शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

श्रीफळाने पळवले तोंडचे पाणी महागाईचा उच्चांक : २२ ते २४ रुपयांपर्यंत दर वाढले

By admin | Updated: May 15, 2014 00:42 IST

राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे

राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे. केरळ आणि बंगळूरुमध्ये खोबर्‍याचे उत्पादन घटले असून, त्यामुळे सुक्या खोबर्‍याच्या दरातही दामदुप्पट वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात ही दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळते. एप्रिलमध्ये ७० ते ७५ रुपये किलो दराने विकले जाणारे खोबरे आता १४० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. हा खोबर्‍याच्या दराचा उच्चांक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षात नारळाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असली तरीही कोकणात विविध रोग पडल्याने नारळ उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे केरळ आणि बंगळूरू येथून होणारी नारळाची आयात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन वापरासाठी कोकणात नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यातच आता लग्नसराई असल्याने नारळाला मोठी मागणी आहे. मात्र, मागणीच्या मानाने पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात १० ते १५ रुपयांना नारळ उपलब्ध होत होता. तोही आता २२ ते २४ रुपयांना घ्यावा लागत आहे. एका लग्न समारंभात कमीत कमी ७० ते ८० नारळाचा वापर होतो. मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त जास्त असल्याने याकाळात नारळाची मागणी वाढते. (प्रतिनिधी) राजापुरी खोबरेही महागले फार पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले राजापुरी खोबरेही दरवाढीत मागे राहिलेले नाही. सध्या घाऊक बाजारात १४० ते १५० रुपये, तर किरकोळ स्वरूपात १५५ ते १६० रुपये प्रतिकिलो दराने राजापुरी खोबरे उपलब्ध आहे. साखरही झाली कडू पश्चिम महाराष्टÑातून येणारी साखरही गेल्या महिनाभरात महाग झाली आहे. २९ ते ३० रुपये असणारा प्रतिकिलो दर ३२ ते ३३ रुपयांपर्यंत गेला आहे. किरकोळ बाजारात साखर ३३ ते ३४ रुपये दराने विकली जात आहे. उसाचे कमी उत्पादन व परदेशातून साखर येत नसल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.