शहरं
Join us  
Trending Stories
1
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
2
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
3
गुन्हेगार आणि पीडितला सारखेच दाखवण्याचा प्रयत्न..; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
4
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
5
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
6
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
7
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
8
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
9
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
10
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
11
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
12
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
13
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
14
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
15
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
16
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
17
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
18
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
19
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
20
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा

हाताबाहेरची परिस्थिती जाण्याआधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

खरेतर पहिले लॉकडाऊन संपले आणि सर्वसामान्य जनतेशी निगडित अनेक प्रश्नांनी डोके वर काढले. त्यातील काही प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ...

खरेतर पहिले लॉकडाऊन संपले आणि सर्वसामान्य जनतेशी निगडित अनेक प्रश्नांनी डोके वर काढले. त्यातील काही प्रश्न आजही सुटलेले नाहीत. त्याविषयी राजकीय पक्षांनी शासनदरबारी निवेदने दिली असली, तरी ते प्रश्न सुटले नाहीत किंवा ते सोडवण्यासाठी कोणाचा प्रयत्नही दिसत नाही. ना कोणाला बँकेचे व्याज माफ झाले आणि नाही कोणाला वीजबिलात सूट मिळाली. ज्याची वीजबिले थकली ते अंधारात झाकले गेले आणि कर्जबाजारी सावकारी खाली दबले गेले. इतकी भीषण परिस्थिती आज समाजाची आहे. परंतु, आता या प्रश्नांविषयी कोणीही बोलत नाही. सर्वसामान्य मात्र आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अगदी आरोग्य सुविधांचा जरी विचार केला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी आठवडाभर लसीकरण झालेले नाही. अशा परिस्थितीत केवळ प्रशासकीय यंत्रणा शासनस्तरावर पाठपुरावा घेत असेल, तर ती चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कारण, याबाबतीत लोकप्रतिनिधीची भूमिका महत्त्वाची असते. लोकप्रतिनिधी जे करू शकतो ते अधिकारी करू शकत नाही. काहीवेळा प्रशासनालाही मर्यादा येतात. परंतु, ऐकावे तर नवलच! कोणी म्हणे आमचे नेते पंढरपूरच्या निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. किमान आता तरी पक्षाचे झेंडे खाली ठेवा आणि माणुसकीची धुरा सांभाळा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नाहीत, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात नाही. यातून जिल्ह्यात प्रशासनावरची कोरोनावरची पकड सैल झाल्याशिवाय राहणार नाही. याआधीच्या लॉकडाऊनमध्ये एखाद्या भागातील रुग्ण शोधून, त्यांचं ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्यासाठी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तातडीने यंत्रणा काम करीत होती. मात्र, आता फारसे सक्रिय प्रयत्न करण्यात येत नाहीत. ग्रामीण आणि शहरी भागातले नागरिकही कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते वर्तन करताना दिसत नाहीत. मुंबई, पुण्यातून अनेक चाकरमानी गावी आले, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिणामी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा पसारा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत केवळ लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. ही लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींची मानसिकता तितकीच महत्त्वाची आहे. ही वेळ पक्ष सांभाळण्याची नव्हे, तर माणुसकी जपण्याची आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर बेड संख्या वाढविणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे हे प्रशासन करू शकेल. परंतु, त्यासाठी लागणारे ऑक्सिजन उपलब्ध करणे, रुग्णवाहिका व अन्य यंत्रणा उभी करण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधीच हवा आहे. याशिवाय परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर सर्वसामान्यांना आधार देणाराही नेता हवा आहे. कारण, सगळ्यांना थोडी कळ सोसावी लागेल हे म्हणणे सोपे आहे, पण सोसणे अवघड झाले आहे.