शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

अजूनही बेफिकिरी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:32 IST

मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट ...

मागील लॉकडाऊन वेळी मुंबई, पुण्यातील चाकरमानी गावी आल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. मात्र, यावेळी तशी परिस्थिती नाही. याउलट चाकरमानी अजूनही गावी त्या संख्येने आलेले नाहीत. मे महिन्यात उन्हाळी सुट्टीत गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी यावर्षी गावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता त्यांनाही दोष देता येणार नाही. याचाच अर्थ गावपातळीवर होणारे कार्यक्रम व अन्य समारंभ त्यासाठी कारणीभूत ठरत आहेत. अन्यथा शहरात घोंगावणारा कोरोना खेड्यातील दऱ्याखोऱ्यात पोहचूच शकला नसता. त्यामुळे अशा कार्यक्रमात सहभागी होणारे लोकच कोरोनाचे खरे प्रसारक आहेत. त्यांनी अशा कार्यक्रमांवर वेळीच नियंत्रण आणायला हवे. त्यासाठी ग्रामपंचायत व ग्राम कृती दलाने सक्रिय होण्याची गरज आहे. तसेच जनजागृतीच्या माध्यमातून संबंधित लोकांची मानसिकता बदलण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. अन्यथा ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य यंत्रणेत कोरोनाचा सामना करणे कठीण होईल. आजच्या घडीला शहरातील बहुतांश रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. त्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. हा सिलसिला असाच सुरु राहिल्यास ही परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही. काही बाजारपेठेत गर्दी टाळण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र जारी केली आहेत, तर काही दुकानदारांवर दंडात्मक कारवाई व गुन्हे दाखल केले जात आहेत. याचाच अर्थ प्रशासकीय यंत्रणेवर येऊ घातलेला ताण लक्षात घेण्याची गरज आहे.

- संदीप बांद्रे