शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
3
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
4
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
5
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
6
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
7
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
8
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
9
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
10
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
11
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
12
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
13
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
14
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
15
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
16
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!
17
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
18
नवीन नागपूर साकारतांना प्रत्येक शेतकऱ्यांला जमिनीचा मोबदला भूसंपादन कायद्याप्रमाणेच मिळेल; महसूल मंत्र्यांचा दावा
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ कामे चुकूनही नका करू, मानले जाते अशुभ; पूर्वज नाराज होतील, पितृदोष...
20
पती झोपेत, चालत्या ट्रेनमधून पत्नी गायब; तीन दिवसांनी दिराला आला एक मेसेज अन् सासर हादरलं! नेमकं काय झालं?

लसीकरणाचा सावळा गोंधळ, मुंबई, कोल्हापूरचे लोक कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस ...

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस उपलब्ध होत आहे, अशाठिकाणी लोक धाव घेत असून, मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लस घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरुन आलेल्या लोकांचा रांगा लसीकरण केंद्रावर लागत आहेत.

तरुणांना लस देण्याची मोहीम सुरू करताना लसीच्या पुरवठ्याचा विचार करण्यात आला की नाही, हाच प्रश्न आता लोकांच्या मनात येत आहे. लसीची उपलब्धता होत नसल्याने आणि नोंदणी पाच मिनिटात फुल्ल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातून लसीकरण केंद्रांवर बाचाबाचीचे प्रकार वाढू लागले आहेत.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील लोकांना प्राधान्याने लस देण्यात आली. कोरोना योद्धा म्हणून पहिल्या फळीत काम करत असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर पोलीस यंत्रणेतील लोकांना लस देण्यात आली. नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या सगळ्या टप्प्यांमध्ये पहिल्यापासूनच गती मंदावलेली होती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात भीती होती. पण ज्यावेळी मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तेव्हापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला. हा प्रतिसाद वाढत असतानाच लसीचा पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून सतत या मोहिमेत खंड पडतच आहे.

आता या मोहिमेला १८ ते ४४ वयोगटाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे लसीची मागणी अधिकच वाढली आहे. आता त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाला सुसुत्रता येईल, असे अपेक्षित असताना उलट गोंधळ वाढला आहे. ज्यांची नोंदणी होत आहे, त्यांनाही लस मिळत नसल्याची ओरड होत आहे.

................................

ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ

नावाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी वेबसाईट देण्यात आली आहे, त्यावर लस घेणाऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. त्या मोबाईलवर ओटीपी (वन टाईम पीन) क्रमांक पाठवला जातो. हा ओटीपी वेबसाईटवर नोंदवावा लागतो. मात्र, ओटीपी येईपर्यंत वेबसाईटवर त्या दिवसाचे रजिस्ट्रेशन फुल्ल झालेले असते. गणपतीच्या दिवसात कोकणात येणाऱ्या रेल्वेच्या किंवा बसेसच्या तिकिटांचे बुकिंग जितक्या वेळात संपते, तितक्या वेळात लसीकरणाची नोंदणीही संपत आहे.

.................

मुंबई, कोल्हापूरचे लोक

महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला कोठेही जाऊन लस घेता येण्याची सुविधा नोंदणीमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे केंद्रांवरील रांगा वाढल्या आणि स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहिले.

...............

दुसऱ्या लसीचा घोळ

पहिला डोस घेऊन ४०/५० दिवस झाले तरी दुसरा डोस उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. त्यातही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बराच काळ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळेही ओरड वाढली आहे. राज्य सरकारने आता १८ ते ४४ या वयोगटाला प्राधान्य दिले असून, ४५ वर्षांवरील लोकांची मोठी अडचण होत आहे. राजापुरात तर रोज रांग लावूनही लस न मिळालेल्या संतप्त लोकांनी लसीकरण केंद्रासमोरच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.