शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाचा सावळा गोंधळ, मुंबई, कोल्हापूरचे लोक कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस ...

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस उपलब्ध होत आहे, अशाठिकाणी लोक धाव घेत असून, मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लस घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरुन आलेल्या लोकांचा रांगा लसीकरण केंद्रावर लागत आहेत.

तरुणांना लस देण्याची मोहीम सुरू करताना लसीच्या पुरवठ्याचा विचार करण्यात आला की नाही, हाच प्रश्न आता लोकांच्या मनात येत आहे. लसीची उपलब्धता होत नसल्याने आणि नोंदणी पाच मिनिटात फुल्ल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातून लसीकरण केंद्रांवर बाचाबाचीचे प्रकार वाढू लागले आहेत.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील लोकांना प्राधान्याने लस देण्यात आली. कोरोना योद्धा म्हणून पहिल्या फळीत काम करत असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर पोलीस यंत्रणेतील लोकांना लस देण्यात आली. नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या सगळ्या टप्प्यांमध्ये पहिल्यापासूनच गती मंदावलेली होती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात भीती होती. पण ज्यावेळी मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तेव्हापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला. हा प्रतिसाद वाढत असतानाच लसीचा पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून सतत या मोहिमेत खंड पडतच आहे.

आता या मोहिमेला १८ ते ४४ वयोगटाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे लसीची मागणी अधिकच वाढली आहे. आता त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाला सुसुत्रता येईल, असे अपेक्षित असताना उलट गोंधळ वाढला आहे. ज्यांची नोंदणी होत आहे, त्यांनाही लस मिळत नसल्याची ओरड होत आहे.

................................

ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ

नावाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी वेबसाईट देण्यात आली आहे, त्यावर लस घेणाऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. त्या मोबाईलवर ओटीपी (वन टाईम पीन) क्रमांक पाठवला जातो. हा ओटीपी वेबसाईटवर नोंदवावा लागतो. मात्र, ओटीपी येईपर्यंत वेबसाईटवर त्या दिवसाचे रजिस्ट्रेशन फुल्ल झालेले असते. गणपतीच्या दिवसात कोकणात येणाऱ्या रेल्वेच्या किंवा बसेसच्या तिकिटांचे बुकिंग जितक्या वेळात संपते, तितक्या वेळात लसीकरणाची नोंदणीही संपत आहे.

.................

मुंबई, कोल्हापूरचे लोक

महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला कोठेही जाऊन लस घेता येण्याची सुविधा नोंदणीमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे केंद्रांवरील रांगा वाढल्या आणि स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहिले.

...............

दुसऱ्या लसीचा घोळ

पहिला डोस घेऊन ४०/५० दिवस झाले तरी दुसरा डोस उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. त्यातही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बराच काळ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळेही ओरड वाढली आहे. राज्य सरकारने आता १८ ते ४४ या वयोगटाला प्राधान्य दिले असून, ४५ वर्षांवरील लोकांची मोठी अडचण होत आहे. राजापुरात तर रोज रांग लावूनही लस न मिळालेल्या संतप्त लोकांनी लसीकरण केंद्रासमोरच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.