शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

एलईडी मासेमारी बंद करण्यासाठी हर्णेत साखळी उपाेषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:34 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : समुद्रातील एलईडी लाइटद्वारे हाेणारी मासेमारी बंद करण्यासाठी शासनाने कठोर कायदा करावा या मागणीसाठी दापोली ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : समुद्रातील एलईडी लाइटद्वारे हाेणारी मासेमारी बंद करण्यासाठी शासनाने कठोर कायदा करावा या मागणीसाठी दापोली - मंडणगड - गुहागर मच्छीमार संघर्ष समिती, हर्णे बंदर कमिटीतर्फे दापोली तहसील कार्यालयासमोर साेमवारपासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. शासनाला यावर जाग न आल्यास शिमगोत्सवानंतर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा हर्णे बंदर कमिटी कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावशे यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्यातील सागरी हद्दीमध्ये परप्रांतीय हायस्पीड बोटी व एलईडी लाइटद्वारे केली जाणारी पर्ससीन नेट मासेमारी या अनियंत्रित बेकायदेशीर मासेमारीमुळे सागरी मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी गेली तीन वर्षे कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ निर्माण झाला आहे. बेकायदेशीर मासेमारी रोखण्याबाबत शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे दिवसेंदिवस हायस्पीड बोटी व एलईडी बोटींची संख्या वाढत आहे. त्याची झळ पारंपरिक मच्छीमारांना बसली आहे. मच्छीमार संघटनांकडून व मच्छीमारी सहकारी संस्थांकडून लोकप्रतिनिधींमार्फत अनेकवेळा शासनाकडे लेखी निवेदने, आंदोलने या सनदशीर मार्गाने बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करूनही शासनाने बेकायदेशीर मासेमारीला अभय देऊन डोळेझाक केली आहे. बेकायदेशीर मासेमारी तत्काळ थांबवावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी संघर्ष समितीने बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण २२ मार्चपासून सुरू करण्यात आले. जोपर्यंत पारंपरिक मच्छीमारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीने दिला आहे.

जिल्ह्यात १४४ कलम लागू असल्याने उपोषण करू नये, अशी विनंती तहसीलदार वैशाली पाटील यांनी केली. परंतु मच्छीमार बांधवांनी आपण आंदोलनावर ठाम असल्याचे सांगून आंदाेलन सुरू केले.

महाविकास आघाडी सरकार पारंपरिक मच्छीमार बांधवांच्या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे. गुजरात सरकारने परराज्यातील बोटी विरोधात कायदा केला आहे. मग महाराष्ट्राचे सरकार असा कायदा का करत नाही. कर्नाटक, केरळ या राज्यातील बोटी कोकण किनारपट्टीवर हैदोस घालत आहेत. या किनारपट्टीवरची संपूर्ण मच्छी खरवडून नेली जात आहे मग आम्ही काय उपाशी मरायचे का? महाविकास आघाडी सरकारने आमच्या तोंडाला पाने पुसली असून, मच्छीमार बांधव संकटात सापडला असताना सरकारकडून कोणतीही मदत होत नसल्याचा गंभीर आरोप पंचायत समितीचे सभापती राऊफ हजवाने यांनी केला आहे.