शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

जिल्हा परिषदेतर्फे घोषवाक्य लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घोषवाक्य स्पर्धेचे ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घोषवाक्य स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.

हागणदारीमुक्तीबाबत लोकांमध्ये जाणीव, जागृती निर्माण करण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाव संकल्पना राबवणे, कुटुंब, गाव, शाळा, अंगणवाडीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, कचरा वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन हे यामागील उद्देश आहेत. जिल्ह्यातील सर्व गावे व ग्रामपंचयती घोषवाक्य स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक आहे.

शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, ओला, सुका कचरा व प्लास्टिक वर्गीकरण हे विषय स्पर्धेमध्ये हाताळायचे आहेत. दि. ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित ग्रामसेवकांनी लिहिलेली घोषवाक्यांची छायाचित्रे एकत्रितपणे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावीत. गटविकास अधिकारी घोषवाक्य लिहिलेल्या ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकार हे आलेल्या अहवालांची छाननी करून त्यातील १० ग्रामपंचायतींची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. यामध्ये पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी घोषवाक्य लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन ही चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. जाखड यांनी केले आहे.