शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

शीव, वाशिष्ठी नद्या घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

पुराच्या पाण्याचा धोका होणार कमी

चिपळूण : जलसंपदा विभागाच्या पाखरण कार्यक्रमाअंतर्गत चिपळूण शहरातील शीव व वाशिष्ठी नद्यांतील गाळ काढण्याचे नियोजन झाले आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढल्यामुळे शहरातील पुराच्या पाण्याचा धोका कमी होईल, अशी माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी आज (रविवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे या दोन्ही नद्यांतील गाळ कायमस्वरुपी काढण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांसह नगर परिषद प्रशासनाने सातत्याने शासनाकडे केली होती. त्यानुसार नगर परिषदेने विविध ठरावांद्वारे पत्रव्यवहार केला. या गोष्टीचा आपण पाठपुरावा केल्यामुळे शीव व वाशिष्ठी नद्या गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पावली उचलली आहेत. परिणामी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरात येणारा गाळ काढल्यामुळे पुराचे संकट काहीअंशी कमी होणार आहे. भविष्यात हे शहर पूर्णपणे पूरमुक्त होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. सन २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन्ही नद्या गाळाने भरल्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरात पाणी शिरण्याचा धोका संभवतो. २००५ नंतर वाशिष्ठीतील गाळ उपसा काही प्रमाणात झाला. त्याचप्रमाणे नगर परिषदेने स्वनिधीतून शीव नदीतील गाळ काढण्याचे काम गेली ७ ते ८ वर्षे केले. मात्र, याला मोठा खर्च येत असल्याने शासनाकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याला यश आले आहे. जलसंपदा विभागातर्फे साखरण कार्यक्रमाअंतर्गत या दोन्ही नद्यांतील संपूर्ण गाळ अलोरे अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या खर्चातून काढला जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले.अंदाजे १२० स. घ. मी. गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अंदाजपत्रक, रेखाचित्र व निधी आदींचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश पत्रान्वये देण्यात आले आहेत. पोफळी कोंडफणसवणे पुलानजीकच्या मोरीचे विस्थापीकरण व पर्जन्य उपादान योजनेच्या आयोगाच्या वरील भागातील नदीपात्रातील गाळ काढणे आदी कामांचा तातडीने या कामात समावेश केला असल्याने आता लवकरच चिपळूण शहर पूरमुक्त होऊन दोन्ही नद्या गाळमुक्त होणार आहेत. धोकादायक पूररेषाही संपुष्टात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)प्राधान्याने करणार काम२००५ नंतर शासनाच्या माध्यमातून पूररेषा आखण्यात आली. या पूररेषेमुळे शहरातील बांधकामावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पूररेषेत येणाऱ्या बांधकामांना परवानगी मिळणे अशक्य झाले होते. शहराची भौगोलिक रचना पाहता शहर खोलगट भागात वसल्याने शहर परिसरातील नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीत पूररेषेमध्ये बांधकाम करता येत नव्हते. शहराचा वाढता विस्तार व वाढती नागरी वस्ती लक्षात घेता शहर पूररेषा व पूरमुक्त करण्यासाठी दोन्ही नद्यांमधील गाळ काढणे गरजेचे होते. गाळ काढण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे, असे रमेश कदम यांनी सांगितले.