शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

श्रीफळाने पळवले तोंडचे पाणी महागाईचा उच्चांक : २२ ते २४ रुपयांपर्यंत दर वाढले

By admin | Updated: May 15, 2014 00:42 IST

राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे

राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे. केरळ आणि बंगळूरुमध्ये खोबर्‍याचे उत्पादन घटले असून, त्यामुळे सुक्या खोबर्‍याच्या दरातही दामदुप्पट वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात ही दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळते. एप्रिलमध्ये ७० ते ७५ रुपये किलो दराने विकले जाणारे खोबरे आता १४० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. हा खोबर्‍याच्या दराचा उच्चांक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षात नारळाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असली तरीही कोकणात विविध रोग पडल्याने नारळ उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे केरळ आणि बंगळूरू येथून होणारी नारळाची आयात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन वापरासाठी कोकणात नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यातच आता लग्नसराई असल्याने नारळाला मोठी मागणी आहे. मात्र, मागणीच्या मानाने पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात १० ते १५ रुपयांना नारळ उपलब्ध होत होता. तोही आता २२ ते २४ रुपयांना घ्यावा लागत आहे. एका लग्न समारंभात कमीत कमी ७० ते ८० नारळाचा वापर होतो. मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त जास्त असल्याने याकाळात नारळाची मागणी वाढते. (प्रतिनिधी) राजापुरी खोबरेही महागले फार पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले राजापुरी खोबरेही दरवाढीत मागे राहिलेले नाही. सध्या घाऊक बाजारात १४० ते १५० रुपये, तर किरकोळ स्वरूपात १५५ ते १६० रुपये प्रतिकिलो दराने राजापुरी खोबरे उपलब्ध आहे. साखरही झाली कडू पश्चिम महाराष्टÑातून येणारी साखरही गेल्या महिनाभरात महाग झाली आहे. २९ ते ३० रुपये असणारा प्रतिकिलो दर ३२ ते ३३ रुपयांपर्यंत गेला आहे. किरकोळ बाजारात साखर ३३ ते ३४ रुपये दराने विकली जात आहे. उसाचे कमी उत्पादन व परदेशातून साखर येत नसल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.