शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

सेतू कार्यालयात दलालांचे राज्य...

By admin | Updated: June 13, 2014 01:34 IST

सामान्यांची परवड : निव्वळ दाखल्यांवर हजारोंची कमाई

रत्नागिरी : येथील तहसिल कार्यालयात विविध दाखल्यांसाठी सध्या वाढती गर्दी आहे. मात्र, या कार्यालय परिसरात कार्यरत असलेले दलाल हजारो रूपये उकळून आपली चांदी करून घेत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांचा लगाम नसलेल्या या दलालांना सध्या चांगलेच मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांच्या सह्या व्हायच्या आहेत, असे सांगितले जात असतानाच या दलालांकडून हजारो रूपये पैसे देऊन काम करून घेणाऱ्यांना सह्या कशा लगेच मिळतात, असा सवाल होत आहे. सध्या येथील सेतू कार्यालयात विविध परीक्षा आणि भरती यासाठी लागणारे विविध दाखले तसेच शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी दर दिवशी गर्दी होत आहे. यासाठी अनेकांनी दोन महिन्यापूर्वी या कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, अधिकारी वर्गाची सही व्हायचीय, या कारणावरून बऱ्याचजणांचे दाखले या कार्यालयाकडे रखडलेले आहेत. काही वेळा अधिकारीच दौऱ्यावर आहेत, असे सांगून या लोकांना परत पाठविले जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जात आहे. मध्यंतरी पालकमंत्री उदय सामंत यांनी सेतू कार्यालयाला भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी या कार्यालयाच्या समस्या समजून घेतानाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना नागरिकांच्या दाखल्यांचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून सेतू कार्यालयाचा कारभार मनमानी पद्धतीने चालला आहे. सेतूत सध्या आठ ते नऊ दलाल कार्यरत आहेत. ठराविक धनवान लोकांकडून त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे उत्त्पन्न मिळत आहे. त्यामुळे या दलालांचा हाच व्यवसाय झाला आहे. त्यांना काही शासकीय अधिकाऱ्यांचाही वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. सामान्य माणसाला अधिकारी दौऱ्यावर गेलेत, असे सांगितले जात असून त्यांच्या सहीसाठी हजारो दाखले रखडवून ठेवले जात आहेत. मात्र, काही ठराविक लोकांनाच दलालांबरोबरच काही शासकीय अधिकारीच सह्या मिळवून देत आहेत. त्यामुळे दौऱ्यांवर असलेले अधिकारी लगेचच कसे काय अवर्तीण होतात, असा सवालही केला जात आहे. सध्या सेतू कार्यालयात सामान्य माणसाची रखडपट्टी होत आहे. (प्रतिनिधी)