शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
4
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
5
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
6
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
7
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
8
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
9
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
10
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
11
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
12
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
13
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
14
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
15
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
16
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
17
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
18
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
19
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”

निवृत्तिवेतन वेळेत न मिळाल्यास राज्यभरात धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:31 IST

चिपळूण : मार्च महिना संपत आला तरी जिल्हा परिषद सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतन मिळालेले नाही. नियमित निवृत्तिवेतन मिळण्यासाठी काही महिन्यांपासून ग्रामविकास ...

चिपळूण : मार्च महिना संपत आला तरी जिल्हा परिषद सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतन मिळालेले नाही. नियमित निवृत्तिवेतन मिळण्यासाठी काही महिन्यांपासून ग्रामविकास विभागाकडे सातत्याने सेवानिवृृत्त समितीचा पाठपुरावा सुरू आहे. तरीही त्यात नियमितता नाही. ट्रेझरी अथवा स्वतंत्र खाते निर्माण करून सर्वच सेवानिवृत्तांना निवृत्तिवेतन द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी समितीने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याची दखल न घेतल्यास राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडले जाईल. तसेच राज्य सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

राज्य सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत निवृत्तिवेतन अदा करावे, असे परिपत्रक शासनाने २००९ मध्ये काढले होते. निवृत्तिवेतन वेळेत न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेशही दिले होते. याबाबत माहिती देताना महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी समितीचे अध्यक्ष विनायक घटे, सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, राज्यनेते सीताराम जोशी म्हणाले की, मे २०२० नंतर निवृत्तिवेतन देण्यास विलंब होत आहे. राज्यात सुमारे २२ लाख सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बहुतांश सेवानिवृत्तिधारकांचा खर्च हा त्यांच्या आरोग्यावर होतो. १ ते ५ तारखेपर्यंत निवृत्तिवेतन देण्याचा निर्णय असताना गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत नियमित वेतन होत नाही. यासाठी ग्रामविकास, अर्थमंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा केला. केवळ कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर मिळते. ही कार्यवाही आणखी किती दिवस सुरू राहणार आहे, हे सांगितले जात नाही.

निवृत्तिवेतनापोटी अनुदान मिळाल्याशिवाय जिल्हा परिषद काही करू शकत नाही. त्यासाठी ट्रेझरीमधून निवृत्तिवेतन देण्याची मागणी समितीने केली.

समितीने शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळेच १९६० नंतर रत्नागिरी जिल्हा परिषदेत सेवानिवृत्तांसाठी वेगळा विभाग केला आहे. राज्यातील ही पहिलीच घटना आहे. नियमित निवृत्तिवेतनासाठी शासनाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे. याची दखल न घेतल्यास राज्यातील सर्वच जिल्हाधिकारी कार्यालयांवर सेवानिवृत्त कर्मचारी धरणे आंदोलन करतील. समितीने उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी केली आहे. आंध्रप्रदेशमधील सेवानिवृत्ती वेतनावरच उच्च न्यायालयाने निकाल दिला. वेतन उशिरा केल्यास सहा टक्के व्याज देण्याचे आदेशही दिले आहेत, असा दावा समिती पदाधिकाऱ्यांनी केला.

या निवेदनावर समितीचे मानद अध्यक्ष शंकरराव शेडगे, तालुकाध्यक्ष उस्मान बांगी, सेक्रेटरी राजाराम सावर्डेकर, कार्याध्यक्ष वसंत साळवी, संघटक अनंत पवार, आदींनी सह्या केल्या आहेत.

..................

निवृत्तिवेतन नियमित होण्यासाठी आम्ही सतत पाठपुरावा करतो आहोत. मंत्रालयातील अधिकारी केवळ कार्यवाहीचेच उत्तर देतात. शासनाची चालढकल सुरू असल्याने निवृृत्तिवेतनधारक हैराण झाले आहेत. काही सदस्य आजारी असल्याने संस्थेकडे सततचे फोन येऊ लागले आहेत. राज्यभरातील सेवानिवृत्त कर्मचारी आक्रमक होत असल्याने आंदोलन छेडण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

सीताराम शिंदे

राज्य नेते, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचारी समिती

...............

अर्थमंत्र्यांची सचिवांना विनंती?

याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही इमेलद्वारे प्रत दिली आहे. त्यावर उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री पवार यांनी त्याच मेलवर या संघटनेला पत्र पाठविले आणि त्या पत्रात या प्रश्नी लक्ष देण्याची विनंती सचिवांना केल्याने संघटनेने आश्चर्य व्यक्त केले आहे.