शहरं
Join us  
Trending Stories
1
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
2
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
3
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
4
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
5
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
6
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
7
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
8
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
9
Mumbai: 'मुंबई वन' अ‍ॅप वापरता? 'असं' काढा तिकीट, महिन्यात सहा वेळा वाचेल २० टक्के रक्कम!
10
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
11
"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं
12
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
13
साप तरुणाला चावला, रागाच्याभरात तरुणानेही सापाचा चावा घेतला! प्रकरण ऐकून डॉक्टरही हैराण
14
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
15
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
16
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
17
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
18
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
19
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
20
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

रस्ता पाण्याखाली गेल्याने कोंढेतड नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 17:13 IST

अर्जुना नदीच्या पाण्याच्या वेढ्याने वाहतूक ठप्प

आॅनलाईन लोकमतराजापूर (जि. रत्नागिरी), दि. २२ : सुमारे चार कोटी रुपये निधीतून राजापूर शहर व कोंढेतड यांना जोडणारा पूल बांधण्यात आला. मात्र, पावसाळ्यात अर्जुना नदीच्या पाण्याचाच वेढा या पुलाला जोडणाऱ्या रस्त्याला पडल्याने त्यावरील वाहतूक ठप्प झाली असून, या पुलाचा नक्की फायदा काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राजापूर शहरातील चिंचबांध ते कोंढेतड यादरम्यान कायमस्वरुपी वाहतुकीसाठी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्यासाठी अनेकवेळा आंदोलनेदेखील झाली होती. अखेर शासनाकडून या पुलाला प्रशासकीय मान्यता मिळाली व त्यासाठी निधीचीदेखील तरतूद करण्यात आली. मात्र, कुर्मगतीने या पुलाचे काम सुरु राहिल्याने पुलाचा खर्च वाढत वाढत चार कोटींच्या घरात गेला. त्यानंतर नगर परिषद प्रशासनाने पुलावर लक्ष केंद्रीत करुन त्याचे बांधकाम गत उन्हाळ्यात पूर्ण करुन घेतले. या पुलाला शहराकडे जोडणारा पक्क्या स्वरुपातील रस्ता होणे बाकी होते. तरीही या पुलावरुन छोट्या वाहनांची वाहतूक सुरु करण्यात आली.

मात्र, गेले दोन दिवस सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे राजापूरजवळील अर्जुना नदीला मोठा पूर आल्याने त्यामध्ये कोंढेतड पुलाला जोडणारा रस्तादेखील बराचवेळ पाण्याखाली होता. त्यामुळे या पावसाळ्यात पुलावरुन सुरळीत ये - जा करायला मिळेल, अशी आशा असलेल्या येथील नागरिकांना पुलाला जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्याचे पाहून निराश व्हावे लागले. त्यामुळे ऐन पावसाळ््यातही या पुलाचा उपयोग करता आलेला नाही.