शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

चुरशीने सरासरी ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी ६१ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. १२ ग्रामपंचायतींत सरपंचपद, तर १३ ग्रामपंचायतींत सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. काही ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे आता अंतिमत: जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी १४८ ग्रामपंचायतींच्या एकूण ६६५ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सरंपचपदांसाठी ४०८, तर सदस्यपदांसाठी २०३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच २९ ग्रामपंचायतींत केवळ सरपंचपदासाठी आणि २३ ग्रामपंचायतींत केवळ सदस्यांच्या निवडणुकांसाठी सोमवारी मतदान झाले.जिल्ह्यात ४७३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. किरकोळ घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले.तालुक्यातील ग्रामीण भागातून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये सर्वांत जास्त, तर राजापूर तालुक्यात कमी मतदान झाले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. या यंत्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.जिल्ह्यातील तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी आज, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यासाठीही पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.