शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

रत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणी, दहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 11:41 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.

ठळक मुद्देरत्नागिरीत कॉपी रोखण्यासाठी कडक तपासणीदहावी परीक्षा केंद्रांवर पालकांची झुंबड

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला दि. १ मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कोकण विभागातून ३५ हजार ३०७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. पहिला पेपर मराठी भाषेचा होता. विद्यार्थ्यांपेक्षा अधिक घालमेल पालकांचीच होत असल्याचे दिसून येत होते.परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये व कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, यासाठी परीक्षा केंद्राच्या आवाराबाहेर विद्यार्थ्यांच्या सॅक, बॅग्ज् ठेवण्यात आल्या होत्या. पारदर्शक पॅड, कंपास बॉक्स, रिसीट तपासणी करूनच विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी वर्गात सोडण्यात येत होते.

परीक्षा केंद्रावर सकाळपासूनच लगबग सुरू होती. ज्या शाळांमध्ये परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत, त्या शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. नियमित वेळेत बदल करून दुपारच्या सत्रात या शाळा भरविण्यात येणार आहेत.कॉपीचे प्रकार टाळण्यासाठी सात भरारी पथके तैनात असून, एका महिला विशेष भरारी पथकाचाही समावेश करण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी प्रथमच कृतिपत्रिका पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे.दहावीच्या परीक्षा दि. २२ मार्चला संपणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ४०३ शाळांमधील २३,८५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २२५ शाळांमधील ११,४५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दोन्ही जिल्ह्यातील ६२८ शाळांमधून ३५ हजार ३०७ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

कोकण विभागात ११४ केंद्र असून, यातील रत्नागिरीमध्ये ७३, तर सिंधुदुर्गमध्ये ४१ केंद्र आहेत. २२ परीरक्षक केंद्र असून, यामध्ये रत्नागिरीमध्ये १३ केंद्र, तर सिंधुदुर्गमध्ये ९ परीरक्षक केंद्र आहेत. हजेरी पूर्ण न भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी प्रवेशच रद्द करण्यात आले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील ५८ व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करण्यात आले आहेत. कोकण विभागातील ३५९ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना मान्यता देऊन त्यांना लेखनिक उपलब्ध करण्याची सुविधा देण्यात आली आहे.

टॅग्स :examपरीक्षाRatnagiriरत्नागिरी