शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बचतगटांना साडेतीन कोटी रुपयांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना ‘उमेद’ अभियानांतर्गत निधी देण्यात येताे. बचत गटांसाठी साडेसात कोटी रुपयांची मागणी ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गटांना ‘उमेद’ अभियानांतर्गत निधी देण्यात येताे. बचत गटांसाठी साडेसात कोटी रुपयांची मागणी करण्यात आली हाेती. मात्र, त्यांपैकी चार कोटीच प्राप्त झाले आहेत. अपुरा निधी तसेच तोही वेळेवर मिळत नसल्याने बचत गटांच्या चळवळीला मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे हा निधी वेळेवर मिळावा, अशी मागणी बचत गटांकडून प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

उमेद अभियानांतर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना एकत्र करून बचतीसह घरबसल्या रोजगाराची सवय लावण्यात येत आहे. त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांनी आपले संसार उभे केले आहे. घर चालविण्यासाठी बचत गटांच्या महिला पुरुषांना चांगला हातभार लावीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात नव्याने स्थापन केलेल्या बचत गटांना १५ हजार रुपये खेळते भांडवल दिले जाते. त्यासाठी जिल्ह्याचा साडेसात कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यातील ४ कोटी रुपये मार्च, २०२१ मध्ये प्राप्त झाले. काही बचत गटांना त्याचे वितरणही करण्यात आले. परंतु अजूनही साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी येईपर्यंत बचत गटांच्या महिलांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.