शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

फक्त एक आठवडाच दुकाने बंद ठेवणार, व्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 18:15 IST

Corona virus Ratnagiri Market-गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मिनी लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली असता सामंत यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देफक्त एक आठवडाच दुकाने बंद ठेवणारव्यापाऱ्यांनी घेतला निर्णय

रत्नागिरी : गुन्हे दाखल केले तरीही दुकाने चालू ठेवणार, अशी भूमिका रत्नागिरीतील काही व्यापाऱ्यांची कायम असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या मिनी लॉकडाऊनला कडाडून विरोध केला आहे. दरम्यान, रत्नागिरी शहर व्यापारी संघाच्या पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली असता सामंत यांनी आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यामुळे आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.गेल्यावर्षी झालेल्या लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक वस्तूंची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद राहिल्याने व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक कर्जांचे हप्तेही भरता आलेले नाहीत. गेल्या वर्षीच्या नुकसानीचा फटका अजूनही व्यापारी वर्गाला बसलेला आहे. काही महिन्यापूर्वी सुरू झालेले उद्योग व्यवसाय अजूनही सुरळीत झालेले नाहीत. असे असतानाच आता पुन्हा मिनी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. त्यामुळे आमच्यावर गुन्हे दाखल केलेत तरी आम्ही दुकाने सुरू ठेवणारच असा सूर सर्वच व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत असून या व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनला तीव्र विरोध केला आहे.

जिल्हा प्रशासनाचे आदेश जाहीर होताच रत्नागिरी व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या कथन केल्या. मागील लॉकडाऊनमध्ये व्यापारी देशोधडीला लागला असून आता करण्यात आलेल्या नियमांमुळे मोठे संकट उभे राहिले आहे. आता तोटा सहन करण्याची आमची क्षमता संपली असे या व्यापाऱ्यांनी सांगितले.यावर मंत्री उदय सामंत यांनी व्यापाऱ्यांचे म्हणणे मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू असे या व्यापाऱ्यांना आश्वासन दिले. उदय सामंत यांच्या विनंतीनुसार या व्यापाऱ्यांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आश्वासन दिले असून आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय रत्नागिरीतील व्यापाऱ्यांनी घेतला आहे.व्यापाऱ्यांमध्ये मतभेदरत्नागिरी शहरात सध्या व्यापाऱ्यांमध्ये दुमत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही व्यापाऱ्यांचा दुकाने बंद ठेवण्यास विरोध आहे. अशा परिस्थितीत सर्वच व्यापारी बंदचा निर्णय मानणार की विरोध करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारRatnagiriरत्नागिरी