शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

अजूनही पावसाची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने पावसाचा जोर काही दिवस कायम राहील, असे वाटू लागले होते. मात्र, ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने पावसाचा जोर काही दिवस कायम राहील, असे वाटू लागले होते. मात्र, पावसाची सुरुवात अजूनही निराशाजनकच असून, ऊन आणि पाऊस यांचा खेळच सध्या सुरू आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात २४० मिलीमीटर (२६.७१ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.

गुरुवारपासून पावसाने जोर घेतला होता. मात्र, एकाच दिवसात पुन्हा प्रमाण कमी झाले आहे. ९ ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे गुरुवारपासून सुरुवात केलेल्या पावसाचा जोर काही दिवस कायम राहील, असे वाटत होते. प्रत्यक्षात गुरुवारनंतर ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. जोरदार पाऊस पडेल, असे वाटू लागते. मात्र, थोड्याच वेळात ऊन पडू लागते.

सध्या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाची हीच स्थिती आहे. त्यामुळे शेतीच्या कामांना खीळ बसली असून, अनेक भागांमध्ये लावणीची कामे खाेळंबली आहेत. बळीराजा पावसाची प्रतीक्षा करीत आहे. मात्र, अजूनही पावसाची हुलकावणी सुरूच आहे. गेल्या २४ तासांत नोंदविलेल्या एकूण पावसापैकी गुहागर आणि लांजा तालुक्यात अधिक पावसाची नोंद झाली असून, इतर तालुक्यांमध्ये हलका पाऊस झाला आहे.