शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

गाळ उपसा करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:29 IST

कचऱ्यामुळे दुर्गंधी रत्नागिरी : शहरासह विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा संकलनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची वाहने फिरत असतानादेखील काही नागरिक रस्त्यावरच ...

कचऱ्यामुळे दुर्गंधी

रत्नागिरी : शहरासह विविध ग्रामपंचायतींच्या हद्दीत कचरा संकलनासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची वाहने फिरत असतानादेखील काही नागरिक रस्त्यावरच कचरा फेकत आहेत. अनेक ठिकाणी कचरा न टाकण्याचे बोर्ड लावूनसुद्धा त्या ठिकाणी कचरा फेकून दुर्गंधी पसरवित आहेत.

महिला उद्योजकांचा सत्कार

दापोली : येथील जेसीआय संस्थेतर्फे शहरातील व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजिका म्हणून काम करणाऱ्या मात्र आजपर्यंत कधीही प्रकाशझोतात न आलेल्या महिला व्यावसायिकांचा सन्मान करण्यात आला. आकांक्षा जाधव, सुप्रिया सकपाळ, नूतन वैद्य, मुग्धा धारप, शामल जालगावकर, दीपिका करमरकर आदींना गौरविण्यात आले.

आरोग्य सुपीकता फलक

रत्नागिरी : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत प्रत्येक महसुली गावात आरोग्य सुपीकता निर्देशांक खत मात्रा फलक लावण्याची सूचना तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी केली आहे. ग्रामपंचायतीला पत्रके देऊन निर्देशांक फलक तयार करण्याची कारवाई सुरु झाली आहे.

वातावरणात बदल

रत्नागिरी : तापमानातील बदलामुळे दिवसा उकाडा तर रात्री गारवा जाणवत आहे. दिवसा ३६ अंश सेल्सिअसवर तापमान पोहोचत असून सायंकाळी मात्र घट होऊन २५ ते २६ अंशावर पारा येऊन ठेपत आहे. उकाडा आणि थंडी या विषम तापमानामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे.

मानधनापासून वंचित

रत्नागिरी : पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून सेवा बजावणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांना मानधनच मिळालेले नाही. शासनाच्या सर्व खात्यांतील कर्मचाऱ्यांचे वेतन होत आहे. गृहरक्षक दलाच्या जवानांमधील पॅड कर्मचाऱ्यांचे पगारही होत आहेत. मात्र, मानसेवी गृहरक्षक दलाचे जवान (होमगार्ड) मात्र मानधनापासून वंचित असून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.

माकडांचा उपद्रव

रत्नागिरी : तालुक्यातील जाकादेवी परिसरात माकडांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. भाजीपाला, पिके तसेच काजू, आंबा, नारळ बागांमध्ये शिरुन तयार फळांचे नुकसान करीत आहेत. त्यामुळे सातत्याने पहारा ठेवावा लागत आहे. वन विभागाकडून कारवाईची मागणी होत आहे.

खड्डे बुजविण्याची मागणी

रत्नागिरी : शहरातील रामआळी परिसरातील खड्डे न बुजविल्यामुळे श्री भैरीच्या पालखीला खड्डेमय रस्त्यातूनच न्यावे लागले. त्यामुळे भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. वर्दळीच्या मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

माठ विक्रीला

रत्नागिरी : गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखले जाणारे माठ विक्रीला आले आहेत. २५० ते ५०० रुपयांपर्यंत माठांच्या किमती सांगण्यात येत आहेत. काळ्या तसेच तांबड्या मातीचे माठ विक्रीसाठी उपलब्ध असून नळ असलेल्या माठांना विशेष मागणी होत आहे.

काजू बीच्या दरात घसरण

रत्नागिरी : काजू बी आवक बाजारात सुरू झाली आहे. १३० रुपयांपर्यंत असलेला काजूचा दर घसरला असून ११० ते ११५ रुपये दराने खरेदी सुरू आहे. यावर्षी उत्पादन कमी असताना दरही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.