शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

‘शिवशाही’ दिमाखात सुरू झाली अन् बंदही पडली...!

By admin | Updated: June 16, 2017 15:08 IST

तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना तिकिटातील फरकाची रक्कम परत

आॅनलाईन लोकमत

रत्नागिरी, दि. १७ : राज्य परिवहन महामंडळाने अद्ययावत वातानुकूलीत ‘शिवशाही’ बस रत्नागिरी - मुंबई मार्गावर सुरू केली. दि. १० रोजी मुंबईहून सुटलेली ही गाडी रत्नागिरीत दि. ११ रोजी पोहोचली. रत्नागिरी आगारातून उद्घाटन झालेली बसही मुंबईकडे रवाना झाली. मात्र, दि. ११ रोजी रात्री ९.४५ वाजता मुंबईहून सुटलेली बस पनवेलमध्येच थांबविण्यात आली. बसमधील तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना तिकिटातील फरकाची रक्कम देऊन एस्. टी.च्या निमआराम गाडीतून रत्नागिरीकडे पाठविण्यात आले.

संपूर्ण वातानुकूलीत असलेल्या ४५ आसनी या गाडीमध्ये प्रवाशांना बसण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रत्नागिरी आगारातूनही पहिल्या दोन दिवसांचे या गाडीचे आरक्षण फुल्ल झाले होते. मुंबई मध्यवर्ती बसस्थानकातून सुटलेल्या गाडीचेही आरक्षण फुल्ल होते. मात्र, रत्नागिरीतील मुहूर्तादिवशीच शिवशाहीला गालबोट लागले.

मुंबईहून ही बस वेळेवर सुटली. मात्र, पनवेल येथे आल्यानंतर गाडीत तांत्रिक बिघाड असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. त्यानंतर तिकीट दरातील फरकाची रक्कम वितरीत करून अन्य गाडीत बसवून रत्नागिरीकडे रवाना करण्यात आले.

तोट्यात असलेल्या महामंडळाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अद्ययावत वातानुकूलीत शिवशाही बस सुरू केली आहे. दि. १० रोजी मुंबईत उद्घाटन झालेली ही गाडी रत्नागिरीत आली. दि. ११ रोजी रत्नागिरीत उद्घाटन होऊन ती मुंबईकडे रवानाही झाली. या मार्गावर दोन गाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे ११ रोजी मुंबईतून रात्री ९.४५ वाजता सुटलेली बस नवी कोरी होती. त्यामुळे नव्या गाडीमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतो, याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्य परिवहन महामंडळाने रत्नागिरी - मुंबई मार्गावर चालवण्यासाठी दोन शिवशाही गाड्या घेतल्या आहेत. राज्यात ५०० गाड्या टप्याटप्याने सुरु करण्याची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली आहे. यातील पहिली गाडी रत्नागिरी मार्गावर धावली. प्रत्यक्षात या अद्ययावत वातानुकूलीत गाड्या एका खासगी कंपनीकडून महामंडळाने चालवण्यासाठी घेतल्या आहेत. गाडीची देखभाल दुरूस्ती व चालक याची जबाबदारी संबंधित कंपनीकडे देण्यात आली आहे. तर गाडीत वाहक मात्र महामंडळाचा असणार आहे. रत्नागिरीकडे येणारी गाडी वेळेत सुटली. परंतु, पनवेलच्यापुढे गाडी येऊ शकली नाही, त्यामुळे नव्या उमेदीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला.