शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

cyclone- रत्नागिरीत उद्या पहाटे वादळ धडकण्याची शक्यता, प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 14:33 IST

cyclone Ratnagiri : कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) सायंकाळी तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (१६ मे) पहाटेपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देरत्नागिरीत उद्या पहाटे वादळ धडकण्याची शक्यता, प्रशासन सज्ज प्रशासनाच्या नियमावलीला प्रत्येकाने सहकार्य करा: उदय सामंत

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवर येणाऱ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. प्रशासनाने नागरिकांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१५ मे) सायंकाळी तर रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (१६ मे) पहाटेपर्यंत हे वादळ धडकण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, किनारपट्टीवर धडकणाऱ्या वादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, राजापूर, गुहागर, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांना धोका पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच सिंधुदुर्गातील मालवण, वेंगुर्ला या भागांनाही धोका पोहोचू शकतो. त्यामुळे या भागातील नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या मच्छिमारांच्या सर्व बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत, खलाशांची कोरोना चाचणीही करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन सज्ज असून, पोलिसांना, महसूल खाते यांना सूचना करण्यात आल्या आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यानी दोन बैठका घेतल्याचेही त्यांनी सांगितले.वादळामुळे वीज पुरवठा खंडीत होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे कोविड सेंटरच्या ठिकाणी जनरेटर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये याची काळजी घेण्यात आली आहे. अत्यावश्यक परिस्थितीत स्थलांतर करण्याची तयारीही करण्यात आली आहे. प्रत्येकाने काळजी घेत प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. एनडीआरएफच्या टीमशी जिल्हाधिकारी सतत संपर्कात आहेत.मागील अनुभव विचारात ग्रामीण भागातील संपर्क तुटण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे लाकूड कापण्याचे कटर, जेसीबी तयार ठेवण्यात आले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील १०४ गावांसह रत्नागिरी शहरातील नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. कोणीही विनाकारण समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहनही सामंत यांनी केले आहे.

टॅग्स :cycloneचक्रीवादळRatnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत