शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

टपाल कर्मचारी २ रोजी संपावर

By admin | Updated: August 30, 2015 00:33 IST

विविध मागण्या : केेंद्र शासनाच्या धोरणावर केली टीका

रत्नागिरी : टपाल कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या २ सप्टेंबरला लाक्षणिक संपाचा निर्णय घेतला असल्याचे नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईजने जाहीर केले आहे. सध्याच्या सरकारने कामगारविरोधी व जनविरोधी धोरणांचा तडाखा सुरू केला आहे. कामगारांनी संघर्ष करून मिळविलेल्या संघटनात्मक तरतुदी, पगार, सामाजिक न्याय आदींबाबत सरकारने विरोधी भुमिका स्वीकारली आहे. यामुळे भांडवलदारांना सरकारचा पाठिंबा मिळत असल्याचा आरोप पोस्टल कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे. सत्तेवर आल्यानंतर सरकार अच्छे दिन आयेंगे, महागाई कमी करू , रोजगार निर्मिती करू ही सर्व आश्वासने विसरले आहे. महागाईचा आलेखही चढता असल्याने त्याचा फटका कर्मचाऱ्यांना बसत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. नवीन पेन्शन योजना अडचणीची आहे. मात्र, त्यात बदल करण्यास सरकार तयार नाही. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ५० टक्के महागाई भत्याचे विलीनीकरण, अंतरीम वाढ, सातवे पे कमिशन सन २०१४पासून लागू करण्यास सरकारने नकार दर्शविला आहे. डाक विभागाने तसेच सरकारने ग्रामीण डाकसेवक कर्मचाऱ्यांचा सातव्या पे कमिशनमध्ये समावेश केलेला नाही. त्यामुळे आता सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दि. २ सप्टेंबर रोजी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. हा संप सर्व टपाल कर्मचाऱ्यांनी यशस्वी करून दाखवावा, असे आवाहन नॅशनल युनियन आॅफ पोस्टल एम्प्लॉईज पोस्टमन अँड ग्रुपचे सचिव व्ही. एस. लिंगायत यांनी केले आहे. (प्रतिनिधी)