शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
2
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
3
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
4
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
5
नवरीच्या वडिलांनी लढवली शक्कल; लग्नात कपड्यांवरच लावला QR कोड, पाहुण्यांनी स्कॅन केलं अन्...
6
भारतातील आघाडीचा टूथपेस्ट ब्रँड 'कोलगेट' आता लोक खरेदी करत नाहीयेत? विक्रीत सातत्यानं घट, जाणून घ्या कारण
7
PPF, EPF की GPF? तुमच्या निवृत्तीसाठी कोणती योजना चांगली? तिन्हींमध्ये नेमका काय फरक?
8
Jaipur Accident: डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
9
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
10
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
11
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
12
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
13
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
14
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
15
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
16
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
17
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
18
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
20
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?

शीव, वाशिष्ठी नद्या घेणार मोकळा श्वास

By admin | Updated: November 2, 2014 23:29 IST

पुराच्या पाण्याचा धोका होणार कमी

चिपळूण : जलसंपदा विभागाच्या पाखरण कार्यक्रमाअंतर्गत चिपळूण शहरातील शीव व वाशिष्ठी नद्यांतील गाळ काढण्याचे नियोजन झाले आहे. दोन्ही नद्यांतील गाळ काढल्यामुळे शहरातील पुराच्या पाण्याचा धोका कमी होईल, अशी माहिती माजी आमदार रमेश कदम यांनी आज (रविवारी) पत्रकारांशी बोलताना दिली.राज्य शासनाच्या जलसंपदा विभागातर्फे या दोन्ही नद्यांतील गाळ कायमस्वरुपी काढण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांसह नगर परिषद प्रशासनाने सातत्याने शासनाकडे केली होती. त्यानुसार नगर परिषदेने विविध ठरावांद्वारे पत्रव्यवहार केला. या गोष्टीचा आपण पाठपुरावा केल्यामुळे शीव व वाशिष्ठी नद्या गाळमुक्त करण्याच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पावली उचलली आहेत. परिणामी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शहरात येणारा गाळ काढल्यामुळे पुराचे संकट काहीअंशी कमी होणार आहे. भविष्यात हे शहर पूर्णपणे पूरमुक्त होईल, असा विश्वास कदम यांनी व्यक्त केला. सन २००५मध्ये आलेल्या महापुरामुळे जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दोन्ही नद्या गाळाने भरल्यामुळे सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरात पाणी शिरण्याचा धोका संभवतो. २००५ नंतर वाशिष्ठीतील गाळ उपसा काही प्रमाणात झाला. त्याचप्रमाणे नगर परिषदेने स्वनिधीतून शीव नदीतील गाळ काढण्याचे काम गेली ७ ते ८ वर्षे केले. मात्र, याला मोठा खर्च येत असल्याने शासनाकडून गाळ काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. त्याला यश आले आहे. जलसंपदा विभागातर्फे साखरण कार्यक्रमाअंतर्गत या दोन्ही नद्यांतील संपूर्ण गाळ अलोरे अभियांत्रिकी विभागाच्या माध्यमातून शासनाच्या खर्चातून काढला जाणार आहे, असे कदम यांनी सांगितले.अंदाजे १२० स. घ. मी. गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी अंदाजपत्रक, रेखाचित्र व निधी आदींचा अहवाल तातडीने देण्याचे आदेश पत्रान्वये देण्यात आले आहेत. पोफळी कोंडफणसवणे पुलानजीकच्या मोरीचे विस्थापीकरण व पर्जन्य उपादान योजनेच्या आयोगाच्या वरील भागातील नदीपात्रातील गाळ काढणे आदी कामांचा तातडीने या कामात समावेश केला असल्याने आता लवकरच चिपळूण शहर पूरमुक्त होऊन दोन्ही नद्या गाळमुक्त होणार आहेत. धोकादायक पूररेषाही संपुष्टात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)प्राधान्याने करणार काम२००५ नंतर शासनाच्या माध्यमातून पूररेषा आखण्यात आली. या पूररेषेमुळे शहरातील बांधकामावर निर्बंध घालण्यात आले. त्यामुळे पूररेषेत येणाऱ्या बांधकामांना परवानगी मिळणे अशक्य झाले होते. शहराची भौगोलिक रचना पाहता शहर खोलगट भागात वसल्याने शहर परिसरातील नगर परिषद व ग्रामपंचायत हद्दीत पूररेषेमध्ये बांधकाम करता येत नव्हते. शहराचा वाढता विस्तार व वाढती नागरी वस्ती लक्षात घेता शहर पूररेषा व पूरमुक्त करण्यासाठी दोन्ही नद्यांमधील गाळ काढणे गरजेचे होते. गाळ काढण्याचे काम प्राधान्याने केले जाणार आहे, असे रमेश कदम यांनी सांगितले.