शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत नसल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे.सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस्. टी. महामंडळाच्या चालक, वाहक व इतर कर्मचाºयांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली़ ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वर्षभरात सणासुदीच्या दिवशी गावाकडे येणारे चाकरमानी, कामानिमित्त स्थलांतरित झालेली कुटुंब या संपामुळे अडचणीत सापडली आहेत़रत्नागिरी जिल्ह्यात दररोज हजारो बसफेºया सुरु असतात़ या संपामुळे गेल्या तीन दिवसांत सर्वच फेºया बंद आहेत. दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून, घरची मंडळी बाहेरगावी वास्तव्याला असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बससेवाच ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.मुंबई, पुणे येथे असलेल्या अनेक चाकरमान्यांनी रेल्वे, खासगी वाहतूक सेवेचा आधार घेतला आहे. तरीही रेल्वे स्थानकापर्यंत येणारे बहुतांश प्रवाशी ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यासमोर गावाला जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एस.टी. बंद असल्याने अनेक प्रवाशांनी रिक्षा, खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र, त्यासाठी एस. टी. भाड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे खिशालाही मोठा फटका बसलेला आहे.एस्. टी. महामंडळाचे चालक, वाहक, अधिकारी आणि इतर कर्मचारी संपावर गेल्याने महामंडळ प्रशासनाला गोरगरिबांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या कामानिमित्त शहरात येणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेची शहरी भागाशी नाळ जोडलेली असल्याने बहुतांशी व्यवहार शहरी भागावर अवलंबून असतात. संपामुळे हे व्यवहारही थांबले आहेत.