शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

अजूनही बेफिकिरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट ...

मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट चाकरमानी अजूनही गावी त्या संख्येने आलेले नाहीत. मे महिन्यात उन्हाळी सुट्टीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी यावर्षी गावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता त्यांनाही दोष देता येणार नाही. याचाच अर्थ गावपातळीवर होणारे कार्यक्रम व अन्य समारंभ त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अन्यथा शहरात घोंगावणारा कोरोना खेड्यातील दऱ्याखोऱ्यात पोहचूच शकला नसता. त्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी होणारे लोकच कोरोनाचे खरे प्रसारक आहेत. त्यांनी अशा कार्यक्रमांवर वेळीच नियंत्रण आणायला हवे. त्यासाठी ग्रामपंचायत व ग्राम कृती दलाने सक्रिय होण्याची गरज आहे. तसेच जनजागृतीच्या माध्यमातून संबंधित लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. अन्यथा ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेत कोरोनाचा सामना करणे कठीण होईल. आजच्या घडीला शहरातील बहुतांश रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. हा सिलसिला असाच सुरु राहिल्यास ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. काही बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जारी केली आहेत, तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जात आहेत. याचाच अर्थ प्रशासकीय यंत्रणेवर येऊ घातलेला ताण लक्षात घेण्याची गरज आहे.

- संदीप बांद्रे