शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
हरल्यावरही बक्षीस मिळतं पहिल्यांदाच पाहिलं! पाकच्या लष्कर प्रमुखांची सोशल मीडियावर उडतेय खिल्ली
4
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
5
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
6
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
7
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
8
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
9
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
10
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
11
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
12
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
13
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
14
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
15
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
16
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
17
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
18
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
19
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले

श्रीफळाने पळवले तोंडचे पाणी महागाईचा उच्चांक : २२ ते २४ रुपयांपर्यंत दर वाढले

By admin | Updated: May 15, 2014 00:42 IST

राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे

राजापूर : महागाईने उच्चांक गाठला असताना ऐन लग्नसराईत श्रीफळाने तोंडचे पाणी पळवले आहे. पूर्वी १० ते १५ रुपयांना उपलब्ध होणारा नारळ आता २२ ते २४ रुपयांना विकला जात आहे. केरळ आणि बंगळूरुमध्ये खोबर्‍याचे उत्पादन घटले असून, त्यामुळे सुक्या खोबर्‍याच्या दरातही दामदुप्पट वाढ झाली आहे. गेल्या महिनाभरात ही दुप्पट वाढ झाल्याचे पाहायला मिळते. एप्रिलमध्ये ७० ते ७५ रुपये किलो दराने विकले जाणारे खोबरे आता १४० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहे. हा खोबर्‍याच्या दराचा उच्चांक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही वर्षात नारळाची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असली तरीही कोकणात विविध रोग पडल्याने नारळ उत्पादनावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे केरळ आणि बंगळूरू येथून होणारी नारळाची आयात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. दैनंदिन वापरासाठी कोकणात नारळाचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यातच आता लग्नसराई असल्याने नारळाला मोठी मागणी आहे. मात्र, मागणीच्या मानाने पुरवठा होत नसल्याने दरात वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात १० ते १५ रुपयांना नारळ उपलब्ध होत होता. तोही आता २२ ते २४ रुपयांना घ्यावा लागत आहे. एका लग्न समारंभात कमीत कमी ७० ते ८० नारळाचा वापर होतो. मे महिन्यात विवाहाचे मुहूर्त जास्त असल्याने याकाळात नारळाची मागणी वाढते. (प्रतिनिधी) राजापुरी खोबरेही महागले फार पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले राजापुरी खोबरेही दरवाढीत मागे राहिलेले नाही. सध्या घाऊक बाजारात १४० ते १५० रुपये, तर किरकोळ स्वरूपात १५५ ते १६० रुपये प्रतिकिलो दराने राजापुरी खोबरे उपलब्ध आहे. साखरही झाली कडू पश्चिम महाराष्टÑातून येणारी साखरही गेल्या महिनाभरात महाग झाली आहे. २९ ते ३० रुपये असणारा प्रतिकिलो दर ३२ ते ३३ रुपयांपर्यंत गेला आहे. किरकोळ बाजारात साखर ३३ ते ३४ रुपये दराने विकली जात आहे. उसाचे कमी उत्पादन व परदेशातून साखर येत नसल्याने ही दरवाढ झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.