शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

cyclone- रत्नागिरीत उद्या पहाटे वादळ धडकण्याची शक्यता, प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:33 IST

cyclone Ratnagiri : कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) सायंकाळी तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (१६ मे) पहाटेपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देरत्नागिरीत उद्या पहाटे वादळ धडकण्याची शक्यता, प्रशासन सज्ज प्रशासनाच्या नियमावलीला प्रत्येकाने सहकार्य करा: उदय सामंत

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) सायंकाळी तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (१६ मे) पहाटेपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, किनारपट्टीवर धडकणाऱ्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला या भागांनाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांच्या सर्व बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत, खलाशांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन सज्ज असून, पोलिसांना, महसूल खाते यांना सूचना करण्यात आल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी दोन बैठका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.वादळामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोविड सेंटरच्या ठिकाणी जनरेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. अत्यावश्यक परिस्थितीत स्थलांतर करण्याची तयारीही करण्यात आली आहे. प्रत्येकाने काळजी घेत प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. एनडीआरएफच्या टीमशी जिल्हाधिकारी सतत संपर्कात आहेत.मागील अनुभव विचारात ग्रामीण भागातील संपर्क तुटण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लाकूड कापण्याचे कटर, जेसीबी तयार ठेवण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांसह रत्नागिरी शहरातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. कोणीही विनाकारण समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहनही सामंत यांनी केले आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत