शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

अवघे चिपळूण उद्ध्वस्त, मदतकार्याला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

चिपळूण : इतिहासात प्रथमच महापुराचे पाणी १५ फुटांहून अधिक उंचीपर्यंत शिरल्याने अवघे चिपळूण शहर व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. ...

चिपळूण : इतिहासात प्रथमच महापुराचे पाणी १५ फुटांहून अधिक उंचीपर्यंत शिरल्याने अवघे चिपळूण शहर व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता शहरातील पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली आहे. शासकीय आपत्कालिन यंत्रणेपेक्षा स्थानिक लोक व रत्नागिरी, जयगड, दाभोळ या भागातून पाणी व खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत. शनिवारी सकाळपासून व्यापाऱ्यांनी व नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बाजारपेठेत साफसफाई मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील प्रत्येक रस्त्यावर खराब झालेल्या मालाचे ढिगारे रचले आहेत.

यापूर्वी २००५मधील महापुराची रेषा लक्षात घेता, काहींनी अंतिम टप्प्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि काही तासातच होत्याचे नव्हते झाले. साधारणपणे चिपळूण बाजारपेठेतील तीन हजार दुकाने तर ५ हजाराहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. काहींच्या मदतीला सोसायटीतील लोकं वेळीच धावून काही प्रमाणात नुकसान टाळता आले. बऱ्याचजणांनी वरच्या मजल्यावर साहित्य हलवले. परंतु, बंगल्यात राहणाऱ्यांच्या मदतीला कोणीही न गेल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

आरोग्य विभागाकडून १५ आरोग्य पथकांच्या माध्यमातून त्या - त्या भागात वैद्यकीय मदत दिली जात आहे. याशिवाय नगर परिषदेचे ८० सफाई कामगार सफाई मोहिमेत सहभागी झाले आहेत. बहुतांशी दुकानांबाहेर खराब झालेल्या मालाचे ढीग साचल्याने त्या - त्या मालाचा पंचनामा सुरु केला आहे. मात्र, त्याचवेळी पंचनामे कशा पद्धतीने करणार व नुकसानभरपाईचे निकष जाणून घेण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी अद्यापही दुकाने उघडलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती व उपाध्यक्ष सुभाष बने व कोकण आयुक्तांनी शनिवारी बाजारपेठेत पाहणी करून नियोजनासाठी बैठक घेतली. त्यानुसार तातडीने मदतकार्य व उपाययोजना सुरु केल्या आहेत.

-----------------------------

अजूनही मदत पोहोचली नाही

महापुराची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काही तास उलटले तरी शहरातील गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर, वाणी आळी, काविळतळी, शंकरवाडी, मार्कंडी, रावतळे, बुरमतळी, पागमळा, खेंड या भागालाही महापुराचा जोरदार फटका बसला आहे. मात्र, अजूनही या भागात कोणतीही मदत पोहोचलेली नाही. या भागात खाद्यपदार्थ व पाण्यासाठी मोठी ओरड सुरु झाली आहे.

----------------------------

बँका, मेडिकललाही मोठा फटका

शहरातील बहुतांशी बँका व मेडिकल तळमजल्यात व मुख्य रस्त्यालगत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी चिपळूण अर्बन बँक व अन्य शासकीय बँका व एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सर्व मेडिकल पाण्याखाली गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

----------------------------------------

पाण्याचा प्रश्न गंभीर

सध्या नगर परिषदच्या खेर्डी व गोवळकोट येथील पंप हाऊसची यंत्रणा निकामी झाल्याने व विहिरीत पुराचे पाणी जाऊन गाळ साचल्याने शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अजूनही वीज पुरवठा खंडित आहे. त्यासाठी दोन २५० किलो व्हॅटचे जनरेटर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ते उपलब्ध होताच शहरात पाणी पुरवठा सुरु केला जाणार आहे.