शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

चुरशीने सरासरी ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी ६१ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. १२ ग्रामपंचायतींत सरपंचपद, तर १३ ग्रामपंचायतींत सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. काही ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे आता अंतिमत: जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी १४८ ग्रामपंचायतींच्या एकूण ६६५ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सरंपचपदांसाठी ४०८, तर सदस्यपदांसाठी २०३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच २९ ग्रामपंचायतींत केवळ सरपंचपदासाठी आणि २३ ग्रामपंचायतींत केवळ सदस्यांच्या निवडणुकांसाठी सोमवारी मतदान झाले.जिल्ह्यात ४७३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. किरकोळ घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले.तालुक्यातील ग्रामीण भागातून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये सर्वांत जास्त, तर राजापूर तालुक्यात कमी मतदान झाले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. या यंत्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.जिल्ह्यातील तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी आज, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यासाठीही पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.