शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

चुरशीने सरासरी ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : जिल्ह्यातील २१५ पैकी १४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी ४७३ केंद्रांवर सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत प्रशासनाकडे उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार चिपळूण आणि दापोली तालुक्यांत सर्वाधिक मतदान झाले आहे. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही.जिल्ह्यातील २२० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी ६१ ग्रामपंचायती पूर्णत: बिनविरोध झाल्या आहेत. १२ ग्रामपंचायतींत सरपंचपद, तर १३ ग्रामपंचायतींत सदस्यपदे बिनविरोध झाली आहेत. काही ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी अर्जच आलेले नाहीत. त्यामुळे आता अंतिमत: जिल्ह्यातील २१५ ग्रामपंचायतींपैकी १४८ ग्रामपंचायतींच्या एकूण ६६५ प्रभागांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यात सरंपचपदांसाठी ४०८, तर सदस्यपदांसाठी २०३३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तसेच २९ ग्रामपंचायतींत केवळ सरपंचपदासाठी आणि २३ ग्रामपंचायतींत केवळ सदस्यांच्या निवडणुकांसाठी सोमवारी मतदान झाले.जिल्ह्यात ४७३ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया घेण्यात आली. किरकोळ घटना वगळता उर्वरित ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. कुठेही अनुचित प्रकार घडल्याची नोंद नाही. दुपारी ३.३० वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १४८ ग्रामपंचायतींसाठी सरासरी ६३ टक्के मतदान झाले.तालुक्यातील ग्रामीण भागातून अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत जिल्हा कार्यालयाकडे प्राप्त झाला. त्यानुसार जिल्ह्यात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. चिपळूण, दापोली या तालुक्यांमध्ये सर्वांत जास्त, तर राजापूर तालुक्यात कमी मतदान झाले आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली आहेत. या यंत्रांच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.जिल्ह्यातील तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी असल्याने त्यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी आज, मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. यासाठीही पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे.