शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

अवघे चिपळूण उद्ध्वस्त, मदतकार्याला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:26 IST

चिपळूण : इतिहासात प्रथमच महापुराचे पाणी १५ फुटांहून अधिक उंचीपर्यंत शिरल्याने अवघे चिपळूण शहर व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. ...

चिपळूण : इतिहासात प्रथमच महापुराचे पाणी १५ फुटांहून अधिक उंचीपर्यंत शिरल्याने अवघे चिपळूण शहर व परिसर उद्ध्वस्त झाला आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजता शहरातील पाणी पूर्णपणे ओसरल्यानंतर मदतकार्याला सुरुवात झाली आहे. शासकीय आपत्कालिन यंत्रणेपेक्षा स्थानिक लोक व रत्नागिरी, जयगड, दाभोळ या भागातून पाणी व खाद्यपदार्थ पुरवले जात आहेत. शनिवारी सकाळपासून व्यापाऱ्यांनी व नगर परिषदेच्या सफाई कामगारांनी बाजारपेठेत साफसफाई मोहीम सुरू केली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील प्रत्येक रस्त्यावर खराब झालेल्या मालाचे ढिगारे रचले आहेत.

यापूर्वी २००५मधील महापुराची रेषा लक्षात घेता, काहींनी अंतिम टप्प्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न अपयशी ठरला आणि काही तासातच होत्याचे नव्हते झाले. साधारणपणे चिपळूण बाजारपेठेतील तीन हजार दुकाने तर ५ हजाराहून जास्त घरांचे नुकसान झाले आहे. काहींच्या मदतीला सोसायटीतील लोकं वेळीच धावून काही प्रमाणात नुकसान टाळता आले. बऱ्याचजणांनी वरच्या मजल्यावर साहित्य हलवले. परंतु, बंगल्यात राहणाऱ्यांच्या मदतीला कोणीही न गेल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

आरोग्य विभागाकडून १५ आरोग्य पथकांच्या माध्यमातून त्या - त्या भागात वैद्यकीय मदत दिली जात आहे. याशिवाय नगर परिषदेचे ८० सफाई कामगार सफाई मोहिमेत सहभागी झाले आहेत. बहुतांशी दुकानांबाहेर खराब झालेल्या मालाचे ढीग साचल्याने त्या - त्या मालाचा पंचनामा सुरु केला आहे. मात्र, त्याचवेळी पंचनामे कशा पद्धतीने करणार व नुकसानभरपाईचे निकष जाणून घेण्यासाठी काही व्यापाऱ्यांनी अद्यापही दुकाने उघडलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती व उपाध्यक्ष सुभाष बने व कोकण आयुक्तांनी शनिवारी बाजारपेठेत पाहणी करून नियोजनासाठी बैठक घेतली. त्यानुसार तातडीने मदतकार्य व उपाययोजना सुरु केल्या आहेत.

-----------------------------

अजूनही मदत पोहोचली नाही

महापुराची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर काही तास उलटले तरी शहरातील गोवळकोट, पेठमाप, मुरादपूर, वाणी आळी, काविळतळी, शंकरवाडी, मार्कंडी, रावतळे, बुरमतळी, पागमळा, खेंड या भागालाही महापुराचा जोरदार फटका बसला आहे. मात्र, अजूनही या भागात कोणतीही मदत पोहोचलेली नाही. या भागात खाद्यपदार्थ व पाण्यासाठी मोठी ओरड सुरु झाली आहे.

----------------------------

बँका, मेडिकललाही मोठा फटका

शहरातील बहुतांशी बँका व मेडिकल तळमजल्यात व मुख्य रस्त्यालगत आहेत. त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी चिपळूण अर्बन बँक व अन्य शासकीय बँका व एटीएमचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय सर्व मेडिकल पाण्याखाली गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

----------------------------------------

पाण्याचा प्रश्न गंभीर

सध्या नगर परिषदच्या खेर्डी व गोवळकोट येथील पंप हाऊसची यंत्रणा निकामी झाल्याने व विहिरीत पुराचे पाणी जाऊन गाळ साचल्याने शहरात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. अजूनही वीज पुरवठा खंडित आहे. त्यासाठी दोन २५० किलो व्हॅटचे जनरेटर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ते उपलब्ध होताच शहरात पाणी पुरवठा सुरु केला जाणार आहे.