शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

संथ प्रशासकीय यंत्रणा उद्योगाला त्रासदायक

By admin | Updated: October 9, 2015 22:10 IST

धनंजय दातार : कामगार कायद्याच्या पालनाबाबत परदेशांमध्ये कार्यतत्परता

रत्नागिरी : दुबईतील शासकीय निर्णय अतिशय जलद आहेत. आपल्याकडील प्रशासकीय यंत्रणा अतिशय संथ आहे. त्यामुळे कामाला लगेचच सुरुवात करता येत नाही. तसेच कामगार कायद्याचे पालनही तिथे चांगल्या तऱ्हेने होते. त्यामुळे कामगारांना हक्क लगेचच दिला जातो, मात्र, आपल्याकडे त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याची खंत दुबईस्थित प्रसिद्ध मसाले उद्योजक धनंजय दातार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांसमोर व्यक्त केली. येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात धनंजय दातार यांचे ‘स्वकर्तृत्त्वातून यशस्वी वाटचाल’ या विषयावर आज (शुक्रवारी) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीदेखील मांडल्या.मूळ चिपळूण येथील असणाऱ्या दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या. दुबईत उद्योग विस्तार करताना आपण महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मुले मुंबई, पुण्याला सहजच जातात, पण तिथून पुढे जाण्याचे धाडस करीत नाहीत. ते त्यांनी करायला हवे. संधीचा फायदा कसा घ्यावा, हे आपल्यावर अवलंबून आहे, असे म्हणाले.दातार यांनी दुबईतील अनुभव व्यक्त करताना सांगितले की, आपल्याकडे कामगारांना दिला जाणारा पगार अतिशय कमी आहे, त्या तुलनेने परदेशात कितीतरी पटीने जास्त असतो. तसेच कामगार कायद्याचेही पालन चांगल्या तऱ्हेने केले जाते. मात्र, आपल्याकडे कामगार संघटनांकडूनही कामगारांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कामगार कायद्याबाबत आखाती देशात कुठलाही कर नसल्याने त्याचा फायदा उद्योजकांना घेता येतो, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कामावर श्रद्धा हवी, पडेल ते काम करण्याची तयारी हवी, नवनवीन शिकण्याची इच्छा असेल आणि जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर मोठे बनता येते. कोकणामध्ये डेव्हलपमेंट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी वंदना दातार, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कार्यवाह प्राची जोशी, उद्योजक आनंद देसाई, प्रज्ञा भिडे, अमित उकेरीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मूळचे चिपळूण येथील असणारे दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या आहेत. दुबईत त्यांनी आपला उद्योग विस्तार वाढवला आहे. महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिले आहे.