शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्यावर ओरखडे

By admin | Updated: October 12, 2015 00:37 IST

निव्वळ घोषणाबाजी : पर्यटन विकास कागदावरच!

रहिम दलाल- रत्नागिरी --रत्नागिरीच्या पर्यटन विकासाबाबत नेहमीच मोठमोठ्या योजना समोर ठेवल्या जात आहेत. आराखडाही आखण्यात आला आहे. मात्र, रत्नागिरीतील किनारपट्टीवर पर्यटनासाठी आवश्यक वातावरण असतानाही सुविधांचा पत्ता नाही. पर्यटकांना मोहिनी घालणारा भाट्येसारखा किनारा अंधारात आहे. त्यामुळे पर्यटन विकास की निव्वळ घोषणाबाजी, असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी राजकीय व शासन स्तरावर इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांच्या ते कधी लक्षात येईल, असा प्रश्न भाट्ये खाडीवरील पूल आणि त्याला लागूनच असलेल्या भाट्ये सुरुबन समोरील किनारपट्टीच्या रात्रीच्या भयाण स्थितीवरुन दिसून येते आहे.रत्नागिरी शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले प्रथम भाट्ये आणि मांडवी किनाऱ्याकडे वळतात. जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी पर्यटन महोत्सवावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. भाट्ये किनाऱ्यावर आणि गो. जो. महाविद्यालयाच्या मैदानावर पर्यटकांसाठी हा महोत्सव भरविण्यात आला होता. हजारो लोकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. मात्र, हा झगमगाट पर्यटकांना दाखवताना भाट्ये पूल आणि सुरुबन परिसरात पसरलेल्या अंधाराच्या साम्राज्याकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेलेले नाही.भाट्ये पुलावर रात्रीच्या वेळी भयाण अंधार असतो. भाट्ये पुलावर पूर्वी विजेचा लखलखाट होता. त्यामुळे स्थानिक लोकही रात्रीच्या वेळी या शांत व निसर्गरम्य वातावरणामध्ये फेरफटका मारण्यासाठी येत असत. मात्र, समाजकंटकांनी या पुलावरील विजेचे दिवे फोडून टाकल्याने आज कित्येक वर्षे येथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर पुलाचा कठडाही तोडण्यात आलेला आहे. कधीकाळी बांधकाम विभागाकडून या पुलाला रंगरंगोटी केली केली. मात्र, महत्त्वाची समस्या असलेल्या विजेकडे कानाडोळा करण्यात आला. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना, आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळ कार्यालयाच्या काही अंतरावर असलेला भाट्ये पूल आणि परिसर अंधाराच्या साम्राज्यापासून कधी मुक्त होणार, याकडे लक्ष लागले आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या भौतिक सोयीसुविधा शासनाने उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच भाट्ये पूल व परिसरात विद्युतीकरणाकडे शासनाने लक्ष द्यावे. मात्र तसे लक्ष दिले जात नाही.- फैज अहमद काद्री, राजिवडा.भाट्ये, मांडवी किनाऱ्यावर पर्यटन विकास केल्यास आणखी महत्व प्राप्त होईल. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करताना तो आवश्यक असलेल्या ठिकाणी खर्च करावा. पर्यटनस्थळांचा विकास होऊन येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. भाट्ये पूल व परिसराच्या पर्यटन विकास करणे, गरजेचे आहे. - शेख महंमद हुश्ये,राजिवडा, रत्नागिरी.