शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतर्फे घोषवाक्य लेखन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:35 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घोषवाक्य स्पर्धेचे ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छ भारत मिशन टप्पा-२ अंतर्गत १ सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर या कालावधीत घोषवाक्य स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी दिली.

हागणदारीमुक्तीबाबत लोकांमध्ये जाणीव, जागृती निर्माण करण्यासाठी तसेच लोकसहभाग वाढविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गाव संकल्पना राबवणे, कुटुंब, गाव, शाळा, अंगणवाडीमध्ये स्वच्छतेचे महत्त्व सांगणे, कचरा वर्गीकरण, सांडपाणी व्यवस्थापन हे यामागील उद्देश आहेत. जिल्ह्यातील सर्व गावे व ग्रामपंचयती घोषवाक्य स्पर्धेत सहभागी होणे बंधनकारक आहे.

शौचालयाचा नियमित वापर, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, सांडपाणी व कचरा व्यवस्थापन, ओला, सुका कचरा व प्लास्टिक वर्गीकरण हे विषय स्पर्धेमध्ये हाताळायचे आहेत. दि. ९ ते १५ सप्टेंबर या कालावधीत संबंधित ग्रामसेवकांनी लिहिलेली घोषवाक्यांची छायाचित्रे एकत्रितपणे गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावीत. गटविकास अधिकारी घोषवाक्य लिहिलेल्या ग्रामपंचायतींची प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. २१ ते २७ सप्टेंबर या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकार हे आलेल्या अहवालांची छाननी करून त्यातील १० ग्रामपंचायतींची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत. यामध्ये पहिल्या तीन ग्रामपंचायतींची निवड करून त्याचा अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी घोषवाक्य लेखन स्पर्धेत सहभाग घेऊन ही चळवळ गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. जाखड यांनी केले आहे.