शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

एसटीच्या संपामुळे सर्वसामान्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 23:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : एस्. टी. कर्मचाºयांच्या संपामुळे एस़् टी़ महामंडळाची बससेवा ठप्प झाली आहे. हा संप अद्यापही मिटला नसल्याने तिसºया दिवशीही ग्रामीण भागातील जनतेचे प्रचंड हाल झाले. महामंडळाच्या बसेस उपलब्ध हात नसल्याने खासगी वाहतुकीने घर गाठावे लागत आहे़ शिवाय ग्रामीण भागातील अनेकांना सणासुदीच्या दिवसांतही घरातून इतर गावांना जाता येत नसल्याने प्रवाशांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकावर शुकशुकाट दिसत आहे.सातव्या वेतन आयोगासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस्. टी. महामंडळाच्या चालक, वाहक व इतर कर्मचाºयांनी ऐन दिवाळीत संप पुकारला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून संपाला सुरुवात झाली़ ऐन दिवाळीत संपाचे हत्यार उपसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत. वर्षभरात सणासुदीच्या दिवशी गावाकडे येणारे चाकरमानी, कामानिमित्त स्थलांतरित झालेली कुटुंब या संपामुळे अडचणीत सापडली आहेत़रत्नागिरी जिल्ह्यात दररोज हजारो बसफेºया सुरु असतात़ या संपामुळे गेल्या तीन दिवसांत सर्वच फेºया बंद आहेत. दिवाळी हा सण मोठ्या धामधुमीत साजरा केला जात असून, घरची मंडळी बाहेरगावी वास्तव्याला असलेल्या आपल्या कुटुंबियांच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, बससेवाच ठप्प झाल्याने प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.मुंबई, पुणे येथे असलेल्या अनेक चाकरमान्यांनी रेल्वे, खासगी वाहतूक सेवेचा आधार घेतला आहे. तरीही रेल्वे स्थानकापर्यंत येणारे बहुतांश प्रवाशी ग्रामीण भागातील असल्याने त्यांच्यासमोर गावाला जाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. एस.टी. बंद असल्याने अनेक प्रवाशांनी रिक्षा, खासगी वाहतुकीचा आधार घेतला. मात्र, त्यासाठी एस. टी. भाड्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त रक्कम मोजावी लागत आहे. त्यामुळे खिशालाही मोठा फटका बसलेला आहे.एस्. टी. महामंडळाचे चालक, वाहक, अधिकारी आणि इतर कर्मचारी संपावर गेल्याने महामंडळ प्रशासनाला गोरगरिबांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. या संपावर अद्याप तोडगा न निघाल्याने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. ग्रामीण भागातील जनतेला आपल्या कामानिमित्त शहरात येणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील जनतेची शहरी भागाशी नाळ जोडलेली असल्याने बहुतांशी व्यवहार शहरी भागावर अवलंबून असतात. संपामुळे हे व्यवहारही थांबले आहेत.