शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शीव, वाशिष्ठी नद्या घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

पुराच्या पाण्याचा धोका होणार कमी

चिपळूण : जलसंपदा विभागाच्या पाखरण कार्यक्रमाअंतर्गत चिपळूण शहरातील शीव व वाशिष्ठी नद्यांतील गाळ काढण्याचे नियोजन झाले आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढल्यामुळे शहरातील पुराच्या पाण्याचा धोका कमी होईल, अशी माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी आज (रविवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे या दोन्ही नद्यांतील गाळ कायमस्वरुपी काढण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांसह नगर परिषद प्रशासनाने सातत्याने शासनाकडे केली होती. त्यानुसार नगर परिषदेने विविध ठरावांद्वारे पत्रव्यवहार केला. या गोष्टीचा आपण पाठपुरावा केल्यामुळे शीव व वाशिष्ठी नद्या गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पावली उचलली आहेत. परिणामी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरात येणारा गाळ काढल्यामुळे पुराचे संकट काहीअंशी कमी होणार आहे. भविष्यात हे शहर पूर्णपणे पूरमुक्त होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. सन २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन्ही नद्या गाळाने भरल्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरात पाणी शिरण्याचा धोका संभवतो. २००५ नंतर वाशिष्ठीतील गाळ उपसा काही प्रमाणात झाला. त्याचप्रमाणे नगर परिषदेने स्वनिधीतून शीव नदीतील गाळ काढण्याचे काम गेली ७ ते ८ वर्षे केले. मात्र, याला मोठा खर्च येत असल्याने शासनाकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याला यश आले आहे. जलसंपदा विभागातर्फे साखरण कार्यक्रमाअंतर्गत या दोन्ही नद्यांतील संपूर्ण गाळ अलोरे अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या खर्चातून काढला जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले.अंदाजे १२० स. घ. मी. गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अंदाजपत्रक, रेखाचित्र व निधी आदींचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश पत्रान्वये देण्यात आले आहेत. पोफळी कोंडफणसवणे पुलानजीकच्या मोरीचे विस्थापीकरण व पर्जन्य उपादान योजनेच्या आयोगाच्या वरील भागातील नदीपात्रातील गाळ काढणे आदी कामांचा तातडीने या कामात समावेश केला असल्याने आता लवकरच चिपळूण शहर पूरमुक्त होऊन दोन्ही नद्या गाळमुक्त होणार आहेत. धोकादायक पूररेषाही संपुष्टात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)प्राधान्याने करणार काम२००५ नंतर शासनाच्या माध्यमातून पूररेषा आखण्यात आली. या पूररेषेमुळे शहरातील बांधकामावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पूररेषेत येणाऱ्या बांधकामांना परवानगी मिळणे अशक्य झाले होते. शहराची भौगोलिक रचना पाहता शहर खोलगट भागात वसल्याने शहर परिसरातील नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीत पूररेषेमध्ये बांधकाम करता येत नव्हते. शहराचा वाढता विस्तार व वाढती नागरी वस्ती लक्षात घेता शहर पूररेषा व पूरमुक्त करण्यासाठी दोन्ही नद्यांमधील गाळ काढणे गरजेचे होते. गाळ काढण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे, असे रमेश कदम यांनी सांगितले.