शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
2
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
3
मराठी की हिंदू, महापौर कोण होणार? भाजपा नेते कृपाशंकर सिंह पुन्हा बोलले; "मुंबईचा महापौर..."
4
Arjun Tendulkarचा विजय हजारे स्पर्धेत फ्लॉप शो; ३ सामने खेळून झाले, तरी एकही विकेट मिळेना
5
केवळ १६ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा १ कोटींहून अधिक परतावा; SIP ठरतेय वरदान, सोपं गणित पाहा
6
KDMC Election 2026: कल्याण डोंबिवलीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे ३ उमेदवार बिनविरोध विजयी; प्रभाग २४मध्ये जल्लोष
7
संघर्षाची गाथा! वडिलांची नोकरी गेली; मोमोज विकत लेकीने NEET क्रॅक केली, आता होणार डॉक्टर
8
१५ ऑगस्ट… बुलेट ट्रेन मुहूर्त ठरला! पहिला रुट कोणता, मुंबईत कधी सुरू होणार? मोठी माहिती समोर
9
GST संकलनातून भरली सरकारची तिजोरी; डिसेंबरमध्ये 6% वाढीसह ₹1.74 लाख कोटी पार...
10
Municipal Election 2026: भाजपाचा विजयरथ सुसाट! मतदानाआधी ११ उमेदवार बिनविरोध जिंकले, कुठे-कुठे फुलले कमळ?
11
पुण्यात भाजपाला धक्का, अधिकृत उमेदवाराने अर्ज घेतला मागे; माघारीनंतर पूजा मोरेंना अश्रू अनावर
12
Vastu Tips : नवीन वर्षाचे कॅलेंडर या दिशेला ठेवू नका; नाही तर अडचणी येऊ शकतात
13
Ahilyanagar Election 2025: मतदानाआधीच 'बिनविरोध' निकालांचा पाऊस; अहिल्यानगरमध्ये अजित पवारांचे दोन उमेदवार विजयी
14
ठरले! स्लीपर वंदे भारत ‘या’ तारखेपासून प्रवासी सेवेत, तिकीट दरही आले; PM मोदी करणार लोकार्पण
15
या देशात पत्र पाठवण्याची सेवा बंद, ४०१ वर्षांची परंपरा संपली; असे करणारा जगातील पहिलाच देश ठरला
16
२०२६ मध्ये राज्यसभेतील गणित बदलणार; महाराष्ट्रातील एका जागेसह ७५ जागांचं भवितव्य ठरणार
17
आयटी रिटर्नची मुदत संपली तरी आशा कायम! 'या' मार्गाने मिळवू शकता रखडलेला टॅक्स रिफंड
18
निवडणुकीसाठी अपक्षांना पाव, वाटाणे अन् अक्रोड अशी १९४ मुक्त चिन्हे, 'रिक्षा' चिन्हाची मोठी मागणी
19
AI दिसत नाही, पण आहे सर्वत्र! आपल्या रोजच्या आयुष्यात AI ने नेमकं काय बदललं?
20
नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान बारमध्ये भीषण स्फोट, १० जणांचा होरपळून मृत्यू, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

cyclone- रत्नागिरीत उद्या पहाटे वादळ धडकण्याची शक्यता, प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:33 IST

cyclone Ratnagiri : कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) सायंकाळी तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (१६ मे) पहाटेपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देरत्नागिरीत उद्या पहाटे वादळ धडकण्याची शक्यता, प्रशासन सज्ज प्रशासनाच्या नियमावलीला प्रत्येकाने सहकार्य करा: उदय सामंत

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) सायंकाळी तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (१६ मे) पहाटेपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, किनारपट्टीवर धडकणाऱ्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला या भागांनाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांच्या सर्व बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत, खलाशांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन सज्ज असून, पोलिसांना, महसूल खाते यांना सूचना करण्यात आल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी दोन बैठका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.वादळामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोविड सेंटरच्या ठिकाणी जनरेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. अत्यावश्यक परिस्थितीत स्थलांतर करण्याची तयारीही करण्यात आली आहे. प्रत्येकाने काळजी घेत प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. एनडीआरएफच्या टीमशी जिल्हाधिकारी सतत संपर्कात आहेत.मागील अनुभव विचारात ग्रामीण भागातील संपर्क तुटण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लाकूड कापण्याचे कटर, जेसीबी तयार ठेवण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांसह रत्नागिरी शहरातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. कोणीही विनाकारण समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहनही सामंत यांनी केले आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत