शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सर सलामत तो....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:31 IST

एवढं सगळं होऊनही अजूनही आपल्यापैकी काहींना शहाणपण येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. गेले सव्वा वर्षे आरोग्य यंत्रणेचा लढा ...

एवढं सगळं होऊनही अजूनही आपल्यापैकी काहींना शहाणपण येत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. गेले सव्वा वर्षे आरोग्य यंत्रणेचा लढा अन्य यंत्रणांना सोबत घेऊन सुरू आहे. गेल्या वर्षीही मे महिन्यात कोरोना वाढू लागताच आपली भंबेरी उडाली होती. त्यातच भर पडली ती मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांची. त्यानंतर सप्टेंबरपर्यंत जो कोरोनाचा हाहाकार सुरू झाला, त्याने अवघा जिल्हा हादरला; पण गेल्या वर्षाची कोरोनाच्या आकडेवारीचे रेकाॅर्ड केवळ एका एप्रिल महिन्याने तोडले. या महिन्यात अकरा हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले. हे पाहाता आपण लाॅकडाऊनला किती गांभीर्याने घेतले आणि घेत आहोत, याबाबतचे आत्मपरिक्षण अशा मंडळींनी जरूर करावे.

सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत दूध, भाजीपाला यांची दुकाने सुरू आहेत; मात्र लोक आता जणु काही दिवसभर तुरुंगातच रहाणार असून, उपाशी मरायला लागणार आहे, अशा बेताने अख्खे दुकान लुटून नेल्यासारखे नेत आहेत. ज्यांच्या किराणा मालाच्या दुकानात दुधाची विक्री होत आहे, अशांची चांदीच झाली आहे. अनेक दुकानदार अर्ध्यावर शटर सुरू ठेवून अन्य मालांचीही विक्री करत आहे. ज्यांच्या दुकानात दूध नाही, त्यांना घरपोच सेवेसाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचे दुकान मात्र कायमच बंद आहे. लाॅकडाऊनचा योग्य अर्थ नागरिकांना कळत नसल्याने आणि दुर्दैवाने त्याची जिथे आवश्यकता आहे तिथे योग्यरीत्या अंमलबजावणी होत नसल्यानेच सध्या लाॅकडाऊनचे तीन तेरा वाजले म्हणायची वेळ आली आहे.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आपल्या जीवाची काळजी घेण्याचा मक्ता शासन आणि त्याचे प्रशासन याची आहे. त्यामुळे आपण खड्ड्यात पडलो तरीही वाचवायला येणे, ही जबाबदारीही त्यांचीही आहे, हे आपल्या डोक्यात एकदम फिट्ट बसलेले असल्याने आपण प्रत्येक गोष्टीत बेफिकिरी दाखवत असतो. परिणामी, कधी तरी अशा बेफिकिरीचा जोरदार फटका असा बसतो की मग सारे होत्याचे नव्हते होऊन जाते. मृत्यू किती स्वस्त झालाय, हे कोरोनाने दाखवून दिले आहे. म्हणूनच आता तरी यातून थोडं शहाणं होऊया. या संकटातून सावरण्यासाठी केवळ आरोग्य यंत्रणा किंवा प्रशासन पुरेसे नाही, तर आपणही बराचसा हातभार लावण्याची गरज आहे. एक म्हण आहे - सर सलामत तो पगडी पचास. सध्या या म्हणीप्रमाणे प्रत्येकानेच आपली पगडी, अर्थात आपला आणि दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊया.