शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

‘शिवशाही’ दिमाखात सुरू झाली अन् बंदही पडली...!

By admin | Updated: June 16, 2017 15:08 IST

तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना तिकिटातील फरकाची रक्कम परत

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. १७ : राज्य परिवहन महामंडळाने अद्ययावत वातानुकूलीत ‘शिवशाही’ बस रत्नागिरी - मुंबई मार्गावर सुरू केली. दि. १० रोजी मुंबईहून सुटलेली ही गाडी रत्नागिरीत दि. ११ रोजी पोहोचली. रत्नागिरी आगारातून उद्घाटन झालेली बसही मुंबईकडे रवाना झाली. मात्र, दि. ११ रोजी रात्री ९.४५ वाजता मुंबईहून सुटलेली बस पनवेलमध्येच थांबविण्यात आली. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना तिकिटातील फरकाची रक्कम देऊन एस्. टी.च्या निमआराम गाडीतून रत्नागिरीकडे पाठविण्यात आले.

संपूर्ण वातानुकूलीत असलेल्या ४५ आसनी या गाडीमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरी आगारातूनही पहिल्या दोन दिवसांचे या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले होते. मुंबई मध्यवर्ती बसस्थानकातून सुटलेल्या गाडीचेही आरक्षण फुल्ल होते. मात्र, रत्नागिरीतील मुहूर्तादिवशीच शिवशाहीला गालबोट लागले.

मुंबईहून ही बस वेळेवर सुटली. मात्र, पनवेल येथे आल्यानंतर गाडीत तांत्रिक बिघाड असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यानंतर तिकीट दरातील फरकाची रक्कम वितरीत करून अन्य गाडीत बसवून रत्नागिरीकडे रवाना करण्यात आले.

तोट्यात असलेल्या महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अद्ययावत वातानुकूलीत शिवशाही बस सुरू केली आहे. दि. १० रोजी मुंबईत उद्घाटन झालेली ही गाडी रत्नागिरीत आली. दि. ११ रोजी रत्नागिरीत उद्घाटन होऊन ती मुंबईकडे रवानाही झाली. या मार्गावर दोन गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे ११ रोजी मुंबईतून रात्री ९.४५ वाजता सुटलेली बस नवी कोरी होती. त्यामुळे नव्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी - मुंबई मार्गावर चालवण्यासाठी दोन शिवशाही गाड्या घेतल्या आहेत. राज्यात ५०० गाड्या टप्याटप्याने सुरु करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. यातील पहिली गाडी रत्नागिरी मार्गावर धावली. प्रत्यक्षात या अद्ययावत वातानुकूलीत गाड्या एका खासगी कंपनीकडून महामंडळाने चालवण्यासाठी घेतल्या आहेत. गाडीची देखभाल दुरूस्ती व चालक याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे देण्यात आली आहे. तर गाडीत वाहक मात्र महामंडळाचा असणार आहे. रत्नागिरीकडे येणारी गाडी वेळेत सुटली. परंतु, पनवेलच्यापुढे गाडी येऊ शकली नाही, त्यामुळे नव्या उमेदीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.