शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

रस्ता पाण्याखाली गेल्याने कोंढेतड नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:13 IST

अर्जुना नदीच्या पाण्याच्या वेढ्याने वाहतूक ठप्प

आॅनलाईन लोकमतराजापूर (जि. रत्नागिरी), दि. २२ : सुमारे चार कोटी रुपये निधीतून राजापूर शहर व कोंढेतड यांना जोडणारा पूल बांधण्यात आला. मात्र, पावसाळ्यात अर्जुना नदीच्या पाण्याचाच वेढा या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला पडल्याने त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून, या पुलाचा नक्की फायदा काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजापूर शहरातील चिंचबांध ते कोंढेतड यादरम्यान कायमस्वरुपी वाहतुकीसाठी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेदेखील झाली होती. अखेर शासनाकडून या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली व त्यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली. मात्र, कुर्मगतीने या पुलाचे काम सुरु राहिल्याने पुलाचा खर्च वाढत वाढत चार कोटींच्या घरात गेला. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने पुलावर लक्ष केंद्रीत करुन त्याचे बांधकाम गत उन्हाळ्यात पूर्ण करुन घेतले. या पुलाला शहराकडे जोडणारा पक्क्या स्वरुपातील रस्ता होणे बाकी होते. तरीही या पुलावरुन छोट्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली.

मात्र, गेले दोन दिवस सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूरजवळील अर्जुना नदीला मोठा पूर आल्याने त्यामध्ये कोंढेतड पुलाला जोडणारा रस्तादेखील बराचवेळ पाण्याखाली होता. त्यामुळे या पावसाळ्यात पुलावरुन सुरळीत ये - जा करायला मिळेल, अशी आशा असलेल्या येथील नागरिकांना पुलाला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याचे पाहून निराश व्हावे लागले. त्यामुळे ऐन पावसाळ््यातही या पुलाचा उपयोग करता आलेला नाही.