱ्या एनजीओंनी आपल्या उदरनिर्वाहाची साधने जाहीर करावीत व कोकणात येऊन राहावे.

- डॉ. सुनील राणे, नाटे

---------------------------

सोलगावच्या कातळावर रिफायनरी प्रकल्प आल्यास या प्रकल्पामुळे एक ते दीड लाख नोकऱ्या निर्माण होणार आहेत. त्यापैकी आमच्या ग्रामस्थांना प्राधान्याने प्रशिक्षण व नोकरी व्यवसायाची तरतूद या प्रकल्पाद्वारे होऊ घातली आहे. बाधित गावांसोबत असा करार करण्यास कंपनी तयार आहे. प्रकल्प रद्द झाल्यास अशाप्रकारची कोणती तरतूद प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांकडे आहे, याची माहिती तालुकावासीयांना द्यावी.

- मनोहर गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष, बारसू़

-----------------------------------

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभ्यासाअंती रिफायनरी प्रकल्पाला आपले जाहीर समर्थन दिलेले आहे. राज ठाकरे यांचा महाराष्ट्राचा दांडगा अभ्यास आहे. त्यामुळे विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या कोकणचा विकास करण्याची क्षमता या प्रकल्पामुळे असल्याचे त्यांनी ताडले आहे. त्यांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असणार, याची खात्री आम्हाला आहेच. त्यामुळे आमच्या भागात प्रकल्प येण्यासाठी आम्ही कायमच पुढे राहू.

- राजाराम खांबल, मनसे उपतालुकाध्यक्ष, राजापूर

----------------------------------

इतर शहरे आणि गावे पाहता व राजापूर तालुक्याच्या ग्रामीण भागाचा विचार करता, या तालुक्याच्या सर्वांगिण विकासाला आणखी पन्नास वर्षे लागू शकतात. मात्र, हाच विकास एखाद्या प्रकल्पामुळे नजिकच्या काळात होणारा असेल तर ही संधी नाकारणे म्हणजे कपाळकरंटेपणा ठरेल. रोजगार, व्यवसायाच्या संधी आणि शैक्षणिक व आरोग्याच्या परिपूर्ण सुविधा विकासाच्या संकल्पना यापेक्षा वेगळ्या काय असणार, तेव्हा आम्ही आमच्या भागात येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाचे समर्थन केले नाही तर तो भावी पिढी आणि तालुक्यावरचा अन्याय ठरेल.

- सुभाष श्रुंगारे, राजवाडी