शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
2
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
3
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
4
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
5
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
6
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
7
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
8
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
9
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
10
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
11
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
12
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
13
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
14
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
15
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
16
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
17
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
18
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
19
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
20
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
Daily Top 2Weekly Top 5

काेकणी माणूस चेष्टाही सहन करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST

दापोली : कोकणी माणूस आत्महत्या करत नाही, परंतु चेष्टाही सहन करणार नाही, अशी संतप्त भावना सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर ...

दापोली : कोकणी माणूस आत्महत्या करत नाही, परंतु चेष्टाही सहन करणार नाही, अशी संतप्त भावना सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना दापाेलीतील मच्छीमार आणि बागायतदारांनी व्यक्त केली आहे.

पोटच्या मुलाबाळांप्रमाणे सांभाळलेल्या बागा चक्रीवादळाने उद्ध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे कोकणी माणूस हतबल झाला आहे, अशा परिस्थितीत सरकारकडून दिलासा मिळण्याऐवजी तूटपुंजी मदत जाहीर झाले आहे आणि ही मदत म्हणजेच कोकणी माणसाची क्रूर चेष्टा केली जात असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मच्छीमार बागायतदार व कोकणी माणसाने व्यक्त केल्या आहेत. निसर्ग चक्रीवादळाने संपूर्ण कोकणची धूळधाण केली होती आणि या परिस्थितीतून सावरण्याआधीच पुन्हा एकदा ताैक्ते चक्रीवादळाने कोकणची मोठी हानी केली आहे. एका वर्षात २ चक्रीवादळांचा सामना करून कोकणी माणूस हतबल झाला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकारकडून भरघोस मदतीची अपेक्षा होती. परंतु सरकारने आता निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे उरल्यासुरल्या आशाही धुळीस मिळाल्या आहेत. सरकारने कोकणी माणसाची पुन्हा एकदा घोर निराशा केली असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारकडून आंब्याच्या एका झाडाची किंमत ५०० रुपये, तर नारळाची किंमत २५० रुपये, सुपारीची किंमत ५० रुपये देण्यात येणार आहे. कोकणी माणूस ५०० रुपये डझन आंबा विकतो. शासन ५०० रुपये दर एका झाडाला देणार असेल, तर ही शेतकऱ्यांची चेष्टा आहे, अशा प्रकारची मदत देऊन सरकारने आमची चेष्टा करू नये. तुम्ही लोकांना त्याचे शुल्क माफ करता. मात्र, शेतकऱ्यांना मदत द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत, तर सोडूनच द्या, अशा भावना व्यक्त हाेत आहेत. मच्छिमारांनाही केलेली मदत पुरेशी नाही. बोटीवरील एका जाळीची किंमत ४० हजार रुपये, २५ हजार रुपये असते. परंतु सरकार मात्र ५ हजार रुपये मदत जाहीर करत असेल, तर ही निव्वळ फसणवूक आहे. लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्याचे म्हटले आहे.

-----------------------

कोकणातील अनेक बागायतदारांचे, मच्छिमारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवरील अनेक घरांची पडझड झाली आहे, अशा कुटुंबीयांना सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा हाेती. पण या सरकारने केवळ आम्हा कोकणी माणसाच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले आहे.

- दीपक महाजन, आंबा बागायतदार

---------------------------

सरकारने नुकसानापाेटी दिलेली रक्कम तूटपुंजी आहे. सरकारकडे मदत देण्यासाठी पैसे नसतील, तर त्यांनी देऊ नये. पण काेकणी माणसाची चेष्टा करू नये. काेकणी माणूस स्वाभिमानी आहे, ताे काेणापुढे हात पसरणार नाही. पण अशी चेष्टाही सहन करणार नाही.

- संदीप राजपुरे, आंबा बागायतदार