शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
5
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
6
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
7
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
8
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
9
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
10
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
11
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
12
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
13
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
14
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
15
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
16
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
17
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
18
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
19
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
20
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!

स्थानकासाठी कडवईत रेलरोकोचा प्रयत्न

By admin | Updated: January 28, 2015 00:52 IST

पाच वर्षे प्रयत्न सुरूच : मंजूर केलेल्या थांब्याचाही प्रश्न जैसे थे, १५ दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन

आरवली : संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथे रेल्वेस्थानक व्हावे, या मागणीसाठी सन २००९ पासून जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना व कडवई पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे प्रयत्न सुुरु होते. २०१०च्या उपोषणानंतर रेल्वेस्थानकाऐवजी या ठिकाणी थांबा मंजूर करण्यात आला. परंतु पाच वर्षे उलटूनही निधीअभावी थांब्याचे काम न झाल्याने प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ग्रामस्थांतर्फे रेल्वे रोकोचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेनंतर येत्या १५ दिवसात बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.कडवई येथे रेल्वे स्थानकाची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. या मागणीसाठी वारंवार आंदोलने झाल्यानंतर स्थानकाऐवजी थांबा मंजूर झाला. मात्र, या थांब्याचा प्रश्नही अजून तसाच आहे. कडवई येथे मंजूर रेल्वेथांब्याच्या या आंदोलनात पक्षभेद विसरुन सर्वांनी संघटित व्हावे, यासाठी जितेंद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्याला कडवई सरपंच बापू कदम यांच्यासह दिलावर खान, गजानन ओकटे, देवजी ओकटे, अंकुश ओकटे, राजेंद्र नांदलस्कर, मोहन ओकटे यांनी पाठिंबा देत हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. यासाठी जवळपास पन्नास लोकांची समिती स्थापन करण्यात आली होती. यामुळे तहसीलदार वैशाली माने व पोलीस निरीक्षक मोहन चिखले यांनी रेल्वे प्रशासनाकडे चर्चा करण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन कडवई ग्रामपंचायत कार्यालयात क्षेत्रीय रेल्वेप्रबंधक बाळासाहेब जगताप, टी. मंजुनाथ, पोलीस निरीक्षक मोहन चिखले, रेल्वे पोलीस अधिकारी यांच्यासह आंदोलकांची सुमारे चार तास बैठक झाली.यामध्ये रेल्वे प्रबंधक बाळासाहेब जगताप यांनी २०१०ला थांबा मंजूर झाल्याचे मान्य करीत निधीअभावी हे काम झाले नसल्याचे सांगितले. याकरिता जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीची मागणी केली असून, यासाठी लागणारा ३६ लाखाचा निधी देण्याची तयारी या दोन्ही कार्यालयांनी दाखविल्याची माहिती देताच बैठकीतील वातावरण तापले. जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी निधी नसताना जिल्हा प्रशासन निधी कसा देणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. आम्हाला प्रशासनाचा निधी नको. रेल्वे प्रशासनाकडूनच निधी घेऊन १ मे रोजी या थांब्याचे उद्घाटन व्हावे, अशी मागणी करण्यात आली.यावेळी जितेंद्र चव्हाण, राजेंद्र सुर्वे, तुरळ सरपंच अरविंद जाधव, राजवाडे सरपंच संतोष घडवलकर, राजन कापडी, माधव चव्हाण, शांताराम सुर्वे यांनी आपली भूमिका मांडली. जोपर्यंत ठोस उत्तर मिळत नाही तोपर्यंत रेल्वे ट्रॅकवर जमाव थांबेल, अशी भूमिका आंदोलकांनी घेतल्याने वातावरण तप्त झाले. यावेळी नेतृत्व करणाऱ्या लोकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य उत्तर द्या, अशी मागणी केली. त्यानुसार जगताप यांनी येत्या १५ दिवसांत निधीबाबत ठोस भूमिका घेऊन रेल्वेचे व्यवस्थापक संचालक यांच्याशी बैठक घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. (वार्ताहर)पाच वर्षे उलटूनही निधीअभावी थांब्याचे काम थांबलेलेच.प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ग्रामस्थांतर्फे रेल्वे रोकोचा प्रयत्न.जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निधीची मागणी करण्यात आल्याच्या रेल्वे अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर ग्रामस्थ संतापले.१ मे रोजी थांब्याचे उद्घाटन करण्याची मागणी.