शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
3
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
4
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
5
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
6
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
7
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
8
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
9
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
10
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
11
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
12
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
13
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
14
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
15
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
16
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
17
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
18
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
19
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
20
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी

हाताबाहेरची परिस्थिती जाण्याआधी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

खरेतर पहिले लॉकडाऊन संपले आणि सर्वसामान्य जनतेशी निगडित अनेक प्रश्नांनी डोके वर काढले. त्यातील काही प्रश्न आजही सुटलेले नाहीत. ...

खरेतर पहिले लॉकडाऊन संपले आणि सर्वसामान्य जनतेशी निगडित अनेक प्रश्नांनी डोके वर काढले. त्यातील काही प्रश्न आजही सुटलेले नाहीत. त्याविषयी राजकीय पक्षांनी शासनदरबारी निवेदने दिली असली, तरी ते प्रश्न सुटले नाहीत किंवा ते सोडवण्यासाठी कोणाचा प्रयत्नही दिसत नाही. ना कोणाला बँकेचे व्याज माफ झाले आणि नाही कोणाला वीजबिलात सूट मिळाली. ज्याची वीजबिले थकली ते अंधारात झाकले गेले आणि कर्जबाजारी सावकारी खाली दबले गेले. इतकी भीषण परिस्थिती आज समाजाची आहे. परंतु, आता या प्रश्नांविषयी कोणीही बोलत नाही. सर्वसामान्य मात्र आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. अगदी आरोग्य सुविधांचा जरी विचार केला तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत अनेक ठिकाणी आठवडाभर लसीकरण झालेले नाही. अशा परिस्थितीत केवळ प्रशासकीय यंत्रणा शासनस्तरावर पाठपुरावा घेत असेल, तर ती चिंताजनक बाब म्हणावी लागेल. कारण, याबाबतीत लोकप्रतिनिधीची भूमिका महत्त्वाची असते. लोकप्रतिनिधी जे करू शकतो ते अधिकारी करू शकत नाही. काहीवेळा प्रशासनालाही मर्यादा येतात. परंतु, ऐकावे तर नवलच! कोणी म्हणे आमचे नेते पंढरपूरच्या निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. किमान आता तरी पक्षाचे झेंडे खाली ठेवा आणि माणुसकीची धुरा सांभाळा. पालकमंत्री जिल्ह्यात फिरकत नाहीत, कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात नाही. यातून जिल्ह्यात प्रशासनावरची कोरोनावरची पकड सैल झाल्याशिवाय राहणार नाही. याआधीच्या लॉकडाऊनमध्ये एखाद्या भागातील रुग्ण शोधून, त्यांचं ट्रॅकिंग, ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्यासाठी व त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यासाठी तातडीने यंत्रणा काम करीत होती. मात्र, आता फारसे सक्रिय प्रयत्न करण्यात येत नाहीत. ग्रामीण आणि शहरी भागातले नागरिकही कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक ते वर्तन करताना दिसत नाहीत. मुंबई, पुण्यातून अनेक चाकरमानी गावी आले, त्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. परिणामी रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस रुग्णांचा पसारा वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत केवळ लॉकडाऊन हा उपाय होऊ शकत नाही. ही लढाई जिंकण्यासाठी प्रशासनाबरोबरच लोकप्रतिनिधींची मानसिकता तितकीच महत्त्वाची आहे. ही वेळ पक्ष सांभाळण्याची नव्हे, तर माणुसकी जपण्याची आहे. भविष्यात रुग्णसंख्या वाढली तर बेड संख्या वाढविणे, ऑक्सिजन बेड उपलब्ध करणे हे प्रशासन करू शकेल. परंतु, त्यासाठी लागणारे ऑक्सिजन उपलब्ध करणे, रुग्णवाहिका व अन्य यंत्रणा उभी करण्यासाठी हक्काचा लोकप्रतिनिधीच हवा आहे. याशिवाय परिस्थिती हाताबाहेर गेलीच तर सर्वसामान्यांना आधार देणाराही नेता हवा आहे. कारण, सगळ्यांना थोडी कळ सोसावी लागेल हे म्हणणे सोपे आहे, पण सोसणे अवघड झाले आहे.