शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टेक्निकल एमपीएससी परीक्षार्थींची सैरभैर अवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:31 IST

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी दोन वर्षे रद्द करण्यात आलेली वादग्रस्त लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पार पडली. त्यानंतर आता टेक्निकल ...

रत्नागिरी : काही दिवसांपूर्वी दोन वर्षे रद्द करण्यात आलेली वादग्रस्त लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा पार पडली. त्यानंतर आता टेक्निकल विषयासंदर्भात असलेली लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा शनिवारी, २७ रोजी आयोजित करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षेचे केंद्र केवळ मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्येच असल्याने, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना या केंद्रांवर जायचे कसे, ही विवंचना या मुलांना सतावू लागली असल्याने, आता ही मुले सैरभैर झाली आहेत.

कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेल्या लोकसेवा आयोगाच्या परीक्षा नुकत्याच झाल्या आहेत. टेक्निकल विषयासंदर्भातील परीक्षाही गेल्या एप्रिल महिन्यात होती. मात्र, तीही रद्द करून २७ मार्च रोजी होणार आहे. यासाठी केवळ मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्येच परीक्षेचे केंद्र आहे. इतर लोकसेवा आयोगाच्या परीक्षांसाठी जिल्हास्तरावर केंद्रे असतात. मात्र, या परीक्षांसाठी मुंबई वगळता कोकणात अन्य जिल्ह्यात केंद्र नाही. सध्या या शहरांमध्ये काेरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने, परीक्षेला कसे जायचे, हे मोठे संकट या विद्यार्थ्यांसमोर आहे. त्याचबरोबर या शहरांमध्ये वेगाने काेरोना वाढत असल्याने राज्य सरकारने या शहरांमध्ये लाॅकडाऊनचे संकेत दिले आहेत. त्यामुळे परीक्षेला गेल्यानंतर अचानक लाॅकडाऊन झाले, तर या शहरांमध्ये अडकण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वर्षभर ज्या परीक्षेची वाट पाहिली, त्या परीक्षेला जावं की न जावं, हा संभ्रम या मुलांमध्ये निर्माण झाला आहे. काहीजण भीतीमुळे परीक्षेला गेले नाहीत.

सध्या कोरोनाचा या शहरांमध्ये वाढू लागलेला संसर्ग पाहता, एका दिवसासाठी परीक्षेला जाणे, यातही धोका वाटू लागला आहे. त्यातच आता कोकणातील लोकप्रिय शिमग्याचे २८ आणि २९ मार्च हे दोन दिवस महत्त्वाचे असल्याने मुंबईहून येणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे एस.टी. गाड्या तसेच कोकण रेल्वेनाही आगावू आरक्षण आहे. त्यामुळे परीक्षेनंतर लगेचच परत येतानाही अडचणीचे होणार आहे. काही मुलांची केंद्रे एकाच ठिकाणी आहेत. अशा मुलांनी खासगी गाड्यांनी एकत्र जाण्या-येण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोरोनाच्या काळात या शहरात न थांबता परत येता येईल. शासनाने या परीक्षेसाठी कोकणात केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी या परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे.

कोटसाठी

एमपीएससीच्या सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरावर केंद्र आहे. टेक्निकल एमपीएससी परीक्षेसाठी मात्र ठराविक शहरांमध्येच केंद्रे ठेवली जातात. त्यामुळे कोकणातील मुलांची गैरसाेय होत आहे. याचा विचार करून या परीक्षेचे केंद्रही कोकणात व्हावे.

- साईल शिवलकर, परीक्षार्थी, रत्नागिरी