शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मुसळधार पावसात शिवसेनेची राजापुरात संघर्ष यात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 16:25 IST

नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने विरोधाची धार अधिक तीव्र केली आहे. रविवारी (8 जुलै) कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शिवसेनेने तालुक्यातील डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरूवात केली.

राजापूर : नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेने विरोधाची धार अधिक तीव्र केली आहे. रविवारी (8 जुलै) कोसळणाऱ्या मुसळधार पावसात शिवसेनेने तालुक्यातील डोंगर तिठा येथून संघर्ष यात्रेला सुरूवात केली. या संघर्ष यात्रेचे नेतृत्व खासदार विनायक राऊत यांनी केले. ‘रिफायनरी हटाव’, ‘रद्द करा रद्द करा रिफायनरी रद्द करा’,‘भाजपा हटाव, कोकण बचाव’, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

नाणार येथे होऊ घातलेल्या रिफायनरीबाबत भाजपाने सकारात्मक पाऊल टाकले आहे. या प्रकल्पाला परिसरातील ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. ग्रामस्थांच्या विरोधामुळे भाजपाव्यतिरिक्त इतर पक्षांनी रिफायनरी विरोधात आवाज उठविला आहे. शिवसेनेने आपण स्थानिकांसमवेत असल्याचे सांगून प्रकल्पाविरोधात असणारी विरोधाची धार अधिक तीव्र करण्यास सुरूवात केली आहे. नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यान शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी केली. यावेळी कोकणातील इतर आमदारही उपस्थित होते.

खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली राजापूर तालुक्यातील डोंगर तिठा ते चौके अशी दोन किलोमीटरची संघर्ष यात्रा काढण्यात आली. सकाळी ११.३० वाजता या यात्रेला सुरूवात करण्यात आली. या यात्रेत परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यात्रेला सुरूवात होताच मुसळधार पावसाचे आगमन झाले. या पावसातच जोरदार घोषणाबाजी देत ही यात्रा सुरूच ठेवण्यात आली होती. या यात्रेत त्यांच्यासमवेत आमदार राजन साळवी, रत्नागिरीचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते उदय सामंत, जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्यासह तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी भाजपा सरकार आणि मोदीविरोधात घोषणाबाजी करत प्रकल्प हटवण्याची मागणी करण्यात आली.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पShiv Senaशिवसेना