शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
5
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
6
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
7
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
8
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
9
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
10
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
11
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
12
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
13
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
14
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
15
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
16
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
17
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  
18
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
19
सोनं खरं आहे खोटं घरबसल्या चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
20
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध

संथ प्रशासकीय यंत्रणा उद्योगाला त्रासदायक

By admin | Updated: October 9, 2015 22:10 IST

धनंजय दातार : कामगार कायद्याच्या पालनाबाबत परदेशांमध्ये कार्यतत्परता

रत्नागिरी : दुबईतील शासकीय निर्णय अतिशय जलद आहेत. आपल्याकडील प्रशासकीय यंत्रणा अतिशय संथ आहे. त्यामुळे कामाला लगेचच सुरुवात करता येत नाही. तसेच कामगार कायद्याचे पालनही तिथे चांगल्या तऱ्हेने होते. त्यामुळे कामगारांना हक्क लगेचच दिला जातो, मात्र, आपल्याकडे त्याची कोणत्याही प्रकारे अंमलबजावणी होत नसल्याची खंत दुबईस्थित प्रसिद्ध मसाले उद्योजक धनंजय दातार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांसमोर व्यक्त केली. येथील गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात धनंजय दातार यांचे ‘स्वकर्तृत्त्वातून यशस्वी वाटचाल’ या विषयावर आज (शुक्रवारी) व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणेतील त्रुटीदेखील मांडल्या.मूळ चिपळूण येथील असणाऱ्या दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या. दुबईत उद्योग विस्तार करताना आपण महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रातील मुले मुंबई, पुण्याला सहजच जातात, पण तिथून पुढे जाण्याचे धाडस करीत नाहीत. ते त्यांनी करायला हवे. संधीचा फायदा कसा घ्यावा, हे आपल्यावर अवलंबून आहे, असे म्हणाले.दातार यांनी दुबईतील अनुभव व्यक्त करताना सांगितले की, आपल्याकडे कामगारांना दिला जाणारा पगार अतिशय कमी आहे, त्या तुलनेने परदेशात कितीतरी पटीने जास्त असतो. तसेच कामगार कायद्याचेही पालन चांगल्या तऱ्हेने केले जाते. मात्र, आपल्याकडे कामगार संघटनांकडूनही कामगारांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. कामगार कायद्याबाबत आखाती देशात कुठलाही कर नसल्याने त्याचा फायदा उद्योजकांना घेता येतो, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कामावर श्रद्धा हवी, पडेल ते काम करण्याची तयारी हवी, नवनवीन शिकण्याची इच्छा असेल आणि जबाबदारी घेण्याची तयारी असेल तर मोठे बनता येते. कोकणामध्ये डेव्हलपमेंट असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी वंदना दातार, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कार्यवाह प्राची जोशी, उद्योजक आनंद देसाई, प्रज्ञा भिडे, अमित उकेरीकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)मूळचे चिपळूण येथील असणारे दातार कुटुंबाच्या मागील तीन पिढ्या अकोल्यात स्थायिक झाल्या आहेत. दुबईत त्यांनी आपला उद्योग विस्तार वाढवला आहे. महाराष्ट्रातील कामगारांना प्राधान्य दिले आहे.