शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
Crime: चुलती- पुतण्याचे अनैतिक संबंध, नवरा ठरत होता अडसर, 'असा' काढला काटा!
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

सेतू कार्यालयात दलालांचे राज्य...

By admin | Updated: June 13, 2014 01:34 IST

सामान्यांची परवड : निव्वळ दाखल्यांवर हजारोंची कमाई

रत्नागिरी : येथील तहसिल कार्यालयात विविध दाखल्यांसाठी सध्या वाढती गर्दी आहे. मात्र, या कार्यालय परिसरात कार्यरत असलेले दलाल हजारो रूपये उकळून आपली चांदी करून घेत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांचा लगाम नसलेल्या या दलालांना सध्या चांगलेच मोकळे रान मिळाले आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना अधिकाऱ्यांच्या सह्या व्हायच्या आहेत, असे सांगितले जात असतानाच या दलालांकडून हजारो रूपये पैसे देऊन काम करून घेणाऱ्यांना सह्या कशा लगेच मिळतात, असा सवाल होत आहे. सध्या येथील सेतू कार्यालयात विविध परीक्षा आणि भरती यासाठी लागणारे विविध दाखले तसेच शैक्षणिक कामकाजासाठी लागणारे दाखले मिळविण्यासाठी दर दिवशी गर्दी होत आहे. यासाठी अनेकांनी दोन महिन्यापूर्वी या कार्यालयाकडे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे. मात्र, अधिकारी वर्गाची सही व्हायचीय, या कारणावरून बऱ्याचजणांचे दाखले या कार्यालयाकडे रखडलेले आहेत. काही वेळा अधिकारीच दौऱ्यावर आहेत, असे सांगून या लोकांना परत पाठविले जात आहे. त्यामुळे सामान्य जनतेचा पैसा आणि वेळ दोन्हीही वाया जात आहे. मध्यंतरी पालकमंत्री उदय सामंत यांनी सेतू कार्यालयाला भेट दिली आणि त्यावेळी त्यांनी या कार्यालयाच्या समस्या समजून घेतानाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना नागरिकांच्या दाखल्यांचे काम मार्गी लागण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सांगितले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावून सेतू कार्यालयाचा कारभार मनमानी पद्धतीने चालला आहे. सेतूत सध्या आठ ते नऊ दलाल कार्यरत आहेत. ठराविक धनवान लोकांकडून त्यांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे उत्त्पन्न मिळत आहे. त्यामुळे या दलालांचा हाच व्यवसाय झाला आहे. त्यांना काही शासकीय अधिकाऱ्यांचाही वरदहस्त असल्याचे बोलले जात आहे. सामान्य माणसाला अधिकारी दौऱ्यावर गेलेत, असे सांगितले जात असून त्यांच्या सहीसाठी हजारो दाखले रखडवून ठेवले जात आहेत. मात्र, काही ठराविक लोकांनाच दलालांबरोबरच काही शासकीय अधिकारीच सह्या मिळवून देत आहेत. त्यामुळे दौऱ्यांवर असलेले अधिकारी लगेचच कसे काय अवर्तीण होतात, असा सवालही केला जात आहे. सध्या सेतू कार्यालयात सामान्य माणसाची रखडपट्टी होत आहे. (प्रतिनिधी)