शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
3
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
4
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
5
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
6
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
7
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
8
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
9
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
10
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा
11
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
12
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
13
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
14
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
15
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
16
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
17
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
18
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
19
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
20
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

महाळुंगेवासीयांनी राखली मुख्यमंत्र्यांच्या सभेची लाज

By admin | Updated: January 21, 2016 00:27 IST

खेड तालुका : जलोपासना कार्यक्रमाला मोठी गर्दी

खेड : तालुक्यातील महाळुंगे गावातील जलोपासना कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला चांगली गर्दी झाली होती. मात्र, ही गर्दी बाहेरच्यांनी नाही तर महाळुंगे गावासह अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमुळे झाली होती. अन्यथा या कार्यक्रमाचाच विचका झाला असता, असे म्हटले जात होते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला दोन दिवस उलटून गेले तरीही अद्याप या दौऱ्याची चर्चा खेड तालुक्यात सुरु आहे.जगबुडी नदीतील पाण्यावर जलोपासना अभियान राबविण्याच्या कार्याला रविवारी प्रारंभ करण्यात आला. डॉ़ राजेंद्रसिंह हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाळुंगे गावासह अठरा गाव धवडे बांदरी विभागातील शेतकरी आणि ग्रामस्थ येथे प्रत्यक्ष काम करणार आहेत. पैसा सरकार देणार असले तरीही येथील गोरगरीबांचे प्रत्यक्ष हात याठिकाणी राबणार आहेत. या कामासाठी निधी देणाऱ्या आणि मार्गदर्शन करणाऱ्यांनी सभेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.रविवारी मुख्यमंत्र्यांच्या सभेला शेतकरी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीने जिंकून घेतले होते. या सभेला आयोजकांनी पाच हजार खुर्च्यांची व्यवस्था केली होती. या खुर्च्या महाळुंगे गावातील ग्रामस्थ तसेच अठरा गाव धवडे बांदरी विभागातील सह््याद्रीच्या खोऱ्यातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीने ही हाउसफुल्ल झाल्या होत्या. या कार्यक्रमाचे संयोजक संजय यादवराव आणि येथील प्रथितयश शेतकरी सतीश कदम यांनी कार्यक्रमाबाबत परिसरातील सर्व गावांमधून जनजागृती केली होती. जगबुडी नदीच्या पाण्याचा जास्त वापर आपल्याला करावयाचा आहे, नदीतील पाण्याचा वापर आणि उपयोग याबाबत त्यांनी ग्रामस्थांमध्ये जागृती केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेला खेड शहरातील काही मान्यवर वगळता या कार्यक्रमाकडे कोणीही फिरकले नसल्याचे पहावयास मिळाले.विशेष म्हणजे, भाजपचे खेड तालुक्यात फार मोठे प्राबल्य नाही. त्यामुळे या सभेला कितपत गर्दी होईल, हे प्रश्नचिन्हच होते. तरीही मुख्यमंत्री येणार म्हणून गर्दी जमली. त्यातही महाळुंगे आणि अठरा गाव धवडे बांदरी विभागातील ग्रामस्थांची संख्या मोठी होती.केवळ कोकणापुरते हे अभियान मर्यादीत नसून, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी असल्याने आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर हे अभियान राबविण्यात येत असल्याने या सभेला मोठा प्रतिसाद मिळणे आवश्यक होते. मात्र, तो न मिळाल्याने या कार्यक्रमाची खरी लाज ही महाळुंगे आणि अठरा गाव धवडे बांदरी विभागातील तमाम ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनीच राखली. (प्रतिनिधी)गैरहजेरी : वर्चस्व राखण्याचा भाजपचा प्रयत्नभाजप शिवसेनेच्या गैरहजेरीत अशा कार्यक्रमामधून आपलाच वरचष्मा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. रामदास कदम आमदार असले तरी ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत. ते शिवसेनेचे नेते असले तरीही त्यांचा खेडसह जिल्हाभरात पूर्वीसारखा वचक राहिलेला नाही तर पालकमंत्री रवींद्र वायकर हे जिल्ह््यात नवीन आहेत. याच संधीचा फायदा भाजप घेताना दिसत आहे. सेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची पाठखेड, दापोली व मंडणगडचे आमदार संजय कदम हे राष्ट्रवादीचे आहेत. त्यांच्यासमवेत असलेले दोनचार कार्यकर्ते वगळता राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचा एकही नेता या कार्यक्रमामध्ये फिरकला नाही, हे विशेष. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने कार्यक्रमाची सारी सूत्रे भाजपच्याच हाती होती.