शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

काेकणी माणूस चेष्टाही सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

दापोली : कोकणी माणूस आत्महत्या करत नाही, परंतु चेष्टाही सहन करणार नाही, अशी संतप्त भावना सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर ...

दापोली : कोकणी माणूस आत्महत्या करत नाही, परंतु चेष्टाही सहन करणार नाही, अशी संतप्त भावना सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना दापाेलीतील मच्छीमार आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

पोटच्या मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेल्या बागा चक्रीवादळाने उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे कोकणी माणूस हतबल झाला आहे, अशा परिस्थितीत सरकारकडून दिलासा मिळण्याऐवजी तूटपुंजी मदत जाहीर झाले आहे आणि ही मदत म्हणजेच कोकणी माणसाची क्रूर चेष्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मच्छीमार बागायतदार व कोकणी माणसाने व्यक्त केल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण कोकणची धूळधाण केली होती आणि या परिस्थितीतून सावरण्याआधीच पुन्हा एकदा ताैक्ते चक्रीवादळाने कोकणची मोठी हानी केली आहे. एका वर्षात २ चक्रीवादळांचा सामना करून कोकणी माणूस हतबल झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकारकडून भरघोस मदतीची अपेक्षा होती. परंतु सरकारने आता निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. सरकारने कोकणी माणसाची पुन्हा एकदा घोर निराशा केली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारकडून आंब्याच्या एका झाडाची किंमत ५०० रुपये, तर नारळाची किंमत २५० रुपये, सुपारीची किंमत ५० रुपये देण्यात येणार आहे. कोकणी माणूस ५०० रुपये डझन आंबा विकतो. शासन ५०० रुपये दर एका झाडाला देणार असेल, तर ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, अशा प्रकारची मदत देऊन सरकारने आमची चेष्टा करू नये. तुम्ही लोकांना त्याचे शुल्क माफ करता. मात्र, शेतकऱ्यांना मदत द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, तर सोडूनच द्या, अशा भावना व्यक्त हाेत आहेत. मच्छिमारांनाही केलेली मदत पुरेशी नाही. बोटीवरील एका जाळीची किंमत ४० हजार रुपये, २५ हजार रुपये असते. परंतु सरकार मात्र ५ हजार रुपये मदत जाहीर करत असेल, तर ही निव्वळ फसणवूक आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्याचे म्हटले आहे.

-----------------------

कोकणातील अनेक बागायतदारांचे, मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवरील अनेक घरांची पडझड झाली आहे, अशा कुटुंबीयांना सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा हाेती. पण या सरकारने केवळ आम्हा कोकणी माणसाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

- दीपक महाजन, आंबा बागायतदार

---------------------------

सरकारने नुकसानापाेटी दिलेली रक्कम तूटपुंजी आहे. सरकारकडे मदत देण्यासाठी पैसे नसतील, तर त्यांनी देऊ नये. पण काेकणी माणसाची चेष्टा करू नये. काेकणी माणूस स्वाभिमानी आहे, ताे काेणापुढे हात पसरणार नाही. पण अशी चेष्टाही सहन करणार नाही.

- संदीप राजपुरे, आंबा बागायतदार