शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

‘आशा वर्कर्स’चा दणदणीत मोर्चा

By admin | Updated: December 12, 2014 23:35 IST

सरकारच्या दुर्लक्षाचा निषेध : विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर

ओरोस : देशातील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी तसेच ग्रामीण व दुर्गम भागातील बालक व माता यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आशा व गटप्रवर्तक यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नाहीत. या विरोधात त्यांनी लढा उभारला असून, आपल्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र आशा वर्कर्स व गटप्रवर्तक फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. सुभाष निकम यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनने ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद भवनावर मोर्चा काढला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन व जिल्हा परिषद अध्यक्षांना सादर करण्यात आले. यावेळी विजयाराणी पाटील यांच्यासह सुमारे ३00हून आशा भगिनी उपस्थित होत्या.केंद्र सरकारने राज्य सरकारच्या सहकार्याने भारतातील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी, ग्रामीण व दुर्गम भागातील बालक व माता यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशांची नेमणूक केली आहे. या आशांना महिनाभर आरोग्य विषयक विविध कामे करुन जेमतेम ५00 ते ७00 रुपये मोबदला मिळतो. त्याच सरकारने एपीएल व बीपीएल असा भेदभाव केल्याने सेवा पुरवूनही आशांवर अन्याय केला जात आहे. आपल्या विविध मागण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा, आंदोलने करुनही अद्याप शासनाने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी आशा वर्कर्स युनियनने प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला. (वार्ताहर)जिल्हास्तरीय मागण्याकोल्हापूर जिल्हा परिषदेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार आशा नवसंजिवनी योजना सुरु करुन आशांना २00 रुपये मोबदला द्यावा. आशांना मासिक सभा भत्ता ३00 रुपये व त्रैमासिक सभेचा भत्ता १५00 रुपये देण्यात यावा. आशांना प्राथमिक आरोग्य केंद्रात व ग्रामीण रुग्णालयात सन्मानाची वागणूक द्यावी.जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय मागण्यांकडे शासनाने आत्तापर्यंत केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम गंभीर होत असून आज या युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मोर्चा काढला व त्यात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांबाबत पुढे काय होणार . राज्यस्तरीय मागण्याराष्ट्रीय आरोग्य अभियान अधिक सक्षम आणि कायम करावे. आशांना व गटप्रवर्तकांना सेवेत कायम करुन त्यांना निश्चित वेतन द्यावे. आशांना व गटप्रवर्तकांना आरोग्य सेविकेचा दर्जा द्यावा. आशांच्या मासिक व त्रैमासिक मिटिंग भत्त्यात वाढ करावी.