शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

फक्त एक आठवडाच दुकाने बंद ठेवणार, व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:15 IST

Corona virus Ratnagiri Market-गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मिनी लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली असता सामंत यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देफक्त एक आठवडाच दुकाने बंद ठेवणारव्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

रत्नागिरी : गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मिनी लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली असता सामंत यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कर्जांचे हप्तेही भरता आलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या नुकसानीचा फटका अजूनही व्यापारी वर्गाला बसलेला आहे. काही महिन्यापूर्वी सुरू झालेले उद्योग व्यवसाय अजूनही सुरळीत झालेले नाहीत. असे असतानाच आता पुन्हा मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केलेत तरी आम्ही दुकाने सुरू ठेवणारच असा सूर सर्वच व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.

जिल्हा प्रशासनाचे आदेश जाहीर होताच रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या कथन केल्या. मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी देशोधडीला लागला असून आता करण्यात आलेल्या नियमांमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. आता तोटा सहन करण्याची आमची क्षमता संपली असे या व्यापाऱ्यांनी सांगितले.यावर मंत्री उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू असे या व्यापाऱ्यांना आश्वासन दिले. उदय सामंत यांच्या विनंतीनुसार या व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले असून आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.व्यापाऱ्यांमध्ये मतभेदरत्नागिरी शहरात सध्या व्यापाऱ्यांमध्ये दुमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा दुकाने बंद ठेवण्यास विरोध आहे. अशा परिस्थितीत सर्वच व्यापारी बंदचा निर्णय मानणार की विरोध करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारRatnagiriरत्नागिरी