शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
5
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
6
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
7
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
8
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
9
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
10
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
11
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
12
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
13
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
14
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
15
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
16
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
17
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
18
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
19
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
20
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...

रत्नागिरीवासीय पितात सांडपाणीमिश्रित पाणी

By admin | Updated: November 17, 2015 00:01 IST

रत्नागिरी : बंड्या साळवी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील जुनाट जलवाहिन्या जागोजागी फुटलेल्या आहेत. या फुटलेल्या जलवाहिन्यांमध्ये गटारातील सांडपाणी मिसळत असून, हेच दूषित पाणी रत्नागिरीकरांना प्यावे लागते. त्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या जलवाहिन्या तातडीने बदलाव्यात व शहरवासीयांना आरोग्यदायक पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी करणारे निवेदन पालिकेतील शिवसेनेचे पक्षप्रतोद प्रदीप तथा बंड्या साळवी जिल्हाधिकाऱ्यांना येत्या दोन दिवसात देणार आहेत.रत्नागिरी शहरात गटारे, रस्ते, उद्याने यांसारख्या अनेक बाबतीत नागरिकांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. या समस्यांकडे गेल्या वर्षभराच्या काळात सातत्याने दुुर्लक्ष होत असल्यानेच आपल्याला याबाबत आवाज उठविणे भाग पडत असल्याची माहिती नगरसेवक साळवी यांनी प्रसारमाध्यमांना दिली. रत्नागिरी शहरात साडेनऊ हजारपेक्षा अधिक नळजोडण्या असून, दररोज शीळ व पानवल धरणातून शहराला १५ दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा केला जातो. शीळ धरणातून सर्वाधिक १२ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. पाण्याचा साठा मुबलक असताना गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होणे, काही ठिकाणी पाणीच न येणे, किडेयुक्त, दुर्गंधीयुक्त पाणी येणे या समस्यांनी रत्नागिरीतील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांच्या काळात शहरातील अनेक भागातील नळांना सांडपाणीमिश्रित पाणी येत असून, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, आरोग्याच्या समस्या उद्भवायला लागल्या आहेत. जुनाट जलवाहिन्यांचे जाळे बदलण्याचा विषय अनेक दिवसांपासून सुरू असताना व त्यासाठी निधीची उपलब्धता होऊनही कार्यवाही झालेली नाही. शहराच्या अनेक भागातील अंतर्गत जलवाहिन्या जुनाट असल्याने फुटलेल्या आहेत. त्यामुळे गटारातील सांडपाणी फुटलेल्या जलवाहिनीत शिरते व हे सांडपाणीयुक्त पाणी नळजोडण्यांमधून नागरिकांना मिळते. याबाबत नागरिकांच्या वारंवार तक्रारी आपल्याकडे आल्या असून, याकडे जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार असल्याचे साळवी यांनी स्पष्ट केले आहे. रत्नागिरीकर सध्या अनेक समस्यांना सामोरे जात असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)मुबलक पाणी : तहान भागेना...रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात आॅगस्ट २०१६पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. पानवल धरणातील पाणी फेबु्रवारीअखेरपर्यंत वापरले जाते. त्यानंतर या धरणातील पाणी आटते. एमआयडीसीकडून पाणी घेतले जाते. म्हणजेच पाणीपुरवठा मुबलक असताना शहरवासीयांना मात्र पुरेसे पाणी मिळत नाही, याचे कारण तांत्रिक आहे. त्यात सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे. शुध्दिकरण की...?शहरातील साळवी स्टॉप येथील जलशुध्दिकरण केंद्र हे कचऱ्याच्या ढिगांच्या विळख्यात आहे. त्यामुळे जलशुध्दिकरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.