शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
4
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
5
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
6
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
7
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
8
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
9
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
10
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
11
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
12
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
13
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
14
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
15
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
16
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
17
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
18
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
19
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
20
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'

रत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणी, दहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.

ठळक मुद्देरत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणीदहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये व कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी परीक्षा केंद्राच्या आवाराबाहेर विद्यार्थ्यांच्या सॅक, बॅग्ज् ठेवण्यात आल्या होत्या. पारदर्शक पॅड, कंपास बॉक्स, रिसीट तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्गात सोडण्यात येत होते.

परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच लगबग सुरू होती. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत, त्या शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नियमित वेळेत बदल करून दुपारच्या सत्रात या शाळा भरविण्यात येणार आहेत.कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके तैनात असून, एका महिला विशेष भरारी पथकाचाही समावेश करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी प्रथमच कृतिपत्रिका पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे.दहावीच्या परीक्षा दि. २२ मार्चला संपणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ४०३ शाळांमधील २३,८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांमधील ११,४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील ६२८ शाळांमधून ३५ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

कोकण विभागात ११४ केंद्र असून, यातील रत्नागिरीमध्ये ७३, तर सिंधुदुर्गमध्ये ४१ केंद्र आहेत. २२ परीरक्षक केंद्र असून, यामध्ये रत्नागिरीमध्ये १३ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ९ परीरक्षक केंद्र आहेत. हजेरी पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी प्रवेशच रद्द करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ५८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. कोकण विभागातील ३५९ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्यांना लेखनिक उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी