शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आराखड्यावर ओरखडे

By admin | Updated: October 12, 2015 00:37 IST

निव्वळ घोषणाबाजी : पर्यटन विकास कागदावरच!

रहिम दलाल- रत्नागिरी --रत्नागिरीच्या पर्यटन विकासाबाबत नेहमीच मोठमोठ्या योजना समोर ठेवल्या जात आहेत. आराखडाही आखण्यात आला आहे. मात्र, रत्नागिरीतील किनारपट्टीवर पर्यटनासाठी आवश्यक वातावरण असतानाही सुविधांचा पत्ता नाही. पर्यटकांना मोहिनी घालणारा भाट्येसारखा किनारा अंधारात आहे. त्यामुळे पर्यटन विकास की निव्वळ घोषणाबाजी, असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यासाठी राजकीय व शासन स्तरावर इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. मात्र, कोट्यवधी रुपयांच्या मोठमोठ्या घोषणा करणाऱ्यांच्या ते कधी लक्षात येईल, असा प्रश्न भाट्ये खाडीवरील पूल आणि त्याला लागूनच असलेल्या भाट्ये सुरुबन समोरील किनारपट्टीच्या रात्रीच्या भयाण स्थितीवरुन दिसून येते आहे.रत्नागिरी शहरात येणाऱ्या पर्यटकांची पावले प्रथम भाट्ये आणि मांडवी किनाऱ्याकडे वळतात. जिल्ह्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रत्नागिरी पर्यटन महोत्सवावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. भाट्ये किनाऱ्यावर आणि गो. जो. महाविद्यालयाच्या मैदानावर पर्यटकांसाठी हा महोत्सव भरविण्यात आला होता. हजारो लोकांनी या महोत्सवाला हजेरी लावली. मात्र, हा झगमगाट पर्यटकांना दाखवताना भाट्ये पूल आणि सुरुबन परिसरात पसरलेल्या अंधाराच्या साम्राज्याकडे अद्याप कोणाचेही लक्ष गेलेले नाही.भाट्ये पुलावर रात्रीच्या वेळी भयाण अंधार असतो. भाट्ये पुलावर पूर्वी विजेचा लखलखाट होता. त्यामुळे स्थानिक लोकही रात्रीच्या वेळी या शांत व निसर्गरम्य वातावरणामध्ये फेरफटका मारण्यासाठी येत असत. मात्र, समाजकंटकांनी या पुलावरील विजेचे दिवे फोडून टाकल्याने आज कित्येक वर्षे येथे अंधाराचे साम्राज्य पसरलेले आहे. त्याचबरोबर पुलाचा कठडाही तोडण्यात आलेला आहे. कधीकाळी बांधकाम विभागाकडून या पुलाला रंगरंगोटी केली केली. मात्र, महत्त्वाची समस्या असलेल्या विजेकडे कानाडोळा करण्यात आला. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना, आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. मात्र, पर्यटन विकास महामंडळ कार्यालयाच्या काही अंतरावर असलेला भाट्ये पूल आणि परिसर अंधाराच्या साम्राज्यापासून कधी मुक्त होणार, याकडे लक्ष लागले आहे. पर्यटन विकासाला चालना दिल्यास येथे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या भौतिक सोयीसुविधा शासनाने उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच भाट्ये पूल व परिसरात विद्युतीकरणाकडे शासनाने लक्ष द्यावे. मात्र तसे लक्ष दिले जात नाही.- फैज अहमद काद्री, राजिवडा.भाट्ये, मांडवी किनाऱ्यावर पर्यटन विकास केल्यास आणखी महत्व प्राप्त होईल. पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करताना तो आवश्यक असलेल्या ठिकाणी खर्च करावा. पर्यटनस्थळांचा विकास होऊन येथील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल. भाट्ये पूल व परिसराच्या पर्यटन विकास करणे, गरजेचे आहे. - शेख महंमद हुश्ये,राजिवडा, रत्नागिरी.