शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

रत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणी, दहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.

ठळक मुद्देरत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणीदहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये व कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी परीक्षा केंद्राच्या आवाराबाहेर विद्यार्थ्यांच्या सॅक, बॅग्ज् ठेवण्यात आल्या होत्या. पारदर्शक पॅड, कंपास बॉक्स, रिसीट तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्गात सोडण्यात येत होते.

परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच लगबग सुरू होती. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत, त्या शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नियमित वेळेत बदल करून दुपारच्या सत्रात या शाळा भरविण्यात येणार आहेत.कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके तैनात असून, एका महिला विशेष भरारी पथकाचाही समावेश करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी प्रथमच कृतिपत्रिका पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे.दहावीच्या परीक्षा दि. २२ मार्चला संपणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ४०३ शाळांमधील २३,८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांमधील ११,४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील ६२८ शाळांमधून ३५ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

कोकण विभागात ११४ केंद्र असून, यातील रत्नागिरीमध्ये ७३, तर सिंधुदुर्गमध्ये ४१ केंद्र आहेत. २२ परीरक्षक केंद्र असून, यामध्ये रत्नागिरीमध्ये १३ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ९ परीरक्षक केंद्र आहेत. हजेरी पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी प्रवेशच रद्द करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ५८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. कोकण विभागातील ३५९ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्यांना लेखनिक उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी