शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

एस.टी. कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:35 IST

कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन जमा लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे एस.टी. महामंडळाचे गणित पुरतेच काेलमडून गेले. भारमान कमी ...

कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचे वेतन जमा

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे एस.टी. महामंडळाचे गणित पुरतेच काेलमडून गेले. भारमान कमी असल्याने उत्पन्न तुटपूंजे मिळू लागले. उत्पन्नातून डिझेल खर्चही भागविणे अवघड बनल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, गणेशाेत्सवाच्या ताेंडावर शासनाकडून महामंडळाला निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. रत्नागिरी विभागासाठी ६ कोटी ४७ लाख रुपये प्राप्त झाले असून, त्यामधून विभागातील ४२०० कर्मचाऱ्यांचे जुलैचे वेतन खात्यावर जमा झाले आहे.

गणेशोत्सव काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागातील एस.टी. वाहतूक शंभर टक्के सुरू करण्याची सूचना करण्यात आली होती. मुंबईतूनही कोकणात १५८५ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. रत्नागिरीतून परतीसाठी १११० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. रत्नागिरी विभागातून ३७०० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. वाहतूक सुरू होती. भारमानामुळे एस.टी.चे उत्पन्न तोट्यात असल्याने डिझेल खर्च, सुटे भाग, कर्मचारी वेतनासाठी पैसे नसल्याने रत्नागिरी विभागाने महामंडळाकडे निधीसाठी मागणी केली होती. रत्नागिरीसह अन्य विभागांचाही प्रश्न जटिल बनल्यामुळे महामंडळाने शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा केला होता. महामंडळाला शासनाकडून पाचशे कोटी प्राप्त झाले असून त्यापैकी १७ कोटी रत्नागिरी विभागाला देण्यात येणार आहेत. पैकी सहा कोटी ४७ लाख रुपये जमा केल्याने विभागातील ४२०० कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. उर्वरित रक्कम येत्या दहा तारखेपर्यंत प्राप्त झाल्यास ऑगस्टचेही वेतन लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे एस.टी कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

---------------------------------

कोरोना काळातही निष्ठेने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, शासनाकडून महामंडळाला निधी प्राप्त होताच एस.टी. कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऑगस्टचे वेतनही लवकरच जमा होण्याची शक्यता आहे.

- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी