शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत नसल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे.सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस्. टी. महामंडळाच्या चालक, वाहक व इतर कर्मचाºयांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली़ ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वर्षभरात सणासुदीच्या दिवशी गावाकडे येणारे चाकरमानी, कामानिमित्त स्थलांतरित झालेली कुटुंब या संपामुळे अडचणीत सापडली आहेत़रत्नागिरी जिल्ह्यात दररोज हजारो बसफेºया सुरु असतात़ या संपामुळे गेल्या तीन दिवसांत सर्वच फेºया बंद आहेत. दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून, घरची मंडळी बाहेरगावी वास्तव्याला असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बससेवाच ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.मुंबई, पुणे येथे असलेल्या अनेक चाकरमान्यांनी रेल्वे, खासगी वाहतूक सेवेचा आधार घेतला आहे. तरीही रेल्वे स्थानकापर्यंत येणारे बहुतांश प्रवाशी ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यासमोर गावाला जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एस.टी. बंद असल्याने अनेक प्रवाशांनी रिक्षा, खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र, त्यासाठी एस. टी. भाड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे खिशालाही मोठा फटका बसलेला आहे.एस्. टी. महामंडळाचे चालक, वाहक, अधिकारी आणि इतर कर्मचारी संपावर गेल्याने महामंडळ प्रशासनाला गोरगरिबांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या कामानिमित्त शहरात येणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेची शहरी भागाशी नाळ जोडलेली असल्याने बहुतांशी व्यवहार शहरी भागावर अवलंबून असतात. संपामुळे हे व्यवहारही थांबले आहेत.