शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

गती कमी, तरीही उद्योग पूर्वपदाकडे, कामगारांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 10:31 IST

coronavirus, ratnagirinews कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने उद्योग क्षेत्राचे आर्थिक गणितच विस्कटले. मात्र, अनलॉकची प्रक्रिया मे महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांची आर्थिक चाके संथ गतीने का होईना हळूहळू रूळावर येत आहेत.

ठळक मुद्देगती कमी, तरीही उद्योग पूर्वपदाकडे, कामगारांची प्रतीक्षा सध्या स्थानिकांवर मदार

शोभना कांबळेरत्नागिरी : कोरोनाच्या अनुषंगाने सुरू झालेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत सर्व उद्योगधंदे ठप्प झाल्याने उद्योग क्षेत्राचे आर्थिक गणितच विस्कटले. मात्र, अनलॉकची प्रक्रिया मे महिन्यापासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली. त्यामुळे उद्योगधंद्यांची आर्थिक चाके संथ गतीने का होईना हळूहळू रूळावर येत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होताच देशात २३ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून मे महिन्यापर्यंत सर्व उद्योगधंदे बंद झाले. या उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे हात थांबल्याने ते रिकामे झाले. परिणामी उपासमारीची वेळ आली. उद्योजकांपुढे तर बाकीचा खर्च कसा भागवायचा, हे भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. अखेर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक प्रक्रियेला प्रारंभ झाला आणि उद्योगांना काही नियमांच्याअधीन राहून सुरु करण्यास परवानगी मिळाली. त्यामुळे काही उद्योग सुरु झाले आहेत.

रत्नागिरीत मध्यम उद्योग मोजकेच आहेत. त्यांच्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. मात्र, लघुउद्योजकांकडे तशा यंत्रणा नसल्याने छोट्या उद्योजकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अक्षरश: शुन्यात जावे अशी उद्योकांची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अजूनही परिस्थिती स्थिर झालेली नाही. त्यातच दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध नसल्याने स्थानिक कामगारांची संख्याही घटलेली आहे. त्यामुळे अजूनही उद्योजकांचे काम ५० टक्के बंद आहे.वाहतूकही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे कच्चा माल येणे आणि उत्पादन बाहेर पाठविणे, अशा दोन्ही बाबींसाठी समस्या येत आहे. बाहेरच्या राज्यातील मजूर परतणे अडचणीचे झाले आहे. त्यामुळे सध्या स्थानिकांवरच मदार ठेवत उद्योगधंदे हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. येथील औद्योगिक विकास महामंडळ कार्यालय या उद्योजकांच्या सहकार्यासाठी पुढे येत असल्याने काहीअंशी या समस्या आता दूर होत आहेत.जिल्ह्यात ३६० कोटींचा फटका बसलामे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अनलॉक प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे आता हळूहळू रत्नगिरी जिल्ह्यातील उद्योगपूर्व पदावर येत आहेत. सुमारे दोन महिने पूर्णत: उद्योग बंद राहिल्याने जिल्ह्यातील सातही क्षेत्रात सुमारे ३६० कोटींचे नुकसान झाले आहे. अजूनही कामगार, कच्चा माल आदींसह अन्य बाबतीत अडचणी येत आहेत. परंतु आता हळूहळू उद्योग पूर्वपदावर येत आहेत.

शासनाने शेतकऱ्यांप्रमाणे उद्योजकांना कर्ज, वीजबिले व अन्य बाबींमध्ये सवलत देण्याची गरज आहे. किमान छोट्या उद्योगांना या परिस्थितीत मदत दिली पाहिजे.- प्रमोद गांगण, उद्योजक, खेर्डी औद्योगिक वसाहत, चिपळूण.

निम्म्या कंपन्या जेमतेम सुरु आहेत. पन्नास टक्केच कामगार आहेत. बाहेरून येणारे मटेरियल वेळेवर येत नाही. तयार मालाला वेळेत मागणी नाही. ही स्थिती किती काळ राहील सांगता येत नाही.- डॉ. प्रशांत पटवर्धन,अध्यक्ष, लोटे

रत्नागिरीत सुमारे ८० ते ९० टक्के लघु उद्योजक आहेत. बहुतांश उद्योगांमध्ये स्थानिक आणि बाहेरच्यांचे प्रमाण निम्मे निम्मे आहे. मात्र, आता बाहेरचा मजूर वर्ग अद्याप आलेला नसल्याने पूर्ण क्षमतेने उद्योग सुरू झालेले नाहीत. बसेस किंवा ट्रेन नियमित सुरू झाल्या की, हे कामगारही परततील.- दिगंबर मगदूम,अध्यक्ष, रत्नागिरी उद्योजक संघटना

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी