शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

लसीकरणाचा सावळा गोंधळ, मुंबई, कोल्हापूरचे लोक कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:31 IST

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस ...

रत्नागिरी : राज्यात सर्वच भागात मागणी इतकी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण मोहिमेचा सावळा गोंधळ उडाला आहे. जिथे लस उपलब्ध होत आहे, अशाठिकाणी लोक धाव घेत असून, मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी लस घेण्यासाठी येत आहेत. त्यामुळे स्थानिक आणि बाहेरुन आलेल्या लोकांचा रांगा लसीकरण केंद्रावर लागत आहेत.

तरुणांना लस देण्याची मोहीम सुरू करताना लसीच्या पुरवठ्याचा विचार करण्यात आला की नाही, हाच प्रश्न आता लोकांच्या मनात येत आहे. लसीची उपलब्धता होत नसल्याने आणि नोंदणी पाच मिनिटात फुल्ल होत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातून लसीकरण केंद्रांवर बाचाबाचीचे प्रकार वाढू लागले आहेत.

लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील लोकांना प्राधान्याने लस देण्यात आली. कोरोना योद्धा म्हणून पहिल्या फळीत काम करत असल्याने त्यांना प्राधान्य देण्यात आले. त्यानंतर पोलीस यंत्रणेतील लोकांना लस देण्यात आली. नंतरच्या टप्प्यात ४५ वर्षांवरील लोकांना लस देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. या सगळ्या टप्प्यांमध्ये पहिल्यापासूनच गती मंदावलेली होती. लसीकरणाबाबत लोकांच्या मनात भीती होती. पण ज्यावेळी मार्च महिन्याच्या शेवटच्या टप्प्यापासून दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे रुग्ण वाढू लागले, तेव्हापासून लसीकरणाला प्रतिसाद वाढू लागला. हा प्रतिसाद वाढत असतानाच लसीचा पुरवठा खंडित झाला. तेव्हापासून सतत या मोहिमेत खंड पडतच आहे.

आता या मोहिमेला १८ ते ४४ वयोगटाची जोड देण्यात आली आहे. त्यामुळे लसीची मागणी अधिकच वाढली आहे. आता त्यासाठी नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरणाला सुसुत्रता येईल, असे अपेक्षित असताना उलट गोंधळ वाढला आहे. ज्यांची नोंदणी होत आहे, त्यांनाही लस मिळत नसल्याची ओरड होत आहे.

................................

ऑनलाईन नोंदणीचा गोंधळ

नावाचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जी वेबसाईट देण्यात आली आहे, त्यावर लस घेणाऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकावा लागतो. त्या मोबाईलवर ओटीपी (वन टाईम पीन) क्रमांक पाठवला जातो. हा ओटीपी वेबसाईटवर नोंदवावा लागतो. मात्र, ओटीपी येईपर्यंत वेबसाईटवर त्या दिवसाचे रजिस्ट्रेशन फुल्ल झालेले असते. गणपतीच्या दिवसात कोकणात येणाऱ्या रेल्वेच्या किंवा बसेसच्या तिकिटांचे बुकिंग जितक्या वेळात संपते, तितक्या वेळात लसीकरणाची नोंदणीही संपत आहे.

.................

मुंबई, कोल्हापूरचे लोक

महाराष्ट्रातील कोणत्याही व्यक्तीला कोठेही जाऊन लस घेता येण्याची सुविधा नोंदणीमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे शुक्रवारी, शनिवारी मुंबई, कोल्हापूरचे लोक रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये लस घेण्यासाठी दाखल झाले होते. त्यामुळे केंद्रांवरील रांगा वाढल्या आणि स्थानिक लोक लसीकरणापासून वंचित राहिले.

...............

दुसऱ्या लसीचा घोळ

पहिला डोस घेऊन ४०/५० दिवस झाले तरी दुसरा डोस उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी आता वाढू लागल्या आहेत. त्यातही कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस बराच काळ उपलब्ध झालेला नाही. त्यामुळेही ओरड वाढली आहे. राज्य सरकारने आता १८ ते ४४ या वयोगटाला प्राधान्य दिले असून, ४५ वर्षांवरील लोकांची मोठी अडचण होत आहे. राजापुरात तर रोज रांग लावूनही लस न मिळालेल्या संतप्त लोकांनी लसीकरण केंद्रासमोरच आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.