शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शीव, वाशिष्ठी नद्या घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

पुराच्या पाण्याचा धोका होणार कमी

चिपळूण : जलसंपदा विभागाच्या पाखरण कार्यक्रमाअंतर्गत चिपळूण शहरातील शीव व वाशिष्ठी नद्यांतील गाळ काढण्याचे नियोजन झाले आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढल्यामुळे शहरातील पुराच्या पाण्याचा धोका कमी होईल, अशी माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी आज (रविवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे या दोन्ही नद्यांतील गाळ कायमस्वरुपी काढण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांसह नगर परिषद प्रशासनाने सातत्याने शासनाकडे केली होती. त्यानुसार नगर परिषदेने विविध ठरावांद्वारे पत्रव्यवहार केला. या गोष्टीचा आपण पाठपुरावा केल्यामुळे शीव व वाशिष्ठी नद्या गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पावली उचलली आहेत. परिणामी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरात येणारा गाळ काढल्यामुळे पुराचे संकट काहीअंशी कमी होणार आहे. भविष्यात हे शहर पूर्णपणे पूरमुक्त होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. सन २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन्ही नद्या गाळाने भरल्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरात पाणी शिरण्याचा धोका संभवतो. २००५ नंतर वाशिष्ठीतील गाळ उपसा काही प्रमाणात झाला. त्याचप्रमाणे नगर परिषदेने स्वनिधीतून शीव नदीतील गाळ काढण्याचे काम गेली ७ ते ८ वर्षे केले. मात्र, याला मोठा खर्च येत असल्याने शासनाकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याला यश आले आहे. जलसंपदा विभागातर्फे साखरण कार्यक्रमाअंतर्गत या दोन्ही नद्यांतील संपूर्ण गाळ अलोरे अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या खर्चातून काढला जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले.अंदाजे १२० स. घ. मी. गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अंदाजपत्रक, रेखाचित्र व निधी आदींचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश पत्रान्वये देण्यात आले आहेत. पोफळी कोंडफणसवणे पुलानजीकच्या मोरीचे विस्थापीकरण व पर्जन्य उपादान योजनेच्या आयोगाच्या वरील भागातील नदीपात्रातील गाळ काढणे आदी कामांचा तातडीने या कामात समावेश केला असल्याने आता लवकरच चिपळूण शहर पूरमुक्त होऊन दोन्ही नद्या गाळमुक्त होणार आहेत. धोकादायक पूररेषाही संपुष्टात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)प्राधान्याने करणार काम२००५ नंतर शासनाच्या माध्यमातून पूररेषा आखण्यात आली. या पूररेषेमुळे शहरातील बांधकामावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पूररेषेत येणाऱ्या बांधकामांना परवानगी मिळणे अशक्य झाले होते. शहराची भौगोलिक रचना पाहता शहर खोलगट भागात वसल्याने शहर परिसरातील नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीत पूररेषेमध्ये बांधकाम करता येत नव्हते. शहराचा वाढता विस्तार व वाढती नागरी वस्ती लक्षात घेता शहर पूररेषा व पूरमुक्त करण्यासाठी दोन्ही नद्यांमधील गाळ काढणे गरजेचे होते. गाळ काढण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे, असे रमेश कदम यांनी सांगितले.