शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
भारत-पाक संघर्षात ड्रॅगनची खेळी, खरा विजय चीनचा झाल्याचा दावा; करणार तगडी कमाई, पण कशी?
3
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
4
बॉलिवूडकर गप्प, पण सई ताम्हणकरने थेट घेतलं पाकिस्तानचं नाव; म्हणाली, "ज्यांना सरळ भाषा..."
5
'तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही...', भारताचे पाकिस्तानला सडेतोड उत्तर!
6
'अण्वस्त्रांचा मारा करू, असा इशारा पाकने दिला नव्हता; लढाई पारंपरिक पद्धतीनेच'
7
बंदी असतानाही गुजरातमध्ये दारूचा महापूर; वर्षाला १५,००० कोटींची दारू येतेय तरी कुठून?
8
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
9
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
10
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
11
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
12
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
13
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
14
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
15
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
16
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
17
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
18
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
19
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
20
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 

मुलींच्या सामूहिक विवाहासाठी ‘शुभमंगल’

By admin | Updated: June 1, 2014 00:47 IST

महिला व बालविकास : शेतकरी, शेतमजुरांच्या कुटुंबीयांना दिलासा

रत्नागिरी : महिला व बाल विकास विभागातर्फे जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या, शेतमजुरांच्या मुलीच्या सामुहिक विवाहासाठी शासनातर्फे ‘शुभमंगल सामुहिक विवाह योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेतर्फे राबविण्यात येईल. स्वयंसेवी संस्थेस प्रत्येक जोडप्यामागे दोन हजार रूपये प्रोत्साहनात्मक अनुदान शासनातर्फे देण्यात येईल. या अनुदानातून विवाहाचे आयोजन, विवाह समारंभाचा खर्च, विवाह नोंदणी शुल्क यावर होणारा खर्च स्वयंसेवी संस्थेतर्फे करण्यात येईल. या योजनेंतर्गत मुलींच्या विवाहासाठी आवश्यक मंगळसूत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रति जोडपे १० हजार रूपये अनुदान शासनातर्फे देण्यात येते. शासनाने सुधारित शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत विवाह योजनाही कार्यान्वित केली असून या सुधारित शुभमंगल सामुहिक, नोंदणीकृत योजनेंतर्गत जे जोडपे सामुहिक विवाह सोहळ्यात सहभागी न होता सरळ विवाह नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणीकृत विवाह करतील, त्यांना १० हजार रूपये अनुदान देण्यात येते. ही योजना फक्त शेतकरी, शेतमजूर यांच्या पाल्यासाठी न ठेवता निराधार, परित्यक्ता आणि विधवा महिलांच्या केवळ दोन मुलींच्या विवाहाकरिता लागू केली आहे. शेतकरी व श्रमजीवींसाठी ही योजना वरदान ठरणार आहे. शेतमजुराच्या मुलींना अशा विवाहासाठी प्रोत्साहन देण्याचा ज्या संस्था प्रयत्न करतील त्यांना मदत करण्यात येणार आहे. ही योजना फक्त खुला व इतर मागासवर्ग प्रवर्गातील व्यक्तीसाठी लागू असून अनुसुचित जमाती, विमुक्त जाती, भटकी जमाती, विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील दांपत्ये पात्र रहाणार नाही. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राशेजारी , जेलरोड येथे ०२३५२-२२०४६१ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)